शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

उद्दिष्ट निम्म्यावरच अडखळले !

By admin | Updated: November 24, 2014 00:35 IST

लातूर : केंद्र व राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत मिशन’ (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छता निर्मितीला प्राधान्य देण्यात आले असून,

लातूर : केंद्र व राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत मिशन’ (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छता निर्मितीला प्राधान्य देण्यात आले असून, २०१४-१५ साठी लातूर जिल्ह्याला ३६ हजारांचे उद्दिष्ट देण्यात आले असतानाही सध्यापर्यंत ८ हजार ७१४ शौचालयांची निर्मिती करण्यात आली आहे. हे उद्दिष्ट ११ महिन्यांनंतरही निम्म्यावरच अडखळले आहे. ‘निर्मल भारत अभियान’चे नामकरण करून २ आॅक्टोबर रोजी ‘स्वच्छ भारत मिशन’ (ग्रामीण) असे नामकरण करण्यात आले. या मोहिमेच्या माध्यमातून वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामासाठी १२ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे. यामध्ये वैयक्तिक शौचालयाकरिता केंद्राचा हिस्सा ९ हजार (७५ टक्के) व राज्याचा हिस्सा ३ हजार (२५ टक्के) देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून स्वच्छतागृहाच्या मोहिमेला गती येणे आवश्यक आहे. परंतु, लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून २०१४-१५ या कालावधीत सध्यापर्यंत ८७१४ एवढ्या बोटांवर मोजण्याइतकेच स्वच्छतागृह झाले आहेत. तर उर्वरित २७ हजार २८६ स्वच्छतागृहांचे उद्दिष्ट अद्यापही ‘जैसे थे’ स्थितीत आहेत. याउलट जिल्हा परिषद प्रशासन स्वच्छतागृहाच्या बाबतीत लातूर जिल्हा राज्यात अग्रस्थानी असल्याचा डंका वाजवीत आहे. (प्रतिनिधी)४‘स्वच्छ भारत मिशन’ (ग्रामीण) अंतर्गत शौचालय निर्मितीला गती देण्यात येत असली, तरी वर्षभरासाठी देण्यात आलेले उद्दिष्ट निम्म्यावरच आहे. याला गती देण्यासाठी शौचालय उभारणीसाठी अनुदानाची जनजागृती करण्याऐवजी कमी खर्चामध्ये शौचालय उभारणीची जनजागृती करावी. यामुळे सर्वसामान्य नागरिकांतूनही शौचालय निर्मितीसाठी पुढाकार घेत असल्याचे चित्र निर्माण होईल, असे जिल्हा परिषदेच्या बहुतांश सदस्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.शौचालय निर्मितीसाठी केंद्र व राज्य शासन नवनवीन योजना अंमलात आणत असले तरी २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिसांना शौचालय उभारणीसाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याचे आदेश दिले असतानाही शौचालय उभारणीबाबत अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांच्यामध्ये शौचालय उभारणीबाबत उदासिनताच दिसून येत आहे.