शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
4
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
5
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
6
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
7
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
8
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
9
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
10
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
11
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
12
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
13
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
14
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
15
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
16
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
17
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
18
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
19
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
20
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू

व्यापाऱ्यांनी गावांच्या विकासाकडे वळावे

By admin | Updated: March 30, 2015 00:40 IST

जालना: येथील व्यापारी, उद्योजकांनी मागील तीन वर्षांपासून घाणेवाडी जलसंरक्षक मंचच्या माध्यमातून घाणेवाडी जलाशयातील गाळ काढण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबविला आहे.

जालना: येथील व्यापारी, उद्योजकांनी मागील तीन वर्षांपासून घाणेवाडी जलसंरक्षक मंचच्या माध्यमातून घाणेवाडी जलाशयातील गाळ काढण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबविला आहे. याच धर्तीवर आता व्यापाऱ्यांनी व उद्योजकांनी गावा- गावातील नदी, नाले रुंदीकरण करून गावांच्या विकासासाठी हातभार लावावा, असे आवाहन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.रविवारी सकाळी १० वाजता घाणेवाडी जलाशयातील गाळ उपसा कार्यक्रमास त्यांनी भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते. लोणीकर म्हणाले की, जालना शहराचा पाणी योजना करताना मागील सरकारने कोणतेही नियोजन केले नाही. शहराला पाणी पुरेल की नाही याचा अंदाज न घेता २३३ कोटीची नवीन योजना केली. तसे न करता याच घाणेवाडी तलावास २५ कोटी खर्च केला असता तर एक चांगला पर्याय उभा राहिला असता, असे सांगून लोणीकर म्हणाले की, जलसंरक्षक मंचने चांगल्या पद्धतीने लोकचळवळ उभी करून घाणेवाडीतील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढविली आहे. आणि अजुनही ते प्रयत्न करीतच आहे. या ठिकाणी कितीही प्रयत्न केले, तरी ते कमीच पडतील त्यामुळे व्यापाऱ्यांनी आता ग्रामीण भागाकडे वळावे. येथील प्रत्येक व्यापारी उद्योजकांनी गावे दत्तक घेवून त्या- त्या गावातील नदी, नाले रूंदीकरणासाठी पुढाकार घ्यावा. त्यामुळे ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होईल. प्रत्येक व्यापाऱ्यांनी आपल्या करातील २ टक्के रक्क अशा कार्यास दिल्यास विकासा मोठी मदत होईल. व्यापाऱ्यांनी भरलेल्या करातून शासन ३२ टक्के रक्कम विकासासाठी वापरतात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी विविध करातून प्राप्त होणारी ६२ टक्के रक्कम देण्याचे जाहीर केले असल्याचेही लोणीकर यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, माजी आ. अरविंद चव्हाण, सुनील आर्दड, जलसंरक्षक मंचचे भाईश्री पटेल, सुनीलभाई रायठठ्ठा, शिवरतन मुदंडा, मोतीराम अग्रवाल, प्रवीण भानुशाली, हेमंत ठक्कर, विनायक देहेडकर, भावेश पटेल, शिवप्रकाश चित्तळकर, प्रीतम लोणगावकर, सुभाष देवीदान, अनिल सोनी, गोवर्धन अग्रवाल, सुखदेव बाजाज, घनश्याम जिंदल, जयंतीभाई गणात्रा, नरेश गुप्ता, हेमंत ठक्कर आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)