शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

आणखी हवे ८ हजार ८६६ क्विंटल बियाणे

By admin | Updated: June 20, 2014 00:07 IST

हिंगोली : खरीप हंगामासाठी जिल्ह्याला एकुण १ लाख ५७ हजार ५४ क्विंटल बियाणांची आवश्यकता होती. त्यापैकी १ लाख ४८ हजार १८८ क्विंटल बियाणे प्राप्त झाले आहे.

हिंगोली : खरीप हंगामासाठी जिल्ह्याला एकुण १ लाख ५७ हजार ५४ क्विंटल बियाणांची आवश्यकता होती. त्यापैकी १ लाख ४८ हजार १८८ क्विंटल बियाणे प्राप्त झाले आहे. आणखी ८ हजार ८६६ क्विंटल बियाणे जिल्ह्याला आवश्यक आहे.जिल्ह्यात खरीप हंगामाचे २ लाख ९ हजार ४०६ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित क्षेत्र आहे. त्यामध्ये हिंगोली तालुक्याचे ५१ हजार हेक्टर, औंढा नागनाथ तालुक्याचे ३७ हजार हेक्टर प्रस्तावित क्षेत्र आहे. तसेच वसमत तालुक्याचे २६ हजार ४०६ हेक्टर, कळमनुरी तालुक्याचे ३९ हजार आणि सेनगाव तालुक्याचे ५६ हजार हेक्टर प्रस्तावित क्षेत्र आहे. या संपुर्ण क्षेत्रासाठी जिल्ह्याला १ लाख ५७ हजार ५४ क्विंटल बियाणे आवश्यक होते. त्यामध्ये हिंगोलीसाठी ३८ हजार २५० क्विंटल, औंढा नागनाथसाठी २७ हजार ७५० क्विंटल, वसमतसाठी १९ हजार ८०४ क्विंटल व कळमनुरीसाठी २९ हजार २५० क्विंटल आणि सेनगाव तालुक्यासाठी ४२ हजार क्विंटल बियाणे गरजेचे होते. त्यानुसार नोंदणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने राज्य शासनाकडे नोंदविली होती. त्यानुसार जिल्ह्याला आतापर्यंत एकुण १ लाख ४८ हजार १८८ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले. त्यामध्ये शेतकऱ्यांकडून ४७ हजार १०९ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले असून महामंडळाकडून ३ हजार ३७९ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले. आता आणखी ८ हजार ८६६ क्विंटल बियाणे जिल्ह्याला आवश्यक आहे. महामंडळाकडून पुन्हा ४ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय नाब्दे यांनी दिली.उगवण क्षमता पाहून बीज प्रक्रिया करावी-नाब्देशेतकऱ्यांनी शक्यतो स्वत:कडील बियाणांची पेरणी करावी. तत्पुर्वी त्या बियाणांची उगवण क्षमता पाहून बीज प्रक्रिया करावी, असे आवाहन नाब्दे यांनी केले आहे. कमीत-कमी ७० ते १०० मि. मी. पाऊस झाला तरच शेतकऱ्यांनी पेरणीचा विचार करावा. पेरणी योग्य पाऊस झाला नसल्यास शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असेही नाब्दे म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)प्रत्येक दुकानावर कृषी विभागाचा कर्मचारीखरीप हंगामाच्या कालावधीत कृषी केंद्रांवरून बियाणे व खतांची विक्री केली जाते. अशा वेळी शेतकऱ्यांची पिळवणूक किंवा अडवणूक होवू नये, यासाठी प्रत्येक खासगी कृषी केंद्रांवर कृषी विभागाचा कर्मचारी नियुक्त केला जाणार आहे. त्यानुसार औंढा नागनाथ तालुक्यात ३६, वसमत तालुक्यात ४१, हिंगोली तालुक्यात ४३, कळमनुरी तालुक्यात ३२ व सेनगाव तालुक्यात ३९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे नाब्दे म्हणाले.भरारी पथकांची स्थापनाशेतकऱ्यांच्या हितासाठी प्रत्येक तालुकास्तरावर कृषी विभागाच्या वतीने एक भरारी पथक नियुक्त करण्यात येणार असून त्यामध्ये पाच कर्मचारी राहणार आहेत. या शिवाय जिल्हास्तरावरही एक भरारी पथक स्थापन करण्यात येणार असल्याचे नाब्दे म्हणाले.