शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

पाण्यासाठी मनसेचे आंदोलन

By admin | Updated: January 31, 2017 00:11 IST

लातूर : शहरातील प्रभाग क्र. २ मध्ये पिण्याच्या पाण्यासह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले.

लातूर : शहरातील प्रभाग क्र. २ मध्ये पिण्याच्या पाण्यासह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रभागातील नागरिकांच्या वतीने मनपा आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. लातूर शहरातील प्रभाग क्र. २ मध्ये मळवटी रोड परिसरातील सिद्धेश्वर नगर, अब्दुल कलाम नगर, जयनगर, सनतनगर, बरकत नगर, हरिभाऊ नगर आदी परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या परिसरात पाईपलाईनही करण्यात आली नाही. त्यामुळे कुपनलिका आणि बोअरचा नागरिकांना आधार घ्यावा लागतो. महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या बोअरला मोटार बसविण्यात आली नाही. त्यामुळे बरकतनगर, मळवटी रोड व सनतनगर या भागातील नागरिकांचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. काही भागांत पथदिवे आणि विजेची सोय करण्यात आली नाही. तर आदमनगर, हिमायत नगर, सिद्धेश्वर नगर, सम्राट अशोक नगर, अब्दुल कलाम नगर आदी नगरांत पक्क्या रस्त्यांअभावी नागरिकांची गैरसोय होत आहे. हरिभाऊ नगर येथील खणी भागात गटारींची व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे रस्त्यांवर चिखल होत आहे. परिणामी, अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याकडे मनपा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या मूलभूत प्रश्नांसाठी नागरिकांनी मनपा प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिली आहेत. मात्र या समस्या प्रशासनाने सोडविल्या नाहीत. मनपा प्रवेशद्वारासमोर मनसेच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी नागरिकांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)