शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

चालू वर्षी सर्वाधिक आत्महत्या

By admin | Updated: November 21, 2014 00:48 IST

बीड : सततच्या दुष्काळीस्थितीमुळे जगणेच कठीण होऊन बसलेले शेतकरी निराशेपोटी टोकाचे पाऊल उचलत आहेत़ मागील १४ वर्षांमध्ये कधीच झाल्या नव्हत्या इतक्या आत्महत्या

बीड : सततच्या दुष्काळीस्थितीमुळे जगणेच कठीण होऊन बसलेले शेतकरी निराशेपोटी टोकाचे पाऊल उचलत आहेत़ मागील १४ वर्षांमध्ये कधीच झाल्या नव्हत्या इतक्या आत्महत्या यावर्षी झाल्या आहेत़ तब्बल ८६ शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले, त्यापैकी फक्त ५९ शेतकऱ्यांच्या कुटंबियांना मदत मिळाली़कवी सुरेश भट यांची एक कविता प्रसिद्ध आहे़ ‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते...’ अशा या हृदय हेलावून टाकणाऱ्या पंक्ती! इथे तर जगण्याने छळलेच आहे; परंतु मरणानंतरही दुर्दैव पाठ सोडायला तयार नाही़ मागील चौदा वर्षांतील शेतकरी आत्महत्येच्या तुलनेत यावर्षी झालेल्या आत्महत्यांचा आकडा अधिक आहे़ ८६ पैकी केवळ ५९ आत्महत्या पात्र ठरल्या असून त्या सर्वांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे़ आत्महत्येनंतर शेतकरी कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत दिली जाते; परंतु त्यासाठी पात्र- अपात्रतेच्या कसोटी पार करावी लागते़ शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्यालाही पात्र- अपात्रतेत तोलले जाते़ पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच मदतीचा हात पुढे केला जातो़ कर्ता पुरुष गेल्यावर आयुष्यभर पांढरे कपाळ घेऊन मुलाबाळांसह जगणाऱ्या महिलांच्या हातावर लाख रुपये टेकविल्यावर सरकार त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही़ शेतकरी आत्महत्येचं मोल लाखभर रुपयांत होऊच शकत नाही़ आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाय केले पाहिजेत, असे शेतकरी संघटनेचे मराठवाडा प्रमुख कालिदास आपेट म्हणाले़ (प्रतिनिधी)