शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
5
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
6
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
7
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
8
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
9
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
10
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
11
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
12
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
13
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
14
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
15
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
16
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
17
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
18
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
19
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
20
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'

आणखी हवे ८ हजार ८६६ क्विंटल बियाणे

By admin | Updated: June 20, 2014 00:07 IST

हिंगोली : खरीप हंगामासाठी जिल्ह्याला एकुण १ लाख ५७ हजार ५४ क्विंटल बियाणांची आवश्यकता होती. त्यापैकी १ लाख ४८ हजार १८८ क्विंटल बियाणे प्राप्त झाले आहे.

हिंगोली : खरीप हंगामासाठी जिल्ह्याला एकुण १ लाख ५७ हजार ५४ क्विंटल बियाणांची आवश्यकता होती. त्यापैकी १ लाख ४८ हजार १८८ क्विंटल बियाणे प्राप्त झाले आहे. आणखी ८ हजार ८६६ क्विंटल बियाणे जिल्ह्याला आवश्यक आहे.जिल्ह्यात खरीप हंगामाचे २ लाख ९ हजार ४०६ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित क्षेत्र आहे. त्यामध्ये हिंगोली तालुक्याचे ५१ हजार हेक्टर, औंढा नागनाथ तालुक्याचे ३७ हजार हेक्टर प्रस्तावित क्षेत्र आहे. तसेच वसमत तालुक्याचे २६ हजार ४०६ हेक्टर, कळमनुरी तालुक्याचे ३९ हजार आणि सेनगाव तालुक्याचे ५६ हजार हेक्टर प्रस्तावित क्षेत्र आहे. या संपुर्ण क्षेत्रासाठी जिल्ह्याला १ लाख ५७ हजार ५४ क्विंटल बियाणे आवश्यक होते. त्यामध्ये हिंगोलीसाठी ३८ हजार २५० क्विंटल, औंढा नागनाथसाठी २७ हजार ७५० क्विंटल, वसमतसाठी १९ हजार ८०४ क्विंटल व कळमनुरीसाठी २९ हजार २५० क्विंटल आणि सेनगाव तालुक्यासाठी ४२ हजार क्विंटल बियाणे गरजेचे होते. त्यानुसार नोंदणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने राज्य शासनाकडे नोंदविली होती. त्यानुसार जिल्ह्याला आतापर्यंत एकुण १ लाख ४८ हजार १८८ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले. त्यामध्ये शेतकऱ्यांकडून ४७ हजार १०९ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले असून महामंडळाकडून ३ हजार ३७९ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले. आता आणखी ८ हजार ८६६ क्विंटल बियाणे जिल्ह्याला आवश्यक आहे. महामंडळाकडून पुन्हा ४ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय नाब्दे यांनी दिली.उगवण क्षमता पाहून बीज प्रक्रिया करावी-नाब्देशेतकऱ्यांनी शक्यतो स्वत:कडील बियाणांची पेरणी करावी. तत्पुर्वी त्या बियाणांची उगवण क्षमता पाहून बीज प्रक्रिया करावी, असे आवाहन नाब्दे यांनी केले आहे. कमीत-कमी ७० ते १०० मि. मी. पाऊस झाला तरच शेतकऱ्यांनी पेरणीचा विचार करावा. पेरणी योग्य पाऊस झाला नसल्यास शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असेही नाब्दे म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)प्रत्येक दुकानावर कृषी विभागाचा कर्मचारीखरीप हंगामाच्या कालावधीत कृषी केंद्रांवरून बियाणे व खतांची विक्री केली जाते. अशा वेळी शेतकऱ्यांची पिळवणूक किंवा अडवणूक होवू नये, यासाठी प्रत्येक खासगी कृषी केंद्रांवर कृषी विभागाचा कर्मचारी नियुक्त केला जाणार आहे. त्यानुसार औंढा नागनाथ तालुक्यात ३६, वसमत तालुक्यात ४१, हिंगोली तालुक्यात ४३, कळमनुरी तालुक्यात ३२ व सेनगाव तालुक्यात ३९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे नाब्दे म्हणाले.भरारी पथकांची स्थापनाशेतकऱ्यांच्या हितासाठी प्रत्येक तालुकास्तरावर कृषी विभागाच्या वतीने एक भरारी पथक नियुक्त करण्यात येणार असून त्यामध्ये पाच कर्मचारी राहणार आहेत. या शिवाय जिल्हास्तरावरही एक भरारी पथक स्थापन करण्यात येणार असल्याचे नाब्दे म्हणाले.