शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

लोकसहभागातून भाकरवाडीत गाळ उपसा

By admin | Updated: May 31, 2014 01:05 IST

काकाजी तिडके, भाकरवाडी बदनापूर तालुक्यातील भाकरवाडी येथील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन पाझर तलावातील गाळ काढण्यास सुरूवात केली आहे.

काकाजी तिडके, भाकरवाडी बदनापूर तालुक्यातील भाकरवाडी येथील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन पाझर तलावातील गाळ काढण्यास सुरूवात केली आहे. बदनापूरचे तहसीलदार बालाजी क्षीरसागर यांच्या पुढाकाराने येथील ग्रामस्थांनी तलावातील गाळ काढण्याचा संकल्प केला. लगेच २० मे रोजी मुहूर्तसुद्धा साधला. तहसीलदार क्षीरसागर यांच्या उपस्थितीत गाळ काढण्यास सुरूवात केली. यावेळी मंडळ अधिकारी बी.डी. भांबले, तलाठी अभिजीत पाटील हे उपस्थित होते. इसा पटेल, लक्ष्मण मसलकर, दादाराव तिडके, बाबासाहेब तिडके, सत्तार पटेल, सावळा हरि तिडके, समद पटेल, ज्ञानेश्वर तिडके यांच्यासह अन्य शेतकरी यावेळी उपस्थित होते. या तलावातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी जेसीबी मशिन व ट्रॅक्टर्स वापरात आणले आहेत. त्याव्दारे परिसरातील शेतकरी गाळ काढून नेऊ लागले आहेत. या गाळामुळे जमीन सुपीक होण्यास मदत होणार आहे. तलावातील गाळ शेतकर्‍यांनी न्यावा, असे आवाहन तहसीलदार क्षीरसागर यांनी केले. सोमठाण्यातही उपसा बदनापूर : तालुक्यातील सोमठाणा येथील धरणातील गाळउपसा सुरूवात करण्यात आली आहे. १२ गावात सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी विहिरी आहेत. मागील काही वर्षापासून ग्रामस्थांना पाणी टंचाईला समोरे जावे लागत होते. धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्याचा परिणाम पाणी साठवणीवर होत आहे. त्यामुळे तहसीलदार बालाजी क्षीरसागर यांच्या प्रयत्नाने लोकसहभागातून गाळ उपशास सुरूवात करण्यात आली. २६ मे रोजी क्षीरसागर यांनी गाळ उपसाच्या कामास भेट देऊन पाहणी केली. यावेळी सरपंच दत्ता नागवे, पोलिस पाटील रमेश नागवे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. दोन दिवसात या धरणातील ३०० ब्रास गाळ काढण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. ढोकसाळ, भाकरवाडी, भराडखेडा येथील ग्रामस्थांनी गाळ काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.सोमठाणा येथील हा दुधना मध्यम प्रकल्प १९६५ साली उभारण्यात आला. पावसाळ्यात यात मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक होते. या जलसाठ्याचा परिसरातील ३४ गावांतील शेतकर्‍यांना शेती पिकांसाठी फायदा होतो आहे. १२ गावांना धरण परिसरातील विहिरीवरून पाणीपुरवठा केला जातो. परंतु धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाणी साठवणुकीवर त्याचा परिणाम होतो आहे. पाणी साठवण क्षमता वाढावी म्हणून गाळ काढण्याचे काम प्रशासनाने लोकसहभागातून हाती घेतले आहे.