शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

आता आठवड्यातून दोनदा पाणी देणार

By admin | Updated: April 9, 2015 00:11 IST

जालना : उन्हाळ्याच्या काळात शहरात आठवड्यातून दोनदा पाणीपुरवठा करण्याचे आदेश मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत

जालना : उन्हाळ्याच्या काळात शहरात आठवड्यातून दोनदा पाणीपुरवठा करण्याचे आदेश मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. मात्र त्यासाठी पाणीपुरवठ्याचा वेळ कमी करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. सध्या जायकवाडी पाणीपुरवठा योजनेद्वारे १५ एम.एल.डी. व घाणेवाडी उद्भवाद्वारे ६ एम.एल.डी. असे २१ एम.एल.डी. पाणी दररोज घेतले जाते. शहरात ४८ एम.एल.डी. पाण्याची गरज आहे. सद्यस्थितीत सहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. मात्र काही भागात तीन-चार तास तर काही भागात दीड ते दोन तास पाणीपुरवठा केला जातो, असे विविध भागातील नागरिकांकडून सांगण्यात येते. घाणेवाडी जलाशयात सव्वाआठ फूट पाणीसाठा उपलब्ध आहे. या उद्भवातून दरमहा दीड फूट पाण्याचा उपसा केला जातो. मात्र सध्या उन्हाळा असल्याने अडीच फूट पाणी घेतले जात आहे. त्यानुसार आगामी तीन महिने पुरेल एवढा पाणीसाठा जलाशयात आहे. या जलाशयाद्वारे नवीन जालना विभागाला पाणीपुरवठा केला जातो. सध्या जायकवाडी व घाणेवाडी हे दोन्ही स्त्रोत असल्याने काही दिवस जायकवाडीद्वारेच नवीन जालना भागासही पाणीपुरवठा केल्याचे सुत्रांनी सांगितले. शहरवासियांना आठवड्यातून दोनदा पाणी देण्यासाठीचे नियोजन पाणीपुरवठा विभागाकडून सुरू असल्याची माहिती अभियंता दासवाड यांनी दिली. ज्या भागात दीड-दोन तास पाणीपुरवठा होतो, तेथे अर्धा तासांची वेळ कमी करून पाणीपुरवठ्याचे दिवस वाढवावेत, अशी सूचना मुख्याधिकारी यांनी केली असल्याचे ते म्हणाले.याबाबत मुख्याधिकारी दीपक पुजारी म्हणाले, सध्या उन्हाळ्यात पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणावर लागत असल्याने शहरात पाणीपुरवठ्याचे दिवस वाढविण्याचा प्रयत्न नगरपालिकेकडून सुरू आहे.