शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

निवडणुका उधार उसनवारीच !

By admin | Updated: December 10, 2014 00:39 IST

गजानन वानखडे , जालना लोकसभेपाठोपाठ विधानसभेचाही निवडणूक कर्मचाऱ्यांचा भत्ता प्रशासनाने उधारीवरच ठेवला आहे. जिल्ह्यात संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून संपूर्ण खर्चाचा प्रस्ताव

गजानन वानखडे , जालनालोकसभेपाठोपाठ विधानसभेचाही निवडणूक कर्मचाऱ्यांचा भत्ता प्रशासनाने उधारीवरच ठेवला आहे. जिल्ह्यात संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून संपूर्ण खर्चाचा प्रस्ताव सादर न झाल्याने कर्मचारी भत्त्यापासून अद्यापही वंचित असल्याचे विदारक चित्र आहे. मागील एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर आॅक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूक निर्विघ्न पार पडल्या. या निवडणुकीसाठी झालेल्या खर्चापोटी आयोगाला मागणी केलेला ८ कोटीपैकी निम्मा म्हणजे ४ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद केली. परंतु पाचही विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अद्यापही खर्चाचा प्रस्ताव न आल्याने लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत प्रशासनाने उधारीवर कारभार सुरू केल्याने अनेकांची बिले पडून आहेत.आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदार संघात निवडणूक घेण्यात आल्यात. यासाठी निवडणूक आयोगाकडून खर्च म्हणून ४ कोटींचा निधी उपलंब्ध करून देण्यात आला. परंतु मतदान केंद्रावरील तयारी, साहित्यावरील खर्च, मतदान प्रक्रियेतील सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मानधन, वाहन, वाहनांचे डिझेल, कार्यालयीन खर्च, टेशनरी मंडप भाडे, खुर्च्चा , टेबल, इेलक्ट्रानिक साहित्य सामग्री, प्रिटींग, झेरॉक्स, व्हिडीओ शुटींग, जेवण , नाश्ता, अशा विविध प्रकारच्या कामासाठी निम्माच निधी आल्याने कर्मचाऱ्यांच्या भत्त्याबरोबरच अनेक ठेकेदारांचे बिले गेल्या लोकसभा निवडणुकीपासून न मिळाल्याची माहिती आहे.निवडणूक कर्मचाऱ्यांना गेल्या लोकसभा आणि विधानसभेचे काम करून देखील त्यांचे मानधन अद्यापही न मिळाल्याने त्यांची नाराजी आहे. त्यासाठी त्यांच्यावर दबावही येत असल्याचेही दबक्या आवाजात बोलले जात आहे.४लोकसभा निवडणुकीसाठी १२ कोटी रूपयांचा अंदाजे प्रस्ताव जिल्हा निवडणूक अधिकारी वर्गाने सादर केला होता. त्यापैकी ७ कोटी रूपये जिल्हा निवडणूक कार्यालयाला प्राप्त झाले. पंरतु संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी खर्चाचा प्रस्ताव सादर न केल्याने अनेकांचे बिले खोळंबली आहेत. ४आयोगाकडून खर्चापोटी आलेले फक्त २ कोटी २७ लाख रूपये वाटप करण्यात आले होते. त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी झालेल्या खर्चाची बिले सादर केली नसल्याने नेमका किती खर्च झाला याचा ताळमेळ लावण्याच्या कामाला जिल्हा निवडणूक प्रशासन लागले आहे.