शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

नगरपालिकांनी टंचाई कक्ष स्थापन करावा

By admin | Updated: November 29, 2014 00:28 IST

जालना : जिल्ह्यातील जालना, भोकरदन, अंबड व परतूर येथील कार्यक्षेत्रातील नगरपालिकांनी पाणी टंचाईच्या निवारणासाठी सज्ज व्हावे, अशी सूचना जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी केली आहे

जालना : जिल्ह्यातील जालना, भोकरदन, अंबड व परतूर येथील कार्यक्षेत्रातील नगरपालिकांनी पाणी टंचाईच्या निवारणासाठी सज्ज व्हावे, अशी सूचना जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी केली आहे. प्रत्येक नगरपालिकांनी टंचाई कक्ष स्थापन करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.शुक्रवारी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी वरील आदेश दिले. जिल्हाधिकारी नायक यांनी म्हटले आहे की, टंचाई निवारण तसेच नागरिकांना विविध योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्वरीत पाणीपुरवठा व नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील विविध कामांचे आराखडे तयार करावेत. जिल्ह्यातील चारही नगरपालिकांनी नागरिकांना विविध सेवा देण्यासाठी कार्यरत राहून पाणी टंचाई भासणार नाही, यासाठी बोअरवेलची कामे, नादुरूस्त झालेली पाईप लाईन, पाणी गळती इत्यादी कामे त्वरीत करावी. रहिवाशांना पाणी उपलब्ध होईल. तसेच नगरपालिकांच्या विविध कामांबाबत जसे दलित वस्ती सुधारणा करणे, मालमत्ता व पाणीपट्टी व विविध कर वसुलीसाठी कॅम्प लावणे, कामाचे मंजुरी आदेश काढणे इत्यादी बाबत बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या.कर्मचाऱ्यांच्या पदाबाबत संवर्गनिहाय माहिती तयार करून रिक्त जागांचा आढावा द्यावा. सेवापुस्तिके अद्ययावत करावीत, रोस्टर तपासण्या करणे, तेराव्या वित्त आयोगाकडून प्राप्त झालेले अनुदान व केलेली कामे तसेच उपयोगिता प्रमाणपत्र इत्यादीबाबत यावेळी चर्चा झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात टंचाई सदृश परिस्थिती असल्यामुळे कर्मचारी व अधिकारी यांच्या रजा मंजूर झाल्याशिवाय मुख्यालय सोडू नये अशी सूचनाही यावेळी केली. या आढावा बैठकीस उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. एन.आर. शेळके, जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण भगवान वीर, नगररचनाकार खरवडकर, तहसीलदार अनिता भालेराव आदी उपस्तिि होते. (प्रतिनिधी)