सितम सोनवणे ,लातूरपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्मार्ट व्हिलेज’संकल्पनेतून प्रभावीत होवून लातूर जिल्हा परिषदेतील ५८ लोक प्रतिनिधींपैकी केवळ ४४ लोकप्रतिनिधींनी आपल्या ‘स्मार्ट व्हिलेज’ ची निवड केली आहे़ तसेच आ़विनायकराव पाटील यांनी ही स्मार्ट व्हिलेजसाठी टाकळगांवची निवड केली आहे़ पण अद्यापही जि़ प़ १४ सदस्यांनी या संकल्पनेकडेच पाठ फिरवली आहे़लातूर जिल्हा परिषदेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन प्रभावीत होवून स्वत: जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई पाटील यांनी सर्व सदस्यांना स्मार्ट व्हिलेजसाठी प्रत्येक सदस्यांनी आपल्या मतदार संघातील एक गाव निवडावे असे आवाहन केले़ त्याची सुरवात स्वत:पासून केली़ त्यांनी अखरवाई, कव्हा या गावांची निवड केली़त्यासोबतच त्या गावात ‘स्मार्ट व्हिलेज’आणि ‘स्मार्ट स्कूल’चे धडाकेबाज उद्घाटनही केली़ त्यानंतर जवळपास दोन महिने कोणत्याही जि़प़ सदस्यांनी गाव निवडले नव्हते़‘लोकमत’ने हा प्रश्न एैरणीवर धरताच जि़प़ सदस्यांनी गावाची हाळू हाळू निवड करत आता त्यात ४४ सदस्यांनी या स्मार्ट व्हिलेज ची निवड केली आहे़ या स्मार्ट व्हिलेज संकल्पनेला प्रभावीत होवून आ़ विनायकराव पाटील यांनी आपल्या मतदार संघातील टाकळगावची निवड केली आहे़
‘स्मार्ट व्हिलेज’कडे १४ सदस्यांची पाठ
By admin | Updated: April 3, 2015 00:40 IST