शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

मोलकरणींना अनेक दरवाजे बंद; कुटुंबाचा गाडा चालणार कसा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:05 IST

औरंगाबाद : मागच्यावर्षी लॉकडाऊन लागले आणि मोलकरणींच्या कामावर गदा आली. यावर्षीही पुन्हा तेच होईल की काय, अशी धास्ती ...

औरंगाबाद : मागच्यावर्षी लॉकडाऊन लागले आणि मोलकरणींच्या कामावर गदा आली. यावर्षीही पुन्हा तेच होईल की काय, अशी धास्ती निर्माण झाली असून कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आता मोलकरणींसाठी अनेक घरांचे दरवाजे बंद करणारी ठरली आहे. यामुळे कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा, हा प्रश्न आता अनेक मोलकरणींना पडला आहे. मोलमजुरी करणारी एक महिला कमीतकमी ४ ते ५ घरची कामे करत असते. तिच्या घरचे लोकही कामानिमित्त इतर ठिकाणी जात असतात. त्यामुळे तिच्या संपर्कात दररोज येणाऱ्या व्यक्ती पाहून तिच्यापासून आपल्या घरात कोरोनाचा संसर्ग येण्याची भीती बहुतांश गृहिणींना वाटते. त्यामुळे एकवेळ कामाचा ताण पडला तरी चालेल पण मोलकरणींच्या माध्यमातून येणारा काेरोना नकाे, असे म्हणत बऱ्याच गृहिणी मोलकरणींना कामावरून कमी करत आहेत.

आम्हालाही कामासाठी इतरांच्या घरात जाताना आमच्या जीवाची भीती वाटते. पण पोट भरण्यासाठी दुसरा इलाज नसल्याने जिवाचा धोका पत्करून आम्ही इतरांकडे कामे करतो. ज्यांना अजिबातच काम होत नाही, जे वृद्ध आहेत, असेच लोक आम्हाला याही दिवसांमध्ये कामाला बोलवितात, असे काही मोलकरणींनी सांगितले.

चौकट :

मोलकरणींची साधारण संख्या

अंदाजे ६०००

मोलकरणींच्या हाताला मिळेना काम

अंदाजे ३० टक्के

चौकट

एका घरातून कमीतकमी ६०० रुपये

औरंगाबाद शहरातील बहुसंख्य वस्त्यांमध्ये भांडी, धुणे, झाडू- फरशी या सगळ्या कामांसाठी प्रत्येकी ६०० रुपये एवढा दर आकारला जातो. काही ठिकाणी हे दर ७०० रुपये प्रतिकाम एवढेही असतात. अनेक घरांमध्ये धुणे- भांडी आणि झाडू-फरशी अशा सगळ्याच कामासाठी मोलकरीण असते. तर काही घरांमध्ये केवळ भांडी घासण्यासाठी सांगितले जाते. त्यामुळे एका मोलकरणीला एका घरातून कमीतकमी ६०० रुपये महिना तरी मिळत असतो. पोळ्या किंवा एकवेळच्या स्वयंपाकाचे दर १००० ते २००० यादरम्यान आहेत. मागील लॉकडाऊनमध्ये स्वयंपाक करण्याचे काम बहुसंख्य महिलांचे कमी झाले होते. यावेळीही रुग्ण वाढू लागताच एप्रिल महिन्यापासून अनेक घरांमध्ये स्वयंपाक करणाऱ्या मोलकरणींना कामावरून कमी करण्यात आले आहे.

चौकट :

घर कसे चालवायचे याचीच चिंता..

पुन्हा एकदा लॉकडाऊन लागले तर आपोआपच बरीचशी कामे बंद होणार. त्यामुळे उत्पन्नही थांबणार. मग घर कसे चालवायचे असा प्रश्न बहुसंख्य मोलकरणींना पडला आहे. ज्या घरी या महिला एकट्याच कमावत्या आहेत किंवा ज्यांचे पती व्यसनी आहेत, अशा महिलांची चिंता तर अधिकच वाढलेली आहे.

चौकट :

कुटुंबाचे पोट कसे भरणार

१. पतीचा व्यवसाय जेमतेम आहे आणि तोदेखील सध्या बंद पडलेला आहे. मुलीचे नुकतेच लग्न ठरले आहे. अशा परिस्थितीत जर पुन्हा लॉकडाऊन लागले तर हातात आहेत, त्यातील निम्म्याहून अधिक कामे बंद होऊन जाणार. त्यामुळे पोट कसे भरायचे हा प्रश्न तर आहेच पण लेकीच्या लग्नासाठी पैसा कसा उभा करायचा, ही चिंता पण आहे.

- मीना शेळके

२. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने एप्रिल महिन्यापासूनच दोन- तीन घरची कामे सुटली आहेत. आता पुन्हा जर रुग्ण अधिक वाढू लागले आणि लॉकडाऊन लागले तर उरलेली कामे जाण्याचीही धास्ती वाटते. आधीच महागाई एवढी वाढत असताना, पोरांचे शिक्षण चालू असताना हातातली कामे बंद होणे, आम्हाला अजिबातच परवडणारे नाही.

- कविता पवार