शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

महावितरणला ६० लाखांचा फटका

By admin | Updated: November 28, 2014 01:10 IST

संजय कुलकर्णी , जालना जिल्ह्यात वीज गळतीचे प्रमाण २०-२२ टक्क्यांवर आल्याचा दावा वीज वितरण कंपनीकडून केला जात असला तरी केवळ आठ महिन्यात

संजय कुलकर्णी , जालनाजिल्ह्यात वीज गळतीचे प्रमाण २०-२२ टक्क्यांवर आल्याचा दावा वीज वितरण कंपनीकडून केला जात असला तरी केवळ आठ महिन्यात या चोरीच्या प्रकारांमुळे महावितरणला ६० लाखांचा फटका सहन करावा लागत आहे. मात्र वीज चोरांमुळे एकीकडे लाखोंचे नुकसान सहन करणाऱ्या या कंपनीने एखाद्या ग्राहकाने देयकांचा भरणा करण्यास थोडाफार विलंब केला तरी त्याची वीज तोडण्याचा सपाटा सुरू केला आहे. जिल्ह्यात सध्या दुष्काळजन्य स्थिती आहे. मात्र या पूर्वीपासून ग्रामीण भागात सुमारे ४०० गावांमध्ये रोहित्रे जळालेल्या अवस्थेत असल्याने तेथे नवीन रोहित्रांची प्रतीक्षा आहे. रोहित्रांअभावी वीज पुरवठा बंद असल्याने शेतकऱ्यांना पाणी असतानाही विद्युत पंपाद्वारे पिकांना पाणी देता येत नाही. ज्या गावात रोहित्रे सुरू आहेत, पाणी देखील उपलब्ध आहे, अशा ठिकाणी महावितरणने आता देयकांच्या थकबाकीपोटी वीज तोडण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणामुळे एकीकडे शेतकरी संकटात असताना आता महावितरणच्या लहरीपणामुळे ज्या भागात पाणी आहे, तो शेतकरी देखील संकटात सापडला, हे वास्तव आहे. ‘लोकमत’ ने २५ व २६ नोव्हेंबर रोजी स्टींग आॅपरेशनद्वारे शहरी भागात खुलेआम सुरू असलेल्या वीज चोरीचा पर्दाफाश केला. ही चोरी उघड करण्यात आम्ही असमर्थ असल्याचे वीज वितरण कंपनीतीलच काही अधिकाऱ्यांनी सांगितले. वीज वितरण कंपनीच्या पोलिस ठाण्यात एप्रिल ते आॅक्टोबर २०१४ या कालावधीत वीज चोरी प्रकरणी १४३५ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. जालना शहरात १८२ तर तालुक्यात ५२१ वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आली. बदनापूर १२६, भोकरदन १३३, जाफराबाद ३५१, अंबड ३६३, परतूर ६७, घनसावंगी ३१७, मंठा तालुक्यात २११ प्रकरणे उघडकीस आली आहेत. वीज चोरी रोखण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा मात्र महावितरणकडून केला जात आहे. ४याबाबत अधीक्षक अभियंता बी.टी. पानढवळे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, वीज गळतीचे प्रमाण जिल्ह्यात २० ते २२ टक्के आहे. परंतु हे प्रमाण आणखी कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. वीज चोरीच्या उघडकीस आलेल्या प्रकरणांमुळे ५९.३७ लाखांचे नुकसान कंपनीला गेल्या आठ महिन्यांमध्ये सोसावे लागले आहे. दंडाची रक्कम वसूल केली जात आहे, असेही पानढवळे यांनी सांगितले.