शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

जुन्या वॉर्ड रचनेतील नाले, रस्ते, धार्मिक स्थळे गायब

By admin | Updated: June 20, 2014 01:17 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या २००५ मध्ये करण्यात आलेल्या वॉर्ड नकाशातील दिशादर्शक खुणा (वॉर्ड हद्दीची खूण) २०१४ साली सापडत नसल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.

औरंगाबाद : महापालिकेच्या २००५ मध्ये करण्यात आलेल्या वॉर्ड नकाशातील दिशादर्शक खुणा (वॉर्ड हद्दीची खूण) २०१४ साली सापडत नसल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.जुन्या प्रभाग रचनेतील नाले, रस्ते, धार्मिक स्थळे, झाडांच्या खुणा गायब झाल्यामुळे प्रभागांचे नकाशे तयार करण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे २०११ ची जनगणना संशयास्पद आहे की, जुन्या वॉर्ड रचनांमध्ये लुडबूड झाली होती. यावरून पालिकेत खल सुरू आहे. १० वर्षांपूर्वी करण्यात आलेली वॉर्ड रचना ही मनपा सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळेच केली गेल्याचे यातून संकेत मिळत आहेत. एप्रिल-२०१५ मध्ये होणारी निवडणूक पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने होणार असून, प्रभाग रचनेच्या नकाशाचे काम अंतिम टप्प्यात आहे. १८ ते २२ हजार लोकसंख्या एका प्रभागासाठी निश्चित करण्यात आली आहे. ११४ प्रभाग होण्याचा अंदाज सूत्रांनी वर्तविला. जनगणनेआधारे जसे लोकसंख्येचे ब्लॉक आहेत. त्या आधारावर प्रभागांची रचना राहणार नाही. आयोगाने लोकसंख्येचे जे निकष दिले आहेत, त्यावर प्रभागांची रचना असेल. त्यासाठी वॉर्डांच्या विद्यमान हद्दींचा आधार घेतला जात आहे.त्यातील अनेक वॉर्डांच्या हद्द खुणा अस्तित्वात नाहीत. त्यामुळे २००५, २०१० साली झालेल्या निवडणुकांमध्ये मर्जीनुसार मतदार संख्या दुसऱ्या वॉर्डांमध्ये ऐनवेळी घुसविल्या गेली.उपायुक्त किशोर बोर्डे आणि मालमत्ता अधिकारी एस. पी. खन्ना यांच्यासह १६ कनिष्ठ अभियंत्यांची टीम जनगणनेतील प्रगणकांच्या लोकसंख्या मोजणीच्या माहितीनुसार प्रभागाचे नकाशे तयार करीत आहे.१ जून २०१४ पर्यंत नकाशा ड्राफ्टिंगची माहिती निवडणूक आयोगाला पाठविण्याची डेडलाईन होती; पण ते काम अद्याप झालेले नाही. १५ वॉर्डांच्या हद्दीची अडचणनकाशाची जुळवणी करताना सुमारे १५ वॉर्डांच्या विद्यमान हद्दीतील खुणा गायब आहेत. त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे नकाशा तयार करताना कर्मचाऱ्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे.जातीनिहाय मतदारांचा आकडा २०११ च्या जनगणनेनुसार निश्चित होणार आहे. त्या आकडेवारीनुसार शहरात १२ प्रभाग एस.सी., एस. टी. साठी आरक्षित होतील, असा अंदाज आहे. त्यात सहा प्रभाग महिलांसाठी आरक्षित होतील. १२ प्रभाग म्हणजे २४ वॉर्ड होऊ शकतात. सध्या एस. सी. साठी १७ व एस.टी.साठी १ वॉर्ड आहे. म्हणजेच आणखी ६ वॉर्ड वाढू शकतात, अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली.