शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

नेत्यांच्या ज्योतिषांकडील चकरा वाढल्या !

By admin | Updated: October 5, 2014 00:49 IST

अजय चव्हाण, बीड एकीकडे भारतीय यान मंगळाच्या कक्षेत स्थिरावले असताना लोकांचे प्रश्न सोडविणारे लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या आखाड्यात आपले नशीब जोखण्यासाठी ज्योतिषी

अजय चव्हाण, बीडएकीकडे भारतीय यान मंगळाच्या कक्षेत स्थिरावले असताना लोकांचे प्रश्न सोडविणारे लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या आखाड्यात आपले नशीब जोखण्यासाठी ज्योतिषी, कुंडली जाणकारांकडे खेटे वाढवत आहेत. यावरुन भारतातील दोन टोकाच्या दोन प्रवृत्ती पहावयास मिळत आहेत. राजकीय भविष्यकारांकडे बीड जिल्ह्यातील उमेदवारांनी आपल्या चकरा वाढविल्या असून, नशीबाची साथ मिळावी, यासाठी ज्योतिषांच्या सल्ल्यानेच बहुतांश कृती करताना दिसत आहेत.महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेत्यांनी राजकारणातील आपले भविष्य बदलण्यासाठी ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार आपल्या नावात, आपल्या पेहरावात, राहणीमानात बराचसा बदल केला आहे. असे अनेक किस्से चर्चिले गेले आहेत. राजकीयदृष्ट्या पुढारलेला बीड जिल्हाही यात मागे असेल तरच नवल. फॅमिली डॉक्टर असतात तसे राजकारण्यांचे ‘फॅमिली’ राजकीय ज्योतिषकार ठरलेले आहेत. शुभा-अशुभ गोष्टीवर बीड जिल्ह्यातील उमेदवारांचा मोठा विश्वास हे उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रसंगावरुनच दिसते. जोपर्यंत पितृ पंधरवाडा होता तोपर्यंत एकाही प्रमुख उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. मात्र पितृ पंधरवाडा संपताच अर्ज भरण्यासाठी एकच उडी पडली. ज्योतिषकार, कुंडली जाणकार, गृहदशा जाणणारे अशा भविष्यकारांकडे जिल्ह्यातील राजकारणी नेहमी जात असतात. निवडणुकीच्या काळात या चकरा वाढल्या आहेत. कोणते वाहन वापरावे? कोणता रंगाचा वेश परिधान करावा? याचे बारीकसारीक सल्ले नेते मंडळी पाळताना दिसत आहेत. रत्नाची पारख असणाऱ्यांनाही निवडणुकीच्या धामधुमीत मोठा भाव आला आहे. राष्ट्रवादीच्या एका मातब्बर नेत्याने निवडणूक अर्ज भरल्या दिवसापासून ‘पवळ्या’ रत्नाची अंगठी घालण्यास सुरुवात केली आहे. घरातून निघताना बऱ्याच जणांनी उजवा पाय टाकूनच घर सोडावे, या ज्योतिषांच्या सल्ल्याचा अवलंब केला आहे, असेही एका भाजपा नेत्याच्या समर्थकाने सांगितले. अनेक उमेदवारांनी, त्यांच्या मंडळींनी व्रतवैकल्येही सुरू केले आहेत. काही उमेदवारांच्या अर्धांगिणींनी तर वेगवेगळ्या मंदिरात जाऊन नवससायासही केले आहेत. निवडणुकीपूर्वी काही इच्छुक उमेदवारांनी तर सपत्नीक धार्मिक विधी करुन गृहदोष सुधारण्याचा प्रयत्नही केला आहे. नेत्यांच्या अशा या श्रद्धा, अंधश्रद्धेमुळे त्यांच्या समर्थकांवरही या गोष्टींचा मोठा प्रभाव पडत आहे. असे असले तरी शेवटी कार्य, निवडणुकीचे नियोजन, व्यक्तिमत्व, मतांचा जुगाड याच गोष्टी उमेदवारांना निवडणुकीत तारू शकतात हे ते उमेदवारही जाणून आहेत हे विशेष !