शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गावोगावचे तर्कशास्त्रीही गोंधळावस्थेत

By admin | Updated: October 17, 2014 00:26 IST

जालना : जिल्ह्यातील पाचही मतदार संघात मतदानाचा टक्का अनपेक्षित वाढल्याने उमेदवारांसह राजकीय क्षेत्रातील जाणकार व गावोगावचे तर्कशास्त्रीसुद्धा गोंधळून गेले आहेत.

जालना : जिल्ह्यातील पाचही मतदार संघात मतदानाचा टक्का अनपेक्षित वाढल्याने उमेदवारांसह राजकीय क्षेत्रातील जाणकार व गावोगावचे तर्कशास्त्रीसुद्धा गोंधळून गेले आहेत.दरम्यान, कोण निवडून येईल याची खात्रीच देता येईनासे झाले असून, त्यामुळे प्रत्येक जण सावध भूमिकेत गेले आहेत.जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात निवडणुकीचा रणसंग्राम रंगला होता. कोण निवडून येणार, कोणाची विकेट पडणार यावर चांगलेच तर्क वितर्क लावले जात आहेत. यासाठी काहीजण बाबा, बुवांचाही आधार घेत जात आहे. विजयासाठी ठिक ठिकाणी पूजापाठ जोरात सुरु झाले आहेत. १५ आॅक्टोबर रोजी मतदान पार पडले. पाचही विधानसभा मतदार संघात प्रमुख पक्षांच्या मात्तबरांसह काही अपक्षांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. केलेली विकास कामे व जनतेची साथ यावर आपण निवडून येणार असा होरा बांधत आहेत. काही तर्कशास्त्रींनी तर उमेदवारांचा क्रमही लावला आहे. काही उत्साही कार्यकर्तेही तर्कशास्त्री बनले आहेत. त्यांनीच तर्कावर अधारित भविष्यवणी सुरु केली आहे. परंतु ठोस असे कोणीच सांगण्यास अथवा बोलण्यास तयार नाही. प्रत्येकजण जर तरची भाषा वापरुन काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे यापैकी कोण गती घेणार, कोण कोणचा वेध घेणार, कोणाचे काटे उलटे फिरणार यावर शहरासह ग्रामीण भागात विविध तर्कटे लढविली जात आहेत.निकाल रविवारी असला तरी मतदानाच्या टक्केवारीवरुन अनेकांनी बुथनिहाय अंदाज घेणे सुरु केले आहे. पाचही विधानसभा मतदार संघात पंचरंगी तसेच बहुरंगी लढती झाल्या. यावरुन अंदाज काढणे अवघड असले तरी काहींनी जात फॅक्टर, संघटना, समाजकार्य, उमेदवारांची पसंती यावरुन ढोबळ तर्क काढणे सुरु केले आहे. नुसत्या हवेवर तर्क वितर्कांना जोर आला आहे. ग्रामीण भागातील मंदिरे, पार, शेती वस्त्यांवर तर्कावर अधारित चर्चा रंगात आल्या आहेत. जो तो तर्कशास्त्री बनून हेच निवडून येणार असा दावा ठोकत आहेत. (प्रतिनिधी)