शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

चालू वर्षी सर्वाधिक आत्महत्या

By admin | Updated: November 21, 2014 00:48 IST

बीड : सततच्या दुष्काळीस्थितीमुळे जगणेच कठीण होऊन बसलेले शेतकरी निराशेपोटी टोकाचे पाऊल उचलत आहेत़ मागील १४ वर्षांमध्ये कधीच झाल्या नव्हत्या इतक्या आत्महत्या

बीड : सततच्या दुष्काळीस्थितीमुळे जगणेच कठीण होऊन बसलेले शेतकरी निराशेपोटी टोकाचे पाऊल उचलत आहेत़ मागील १४ वर्षांमध्ये कधीच झाल्या नव्हत्या इतक्या आत्महत्या यावर्षी झाल्या आहेत़ तब्बल ८६ शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले, त्यापैकी फक्त ५९ शेतकऱ्यांच्या कुटंबियांना मदत मिळाली़कवी सुरेश भट यांची एक कविता प्रसिद्ध आहे़ ‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते...’ अशा या हृदय हेलावून टाकणाऱ्या पंक्ती! इथे तर जगण्याने छळलेच आहे; परंतु मरणानंतरही दुर्दैव पाठ सोडायला तयार नाही़ मागील चौदा वर्षांतील शेतकरी आत्महत्येच्या तुलनेत यावर्षी झालेल्या आत्महत्यांचा आकडा अधिक आहे़ ८६ पैकी केवळ ५९ आत्महत्या पात्र ठरल्या असून त्या सर्वांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे़ आत्महत्येनंतर शेतकरी कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत दिली जाते; परंतु त्यासाठी पात्र- अपात्रतेच्या कसोटी पार करावी लागते़ शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्यालाही पात्र- अपात्रतेत तोलले जाते़ पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच मदतीचा हात पुढे केला जातो़ कर्ता पुरुष गेल्यावर आयुष्यभर पांढरे कपाळ घेऊन मुलाबाळांसह जगणाऱ्या महिलांच्या हातावर लाख रुपये टेकविल्यावर सरकार त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही़ शेतकरी आत्महत्येचं मोल लाखभर रुपयांत होऊच शकत नाही़ आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाय केले पाहिजेत, असे शेतकरी संघटनेचे मराठवाडा प्रमुख कालिदास आपेट म्हणाले़ (प्रतिनिधी)