शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

आता युतीशिवाय पर्यायच नाही...!

By admin | Updated: October 1, 2014 00:39 IST

जालना : जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक बुधवारी होत आहे. राज्यात युती व आघाडीची ताटातुट झाल्याच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत काय होणार,

जालना : जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक बुधवारी होत आहे. राज्यात युती व आघाडीची ताटातुट झाल्याच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक म्हणजे स्थानिक पुढाऱ्यांची सत्वपरीक्षाच असल्याचा सूर राजकीय मंडळींमधून उमटत आहे.जिल्हा परिषदेत भाजपा-सेनेचे बहूमत आहे. या बहुमताच्या जोरावरच २१ सप्टेंबर रोजी झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत युतीने दोन्ही पदे मिळविली. परंतु आता युतीमध्ये ताटातूट झाल्याने या निवडणुकीत युती ठेवणार की स्वतंत्र लढणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. एकूण ५५ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत शिवसेना व भाजपाचे प्रत्येकी १५ सदस्य आहेत. ५ अपक्षांपैकी ४ जणांनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे.यात राष्ट्रवादी काँग्रसचे १६ , काँग्रेसचे ३ व मनसेचा एक सदस्य आहे. पहिल्या अडीच वर्षांच्या काळात अध्यक्षपद शिवसेनेकडे तर उपाध्यक्षपद भाजपाकडे होते. मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या या पदांच्या निवडणुकीसाठी भाजपाने प्रतिष्ठेचा मुद्दा करून अध्यक्षपद आपल्या पक्षाच्या पदरात पाडून घेतले. त्यामुळे उपाध्यक्षपद शिवसेनेला मिळाले. दोन्ही पक्षातील अध्यक्ष पदासाठी इच्छूक असलेल्या सदस्यांना सभापतीपदाचे गाजर दाखविण्यात आले होते. मात्र युतीमध्ये तूट पडल्यानंतर आता काय होणार, हे इच्छूक सभापतींनाही कळेनासे झाले आहे. चार सभापतीपदांसाठी ही निवडणूक होत आहे. मनसेचे एकमेव सदस्य स्वत: विधानसभा निवडणूक रिंंगणात आहेत. तर काँग्रेसचेही एक सदस्य रिंंगणात आहेत. विधानसभा स्वबळावरच लढविण्यात येत असल्याने जिल्हा परिषदेत शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यापैकी कोणते पक्ष युती करून निवडणूक लढविणार का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपा, शिवसेना सदस्यांची एकत्रित बैठक मंगळवारी सायंकाळपर्यंत झालेली नाही. राष्ट्रवादी व काँग्रेस सदस्यांचीही बैठक नाही. त्यामुळे सभापती पदाच्या निवडणुका स्वबळावरही होऊ शकतात, अशी शक्यताही नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)राष्ट्रवादी काँग्रेसने २१ सप्टेंबर रोजी झालेली अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक स्वबळावर लढली होती. कारण या दिवशी सभागृहात काँग्रेसचा चारपैकी एकही सदस्य उपस्थित नव्हता. तर मनसेच्याही एकमेव सदस्याची गैरहजेरी होती. परंतु सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपा व सेना यांच्यात युती झाली नाही, तर स्वबळावर लढण्याची तयारी राष्ट्रवादीने केली आहे. ४जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी २ वाजता ही निवडणूक होत आहे. प्रशासनाने निवडणुकीची पूर्वतयारी पूर्ण केली आहे. या निवडणुकीत काय होणार, याविषयीची उत्कंठता ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील जनतेलाही लागली आहे. ४चारही प्रमुख पक्षांतील नेत्यांनी मंगळवारी सायंकाळपर्यंत एकमेकांशी संपर्क साधलेला नव्हता. त्यामुळे या पक्षातील सदस्यही संभ्रमात होते. परंतु काही जाणकार सदस्यांच्या माहितीनुसार अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी शिवसेना-भाजपाची युती असल्याने सभापती पदासाठी ती होऊ शकते. कारण त्यासाठीची चर्चा पूर्वीच झालेली आहे.