शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

कोट्यवधीचा घोटाळा !

By admin | Updated: March 30, 2015 00:40 IST

उस्मानाबाद : शहरातील एका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर दाखल गुन्ह्यात ‘बीएचआर’ संस्थेचे संचालक जेरबंद करण्यात आले आहेत़

उस्मानाबाद : शहरातील एका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर दाखल गुन्ह्यात ‘बीएचआर’ संस्थेचे संचालक जेरबंद करण्यात आले आहेत़ त्यामुळे आता तक्रारी करणाऱ्यांचा ओघ वाढला असून, आजवर २५ जणांनी ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत़ वाढत्या तक्रारी पाहता फसवणूक करून घोटाळा केल्याची रक्कम कोट्यवधीच्या घरात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ दरम्यान, या प्रकरणात एका शाखा व्यवस्थापकालाही पोलिसांनी रविवारी जेरबंद केले़शहरात वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ़ पालकर यांनी ‘बीएचआर’ संस्थेच्या शहरातील शाखेत ठेवलेली ठेव वारंवार मागणी करूनही परत मिळत नसल्याने फसवणूक झाल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली होती़ या तक्रारीवरून २० डिसेंबर रोजी संस्थेच्या संचालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या संस्थेच्या संचालकांनी फसवणूक केल्याची गुन्हे राज्यात अनेक ठिकाणी दाखल करण्यात आले आहेत़ याच प्रकरणात जळगाव येथील कारागृहात असलेले संस्थेचे संचालक प्रमोद भाईचंद रासोयनी, मोतीलाल ओंकार गिरी, दिलीप कांतीलाल चोरडीया, सुरजमल बभुमल जैन, यशवंत ओंकार गिरी, शेख मजान अब्दुल नबी, इंद्रकुमार आत्माराम लालवानी, जितेंद्र यशवंत महाजन, भगवान हिरामन वाघ, राजाराम काशीनाथ कोळी, भागवत संपत माळी, दादा रामचंद्र पाटील या बारा जणांना शहर पोलिसांनी २५ मार्च रोजी ताब्यात घेतले होते़ या सर्वच संचालकांना २६ मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना ३० मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती़ दरम्यान, संचालकांना जेरबंद करण्यात आल्याचे समजताच शहरासह ग्रामीण भागातील जवळपास २५ जणांनी शहर पोलीस ठाण्यात आपली फसवणूक झाल्याच्या तक्रारी दिल्या आहेत़ या सर्वांची रक्कम जवळपास ५० ते ६० लाखांच्या आसपास आहे़ येणाऱ्या तक्रारींचा ओघ दिवसेंदिवस वाढतच असून, हा आकडा कोट्यवधीच्या घरात जाण्याची आहे. (प्रतिनिधी)