शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

कंपनीला देणार नोटीस

By admin | Updated: February 17, 2015 00:43 IST

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला कायदेशीर नोटीस देण्यासाठी मनपा प्रशासन सरसावले आहे.

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला कायदेशीर नोटीस देण्यासाठी मनपा प्रशासन सरसावले आहे. २० पानांची नोटीस प्रशासनाने तयार केली असून, जलवाहिनीचे काम सुरू केले नाही, तर गाशा गुंडाळा, असाच अर्थ त्या नोटीसमधून निघेल, अशी माहिती सूत्रांकडून समजली आहे. कंपनीला बँकेकडून कर्ज पुरवठा न झाल्यामुळेच पैठण ते नक्षत्रवाडीपर्यंत २००० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीचे काम सुरू होत नसल्याचे कळते. जलवाहिनीचे काम सुरू करण्यासाठी आणखी ३ महिने लागतील, असे कंपनीने मनपा प्रशासनाला कळविले आहे. १५ फेबु्रवारीपर्यंत जलवाहिनीचे काम सुरू करण्यासाठी पालकमंत्री रामदास कदम यांनी कं पनीला डेडलाईन दिली होती. परंतु कंपनीने काम सुरू केलेले नाही. त्यामुळे कंपनीला मनपाने पहिली नोटीस बजावली. परंतु कंपनीने काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर डीपीआर (विकास आराखड्यासाठी) पुन्हा नोटीस बजावली. तरीही कंपनीने काहीही काम सुरू केले नाही. परिणामी प्रशासन कंपनीला अभय देत असल्याचे आरोप सुरू झाले आहेत. राजकीय दबाव, मनपा निवडणुका आणि शहरातील पाण्याची बोंब या सगळ्या भानगडीत ७९२ कोटींची समांतर जलवाहिनी अडकली आहे. पालिकेतील अभियंत्यांवरदेखील योजनेचे काम सुरू होत नसल्यामुळे आरोप होत आहेत. संशयकल्लोळ असा....मनपाचे ४०० आणि केंद्र शासनाचे अनुदान ४०० कोटी, अशा ८०० कोटींतून जलवाहिनीची योजना होत आहे. ४०० कोटी रुपये मनपाकडे नसल्यामुळे कंपनी कर्ज काढून ती रक्कम गुंतविणार आहे. त्या मोबदल्यात मनपा २० वर्षे त्या रकमेची दरमहा हप्त्यात फेड करील. आजवर २२ कोटी कंपनीला दिले आहेत. कंपनीला ४०० कोटींचे कर्ज अजून मिळाले नसल्याचे कळते. कंपनी मनपाच्या हप्त्यावरच सर्व अर्थकारण करीत आहे. २०० कोटी रुपयांचे पाईप खरेदी कंपनी सहज करील. परंतु जलवाहिनीचे काम न करण्यामागे काहीतरी गौडबंगाल असल्याची चर्चा आहे. २३० कोटी रुपयांचा व्याजासह निधी येऊन चार वर्षे झाले आहेत.मुंबई ते औरंगाबाद पत्रप्रपंच समांतर जलवाहिनीचे कंत्राट सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लि. या कंपनीने घेतले आहे. समभागांची व्रिकी-खरेदी झाल्यानंतर औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी ही कंपनी स्थापन करण्यात आली. कंपनीचे कार्यालय मुंबईत आहे. मनपाने त्या कंपनीलादेखील पत्र पाठविले आहे. मुख्यालय मुंबईला असल्यामुळे येथे काहीही निर्णय होत नाहीत. त्यामुळे पत्रप्रपंचावरच सर्व खेळ सुरू आहे. उन्हाळ्यात जलवाहिनीचे काम झाल्यास त्यात कंपनीचाच फायदा आहे. अनेक अडचणींचा सामना कंपनीला करावा लागणार आहे. दरम्यान, कंपनीचे बिझनेस हेड अर्णव घोष यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी याप्रकरणी बोलणे टाळले. २२ सप्टेंबर २०११ रोजी करार४३१ डिसेंबर २०१२ रोजी पाणीपुरवठ्याचे हस्तांतरण४७ जानेवारी २०१३ रोजी योजनेचे काम बंद४८ जानेवारी २०१३ कंपनी भांडवलदारांत भांडणे४मे २०१३ मध्ये औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कं.ची स्थापना ४३० एप्रिल २०१४ ला मनपाची कंपनीला नोटीसमे २०१४ रोजी मनपा कंपनी विरोधात कोर्टात ४१ जून २०१४ ला पीपीपी मॉडलेला मंजुरी४७ जुलै २०१४ वॉटर बायलॉजला शासनाची मंजुरी४१ सप्टेंबर २०१४ मनपा पाणीपुरवठ्याचे हस्तांतरण४आॅक्टोबर, डिसेंबर २०१४ पाण्यासाठी ओरड४जानेवारी २०१५ कंपनीला पालकमंत्र्यांचे आदेश४जानेवारी २०१५ मनपाची दहासदस्यीय समिती४फेब्रुवारी २०१५ ला मनपाची कंपनीला नोटीस४१६ फेबु्रवारी २०१५ ला कायदेशीर नोटीसची तयारी १कंपनीचे बिझनेस हेड अर्णव घोष यांनी सांगितले की, जलवाहिनी टाकण्याच्या कामाबाबत अजून काहीही निर्णय झालेला नाही. परंतु १५ फेबु्रवारीपासून कंपनीने जायकवाडी धरण परिसरातील माती परीक्षण सुरू केले आहे. तेथील पाणी काढल्यानंतर माती परीक्षण होईल. परीक्षणाच्या अहवालानंतर पुढील कामाचा आराखडा तयार होईल.