शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

पुढील आंदोलन उत्तर नगरचे ‘दूध बंद’

By admin | Updated: November 28, 2014 01:17 IST

औरंगाबाद : जायकवाडी पाणी नियोजन व हक्क संघर्ष समितीतर्फे आज क्रांतीचौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी ‘साखरसम्राटांना आवरा’ अशा घोषणांनी परिसर

औरंगाबाद : जायकवाडी पाणी नियोजन व हक्क संघर्ष समितीतर्फे आज क्रांतीचौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी ‘साखरसम्राटांना आवरा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. यापुढील आंदोलन उत्तर नगर जिल्ह्यातील ‘दूध बंद’ असून जनतेने नगरचे दूध घेणे बंद करावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष जयाजी सूर्यवंशी यांनी केले आहे. आजच्या निदर्शनात सतनामसिंग गुलाटी, मंगल ठोंबरे, राहुल मगरे, दत्तू पवार, संजय नागरे, गणेश वडकर, डॉ. विजय डक, सुशील भिसे, विजय काकडे, कल्याण देहाडे, खमरखान, सीताराम सपकाळ, संतोष पवार, संतोष चौधरी, अशोक चक्रे, अशोक पवार आदींसह गेवराई, पैठण व औरंगाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांनी भाग घेतला. यासंदर्भात जयाजी सूर्यवंशी यांनी म्हटले आहे की, जायकवाडी धरणामध्ये समन्यायी पद्धतीने पाणी सोडण्याचा निर्णय शासकीय स्तरावर दोन दिवसांमध्ये होण्याची शक्यता होती. त्यामुळे मराठवाड्यास त्यांच्या हक्काचे पाणी मिळूच न देण्याचा चंग उत्तर नगर जिल्ह्यातील साखरसम्राटांनी बांधला आहे. गतवर्षी कोल्हे- पिचड विरोध करीत होते. आता विखे विरोध करीत आहेत. जायकवाडीत पाणी सोडण्याची वेळ आली की न्यायालयीन प्रकियेत अडकवून टाकण्याचे धोरण साखरसम्राटांनी अवलंबिले आहे. मराठवाडा दुष्काळाने होरपळत असताना मदत करण्याऐवजी स्वत:च्या पोळीवर तूप ओढण्याच्या धोरणाविरोधात आमची ही निदर्शने आहेत. जायकवाडीत वरील धरणांतून २७ टीएमसी पाणी सोडणे आवश्यक आहे. तरीही मुख्यमंत्री न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून २२ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेऊ शकतात, हे ओळखून न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकवून टाकून पाणी सोडण्याची प्रक्रिया लांबविण्याचे धोरण उत्तर नगरच्या साखरसम्राटांनी स्वीकारल्याचे दिसून येते. कर्जत, जामखेड, नगर, पारनेर, श्रीगोंदा, पाथर्डी व शेवगाव हे तालुके दुष्काळी आहेत. त्यांच्याबद्दल या मंडळींनी कधी सहानुभूती दाखविलेली नाही. \जायकवाडी धरणातून फक्त मराठवाड्यासाठी पाणी मिळत नाही, तर शेवगाव व नेवासा या तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा लाभ होत आहे. तेथील पाच साखर कारखाने जायकवाडीच्याच पाण्यावर अवलंबून आहेत.४ तसेच शंभर गावांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा जायकवाडीतूनच केला जातो, याकडेही जयाजी सूर्यवंशी यांनी लक्ष वेधले आहे. दूध बंद आंदोलनाबद्दलही त्यांनी सूतोवाच केले.