शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

आता आठवड्यातून दोनदा पाणी देणार

By admin | Updated: April 9, 2015 00:11 IST

जालना : उन्हाळ्याच्या काळात शहरात आठवड्यातून दोनदा पाणीपुरवठा करण्याचे आदेश मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत

जालना : उन्हाळ्याच्या काळात शहरात आठवड्यातून दोनदा पाणीपुरवठा करण्याचे आदेश मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. मात्र त्यासाठी पाणीपुरवठ्याचा वेळ कमी करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. सध्या जायकवाडी पाणीपुरवठा योजनेद्वारे १५ एम.एल.डी. व घाणेवाडी उद्भवाद्वारे ६ एम.एल.डी. असे २१ एम.एल.डी. पाणी दररोज घेतले जाते. शहरात ४८ एम.एल.डी. पाण्याची गरज आहे. सद्यस्थितीत सहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. मात्र काही भागात तीन-चार तास तर काही भागात दीड ते दोन तास पाणीपुरवठा केला जातो, असे विविध भागातील नागरिकांकडून सांगण्यात येते. घाणेवाडी जलाशयात सव्वाआठ फूट पाणीसाठा उपलब्ध आहे. या उद्भवातून दरमहा दीड फूट पाण्याचा उपसा केला जातो. मात्र सध्या उन्हाळा असल्याने अडीच फूट पाणी घेतले जात आहे. त्यानुसार आगामी तीन महिने पुरेल एवढा पाणीसाठा जलाशयात आहे. या जलाशयाद्वारे नवीन जालना विभागाला पाणीपुरवठा केला जातो. सध्या जायकवाडी व घाणेवाडी हे दोन्ही स्त्रोत असल्याने काही दिवस जायकवाडीद्वारेच नवीन जालना भागासही पाणीपुरवठा केल्याचे सुत्रांनी सांगितले. शहरवासियांना आठवड्यातून दोनदा पाणी देण्यासाठीचे नियोजन पाणीपुरवठा विभागाकडून सुरू असल्याची माहिती अभियंता दासवाड यांनी दिली. ज्या भागात दीड-दोन तास पाणीपुरवठा होतो, तेथे अर्धा तासांची वेळ कमी करून पाणीपुरवठ्याचे दिवस वाढवावेत, अशी सूचना मुख्याधिकारी यांनी केली असल्याचे ते म्हणाले.याबाबत मुख्याधिकारी दीपक पुजारी म्हणाले, सध्या उन्हाळ्यात पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणावर लागत असल्याने शहरात पाणीपुरवठ्याचे दिवस वाढविण्याचा प्रयत्न नगरपालिकेकडून सुरू आहे.