शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

आता नेतृत्त्वाचा कस

By admin | Updated: January 7, 2015 00:59 IST

जालना : एकदा नव्हे दोनदा हुलकावणी दिल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी अखेर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या खांद्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची धूरा सोपविली.

जालना : एकदा नव्हे दोनदा हुलकावणी दिल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी अखेर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या खांद्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची धूरा सोपविली. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्त्व दिल्यापाठोपाठ दानवे यांना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद पक्षश्रेष्ठींनी सोपविल्याने जिल्ह्यासह मराठवाडावासीयांच्या इच्छा, आकांक्षा उंचावल्या आहेत. मूळ भोकरदन तालुक्यातील पळसखेडा खुर्द येथील रहिवासी असलेले खा. दानवे यांनी १९७६ साली आपल्याच गावच्या सरपंचपदी विराजमान होत राजकीय क्षेत्रात पदार्पण केले. जवखेडा गण पं.स. सदस्य, १९८१ साली ते भोकरदन पं.स. सभापतीपदी विराजमान झाले. १९९० ते ९९ या कार्यकाळात ते भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे दोन टर्म आमदार राहिले. १९९९ साली त्यांनी सर्वप्रथम लोकसभा निवडणूक लढविली. तेव्हापासून आजवर चारही लोकसभा निवडणुकांमधून त्यांनी विजय मिळविला. विशेषत: गेल्या निवडणुकीत प्रतिस्पर्ध्यांना चकवा देऊन ते दोन लाख एवढ्या मोठ्या मताधिक्क्याने लोकसभेत पोहोचले. त्यामुळेच पक्षश्रेष्ठींद्वारे त्यांच्या या उत्तुंग यशाची दखल घेतली जाईल, हे स्पष्ट झाले होते. त्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात दानवे यांचा पहिल्याच टप्प्यात राज्यमंत्री म्हणून समावेश करीत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या निष्ठेसह कार्याची पावतीच दिली.या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून दानवे हे राज्याच्या राजकारणात पदार्पण करणार, अशी चर्चा सुरू झाली. विशेषत: राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दानवे यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या. तेव्हा पक्षश्रेष्ठींचा कोणताही आदेश आपण स्वीकारू, असे विधान करीत दानवे यांनी प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीसंदर्भात संकेत दिले होते. त्याप्रमाणे मंगळवारी त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. दानवे यांचा हा निर्णय सर्वार्थाने राजकीय क्षेत्रात दुरोगामी परिणाम करणारा ठरणार आहे. सत्तारूढ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून दानवे यांच्या खांद्यावरील ही जबाबदारी सर्वार्थाने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशेषत: राष्ट्रीय स्तरावरील श्रेष्ठींनी दिलेल्या जबाबदारीने दानवे यांना राष्ट्रीय व प्रदेश पातळीवरील श्रेष्ठींच्या संघटनात्मक दृष्ट्या आशा, अपेक्षांची पूर्तता करावी लागणार आहे. तसेच सरकार व संघटनेत समन्वय राखावे लागणार आहे. राज्यात भाजपा-सेना युतीचे सरकार असल्याने जिल्ह्यातील केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारीतील प्रश्न तातडीने सुटतील. तसेच राज्य शासनाकडे रेंगाळलेल्या अनेक योजनाही मार्गी लागतील, असा आशावाद कार्यकर्त्यांप्रमाणेच जनतेतून व्यक्त केला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)४केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर ज्याप्रमाणे त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्याप्रमाणे दानवे यांनी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून आपल्या सात महिन्यांच्या कार्यकाळात ड्रायपोर्ट उभारणीसह अन्य महत्त्वाकांक्षी योजना विशेषत: भोकरदन-जालना रस्त्याच्या कामांसह इतर कामांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्नांना सुरूवात केली.