शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

व्यापाऱ्यांनी गावांच्या विकासाकडे वळावे

By admin | Updated: March 30, 2015 00:40 IST

जालना: येथील व्यापारी, उद्योजकांनी मागील तीन वर्षांपासून घाणेवाडी जलसंरक्षक मंचच्या माध्यमातून घाणेवाडी जलाशयातील गाळ काढण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबविला आहे.

जालना: येथील व्यापारी, उद्योजकांनी मागील तीन वर्षांपासून घाणेवाडी जलसंरक्षक मंचच्या माध्यमातून घाणेवाडी जलाशयातील गाळ काढण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबविला आहे. याच धर्तीवर आता व्यापाऱ्यांनी व उद्योजकांनी गावा- गावातील नदी, नाले रुंदीकरण करून गावांच्या विकासासाठी हातभार लावावा, असे आवाहन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.रविवारी सकाळी १० वाजता घाणेवाडी जलाशयातील गाळ उपसा कार्यक्रमास त्यांनी भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते. लोणीकर म्हणाले की, जालना शहराचा पाणी योजना करताना मागील सरकारने कोणतेही नियोजन केले नाही. शहराला पाणी पुरेल की नाही याचा अंदाज न घेता २३३ कोटीची नवीन योजना केली. तसे न करता याच घाणेवाडी तलावास २५ कोटी खर्च केला असता तर एक चांगला पर्याय उभा राहिला असता, असे सांगून लोणीकर म्हणाले की, जलसंरक्षक मंचने चांगल्या पद्धतीने लोकचळवळ उभी करून घाणेवाडीतील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढविली आहे. आणि अजुनही ते प्रयत्न करीतच आहे. या ठिकाणी कितीही प्रयत्न केले, तरी ते कमीच पडतील त्यामुळे व्यापाऱ्यांनी आता ग्रामीण भागाकडे वळावे. येथील प्रत्येक व्यापारी उद्योजकांनी गावे दत्तक घेवून त्या- त्या गावातील नदी, नाले रूंदीकरणासाठी पुढाकार घ्यावा. त्यामुळे ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होईल. प्रत्येक व्यापाऱ्यांनी आपल्या करातील २ टक्के रक्क अशा कार्यास दिल्यास विकासा मोठी मदत होईल. व्यापाऱ्यांनी भरलेल्या करातून शासन ३२ टक्के रक्कम विकासासाठी वापरतात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी विविध करातून प्राप्त होणारी ६२ टक्के रक्कम देण्याचे जाहीर केले असल्याचेही लोणीकर यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, माजी आ. अरविंद चव्हाण, सुनील आर्दड, जलसंरक्षक मंचचे भाईश्री पटेल, सुनीलभाई रायठठ्ठा, शिवरतन मुदंडा, मोतीराम अग्रवाल, प्रवीण भानुशाली, हेमंत ठक्कर, विनायक देहेडकर, भावेश पटेल, शिवप्रकाश चित्तळकर, प्रीतम लोणगावकर, सुभाष देवीदान, अनिल सोनी, गोवर्धन अग्रवाल, सुखदेव बाजाज, घनश्याम जिंदल, जयंतीभाई गणात्रा, नरेश गुप्ता, हेमंत ठक्कर आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)