शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

लोकसहभागातून भाकरवाडीत गाळ उपसा

By admin | Updated: May 31, 2014 01:05 IST

काकाजी तिडके, भाकरवाडी बदनापूर तालुक्यातील भाकरवाडी येथील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन पाझर तलावातील गाळ काढण्यास सुरूवात केली आहे.

काकाजी तिडके, भाकरवाडी बदनापूर तालुक्यातील भाकरवाडी येथील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन पाझर तलावातील गाळ काढण्यास सुरूवात केली आहे. बदनापूरचे तहसीलदार बालाजी क्षीरसागर यांच्या पुढाकाराने येथील ग्रामस्थांनी तलावातील गाळ काढण्याचा संकल्प केला. लगेच २० मे रोजी मुहूर्तसुद्धा साधला. तहसीलदार क्षीरसागर यांच्या उपस्थितीत गाळ काढण्यास सुरूवात केली. यावेळी मंडळ अधिकारी बी.डी. भांबले, तलाठी अभिजीत पाटील हे उपस्थित होते. इसा पटेल, लक्ष्मण मसलकर, दादाराव तिडके, बाबासाहेब तिडके, सत्तार पटेल, सावळा हरि तिडके, समद पटेल, ज्ञानेश्वर तिडके यांच्यासह अन्य शेतकरी यावेळी उपस्थित होते. या तलावातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी जेसीबी मशिन व ट्रॅक्टर्स वापरात आणले आहेत. त्याव्दारे परिसरातील शेतकरी गाळ काढून नेऊ लागले आहेत. या गाळामुळे जमीन सुपीक होण्यास मदत होणार आहे. तलावातील गाळ शेतकर्‍यांनी न्यावा, असे आवाहन तहसीलदार क्षीरसागर यांनी केले. सोमठाण्यातही उपसा बदनापूर : तालुक्यातील सोमठाणा येथील धरणातील गाळउपसा सुरूवात करण्यात आली आहे. १२ गावात सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी विहिरी आहेत. मागील काही वर्षापासून ग्रामस्थांना पाणी टंचाईला समोरे जावे लागत होते. धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्याचा परिणाम पाणी साठवणीवर होत आहे. त्यामुळे तहसीलदार बालाजी क्षीरसागर यांच्या प्रयत्नाने लोकसहभागातून गाळ उपशास सुरूवात करण्यात आली. २६ मे रोजी क्षीरसागर यांनी गाळ उपसाच्या कामास भेट देऊन पाहणी केली. यावेळी सरपंच दत्ता नागवे, पोलिस पाटील रमेश नागवे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. दोन दिवसात या धरणातील ३०० ब्रास गाळ काढण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. ढोकसाळ, भाकरवाडी, भराडखेडा येथील ग्रामस्थांनी गाळ काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.सोमठाणा येथील हा दुधना मध्यम प्रकल्प १९६५ साली उभारण्यात आला. पावसाळ्यात यात मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक होते. या जलसाठ्याचा परिसरातील ३४ गावांतील शेतकर्‍यांना शेती पिकांसाठी फायदा होतो आहे. १२ गावांना धरण परिसरातील विहिरीवरून पाणीपुरवठा केला जातो. परंतु धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाणी साठवणुकीवर त्याचा परिणाम होतो आहे. पाणी साठवण क्षमता वाढावी म्हणून गाळ काढण्याचे काम प्रशासनाने लोकसहभागातून हाती घेतले आहे.