शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

दोषी कंपन्यांवरही कारवाई होईना

By admin | Updated: November 20, 2014 00:47 IST

उस्मानाबाद : खरीप पेरणीवेळी अनेक कंपन्यांनी उगवण क्षमता नसलेले बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले होते. याबाबत हजारोच्या संख्येने तक्रारी झाल्या होत्या.

उस्मानाबाद : खरीप पेरणीवेळी अनेक कंपन्यांनी उगवण क्षमता नसलेले बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले होते. याबाबत हजारोच्या संख्येने तक्रारी झाल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून बियाणे व खताचे नमुने घेवून ते तपासणीसाठी परभणी येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. परंतु, हा हंगाम सरून रबी हंगाम सुरू झाला असतानाही २२४ पैकी तब्बल १३१ नमुन्यांचा अहवाल आलेला नाही. तर दुसरीकडे रबीसाठीच्या बियाण्याचे २७ नमुने पाठविले असता त्याचाही अहवाल अप्राप्त आहे. त्यातच जे बियाणे उत्पादक दोषी आढळून आले, त्यांच्यावरही कारवाई करण्यात येत नसल्याने या कंपन्यांना प्रशासन अभय तर देत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.पाऊस उशिरा झाल्याने खरीप पेरणी लांबली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारपेठेत उपलब्ध असेल ते बियाणे खरेदी करून पेरणी केली. नेमकी हीच संधी साधत काही कंपन्यांनीही शेतकऱ्यांच्या माथी उगवण क्षमता नसलेले बियाणे मारले. याबाबत हजारोच्या संख्येने कृषी विभागाकडे तक्रारी आल्या होत्या. त्यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध प्रकारच्या बियाण्याचे २२४ नमुने घेवून ते परभणी येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. मात्र, हा हंगाम सरून रबी पेरणीचा कालावधीही संपत आला आहे. असे असतानाही आजवर अवघ्या ९३ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे आणखी १३१ नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. ९३ पैकी थोडेथोडके नव्हे, तर चक्क ६६ नमुने अप्रमाणित म्हणजेच पेरणीयोग्य नव्हते. यातील ४९ नमुने हे कोर्ट केसेस पात्र होते. मात्र, ही कारवाई तातडीने करण्याचे सौजन्य खुद्द कृषी विभागाकडून दाखविले गेलेले नाही. ‘कार्यवाही सुरू आहे’, असे बेधडक उत्तर अधिकारी देत आहेत. त्यामुळे उर्वरित १३१ नमुन्यांचे अहवाल येणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. खताच्या बाबतीतही अशीच स्थिती आहे. १८४ नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी १४ नमुने हे अप्रमाणित आढळून आले. यातील ११ नमुने ताकीदपात्र तर उर्वरित ३ नमुने कोर्ट केसेसपात्र आहेत. यांच्यावरही अद्याप केसेस केलेल्या नाहीत. कृषी विभागाचा हा कासवगतीने सुरु असलेला कारभार शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक प्रकारचा कोपच मानला जात आहे. रबी हंगामातही २७ नमुने गोळा करण्यात आले. हेही परभणीच्या प्रयोगशाळेत पाठविले. मात्र, याचाही अहवाल उपलब्ध झालेला नाही. दर्जाहिन बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचे सिद्ध झाले आहे. यापैकी ४९ नमुने कोर्टकेसेससाठी पात्र ठरले आहेत. असे असतानाही कृषी विभागाकडून मात्र खरीप हंगाम सरला तरीही यांच्यावर कारवाई होवू शकलेली नाही. ‘आमची कार्यवाही सुरु आहे’ असे वेळा मारुन नेणारे उत्तर अधिकारी देत आहेत. त्यामुळे दोषींविरुद्ध कारवाई करण्यास विलंब का लावला जातोय असा सवाल आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतून उपस्थित केला जावू लागला आहे.कडक कारवाईची गरजकृषी विभागाकडून दरवर्षीच बियाणांचे नमुने घेवून तपासणी केली जाते. दोषी असणाऱ्यांविरुद्ध उशिरा का होईना कारवाईही होते. मात्र बोगसगिरी करणाऱ्यांना चाप बसत नाही. त्यामुळे अशा बियाणे उत्पादक कंपन्यावर कृषी विभागाने कठोर कारवाई करण्याची गरज शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.