शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

भोकरदन तालुक्यातील तलावांतून सर्वाधिक गाळाचा उपसा

By admin | Updated: April 11, 2015 00:17 IST

फकिरा देशमुख , भोकरदन भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील तलावांतील गेल्या दीड महिन्यांमध्ये ५३ हजार ९०२ घनमीटर गाळ काढण्यात आल्याची माहिती

फकिरा देशमुख , भोकरदनभोकरदन व जाफराबाद तालुक्यातील तलावांतील गेल्या दीड महिन्यांमध्ये ५३ हजार ९०२ घनमीटर गाळ काढण्यात आल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. भोकरदन व जाफराबाद हे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त असल्यामुळे या तालुक्यात जलयुक्त शिवार योजने अंतर्गत विविध तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये काही ठिकाणी लोकसभागातून सुध्दा शेतकरी गाळ काढण्याची मोहीम राबवित आहेत. राजूर येथे १९ हजार ५७० घन मीटर गाळ काढण्यात आला आहे. तर बरंजळा लोखंडे येथे १८ हजार ६०० घन मीटर तर जळगाव सपकाळ येथील दोन सिमेंट नाला बांधातील ४ हजार १०० घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. जाफराबाद तालुक्यातील आंबेगाव येथे ११ हजार ६३२ घन मीटर गाळ काढण्यात आला आहे. तसेच बरंजळा साबळे येथे सुध्दा दिलासाच्या वतीने गाळ काढण्याचे काम सुरू आहे. शासनाच्या वतीने गाळ काढण्यासाठी जे़सी़बी़ व पोकलॅन्ड देण्यात येत आहे. शेतकरी ट्रॅक्टरने हा गाळ घेऊन जात आहेत. शेतामध्ये गाळ टाकल्या तर किमान तीन ते चार वर्ष या शेतामध्ये शेणखत टाकावे लागत नाही. तसेच ज्या शेतात गाळ टाकला आहे अशा जमिनीची पोत सुधारण्यास मदत होते. शिवाय उत्पादन सुध्दा वाढते तसेच ज्या तलावातून गाळ काढला आहे. अशा तलावामध्ये पाणी साठवण क्षमता वाढली जाते. पर्यायाने त्या तलावाच्या परिसरातील विहिरीची पाणी पातळी वाढते. गाळामुळे संबंधित तलाव, नालाबांधामध्ये ४२़२७ स़घ़मीटर पाणी साठा थांबणार आहे. जाफराबाद तालुक्यात ११़६३ स़घ़ मीटर पाणी साठा साठवणार आहे़भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील जे पाझर तलाव, मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी कमी झाली किंवा कोरडे झाले. अशा तलावातील गाळ काढण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. दोन महिन्यामध्ये किमान १ लाख घन मीटर गाळ काढला जाऊ शकतो. शेतकऱ्यांनी जलयुक्त शिवार योजनेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सन २०१३ मध्ये दानापूर येथील जुई मध्यम प्रकल्प कोरडा झाला होता. त्यावेळी लोकसहभाग तसेच सेवाभावी संस्थेच्या वतीने तसेच काही प्रतिष्ठितांनी या धरणातील गाळ काढण्यासाठी जे़सी़बी़ व पोकलॅन्ड देऊन या धरणातील १ लाख ब्रास गाळ काढला होता. त्यामुळे या धरणात २८३ टी़सी़एम़पाणीसाठा वाढला असल्याचे लघुसिंचन जलसंधारण विभागाचे कनिष्ट अभियंता आरक़े़ जाधव यांनी सांगितले. जर एवढा पाणी साठवयाचे झाल्यास किमान दोन पाझर तलाव नव्याने करावे लागले असते. त्यामुळे ज्या भागातील तलाव, मध्यम प्रकल्प, सिमेंट बांध कोरडे झाले असतील त्यामधील गाळ काढून शेतकऱ्यांनी शेतात टाकला तर उत्पादनात सुध्दा मोठी वाढ होते, असे जाधव यांनी सांगितले़भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना आपल्या परिसरातील तलावातील गाळ काढून तो आपल्या शेतामध्ये टाकावयाचा आहे. अशा शेतकऱ्यांनी किंवा या परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन लोकसभागातून जे़सी़बी़ लावले तर या मशीनसाठी शासनाच्या वतीने डिझेलचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या दुष्काळामध्ये आपल्या शेतामध्ये गाळ टाकावा. तसेच येणाऱ्या दोन महिन्यांमध्ये भोकरदन तालुक्यातील धामणा मध्यम प्रकल्प जाफराबाद तालुक्यातील मध्यम प्रकल्पातील गाळ काढण्याचे नियोजन करून त्यामधील गाळ काढण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी पाझर तलावातील पाणी पातळी कमी झाली अशा ठिकाणचा सुध्दा गाळ काढण्यात येणार आहे.