शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

गावोगावचे तर्कशास्त्रीही गोंधळावस्थेत

By admin | Updated: October 17, 2014 00:26 IST

जालना : जिल्ह्यातील पाचही मतदार संघात मतदानाचा टक्का अनपेक्षित वाढल्याने उमेदवारांसह राजकीय क्षेत्रातील जाणकार व गावोगावचे तर्कशास्त्रीसुद्धा गोंधळून गेले आहेत.

जालना : जिल्ह्यातील पाचही मतदार संघात मतदानाचा टक्का अनपेक्षित वाढल्याने उमेदवारांसह राजकीय क्षेत्रातील जाणकार व गावोगावचे तर्कशास्त्रीसुद्धा गोंधळून गेले आहेत.दरम्यान, कोण निवडून येईल याची खात्रीच देता येईनासे झाले असून, त्यामुळे प्रत्येक जण सावध भूमिकेत गेले आहेत.जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात निवडणुकीचा रणसंग्राम रंगला होता. कोण निवडून येणार, कोणाची विकेट पडणार यावर चांगलेच तर्क वितर्क लावले जात आहेत. यासाठी काहीजण बाबा, बुवांचाही आधार घेत जात आहे. विजयासाठी ठिक ठिकाणी पूजापाठ जोरात सुरु झाले आहेत. १५ आॅक्टोबर रोजी मतदान पार पडले. पाचही विधानसभा मतदार संघात प्रमुख पक्षांच्या मात्तबरांसह काही अपक्षांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. केलेली विकास कामे व जनतेची साथ यावर आपण निवडून येणार असा होरा बांधत आहेत. काही तर्कशास्त्रींनी तर उमेदवारांचा क्रमही लावला आहे. काही उत्साही कार्यकर्तेही तर्कशास्त्री बनले आहेत. त्यांनीच तर्कावर अधारित भविष्यवणी सुरु केली आहे. परंतु ठोस असे कोणीच सांगण्यास अथवा बोलण्यास तयार नाही. प्रत्येकजण जर तरची भाषा वापरुन काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे यापैकी कोण गती घेणार, कोण कोणचा वेध घेणार, कोणाचे काटे उलटे फिरणार यावर शहरासह ग्रामीण भागात विविध तर्कटे लढविली जात आहेत.निकाल रविवारी असला तरी मतदानाच्या टक्केवारीवरुन अनेकांनी बुथनिहाय अंदाज घेणे सुरु केले आहे. पाचही विधानसभा मतदार संघात पंचरंगी तसेच बहुरंगी लढती झाल्या. यावरुन अंदाज काढणे अवघड असले तरी काहींनी जात फॅक्टर, संघटना, समाजकार्य, उमेदवारांची पसंती यावरुन ढोबळ तर्क काढणे सुरु केले आहे. नुसत्या हवेवर तर्क वितर्कांना जोर आला आहे. ग्रामीण भागातील मंदिरे, पार, शेती वस्त्यांवर तर्कावर अधारित चर्चा रंगात आल्या आहेत. जो तो तर्कशास्त्री बनून हेच निवडून येणार असा दावा ठोकत आहेत. (प्रतिनिधी)