शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
5
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
6
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
7
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
8
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
9
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
10
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
11
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
12
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
13
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
14
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
15
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
16
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
17
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
18
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
19
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
20
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण

लातूरचा पारा ४३ अंशांवर

By admin | Updated: May 20, 2015 00:19 IST

लातूर : मागील तीन आठवड्यांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून, ४३ अंशांवर पारा गेला आहे. सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता आहे

लातूर : मागील तीन आठवड्यांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून, ४३ अंशांवर पारा गेला आहे. सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता आहे. उन्हाचे चटके इतके असह्य आहेत की, दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे मुश्किलीचेच आहे. त्यामुळे शहरातील रस्ते दुपारच्या सुमारास निर्मनुष्य होत आहेत. दरम्यान, डॉक्टरांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. रस्त्यांवरील डांबर दुपारच्या सुमारास पगळत आहे.गेल्या दोन आठवड्यांपासून कधी ४१ तर कधी ४२ अंशांपर्यंत तापमानाचा पारा जात आहे. औरादच्या हवामान केंद्रांवर मंगळवारी तापमानाची नोंद ४३ अंशांवर गेली होती. सूर्य आगच ओकतो आहे. डांबरी रस्ते दुपारच्या सुमारास पगळत आहेत. पंखे, कुलर आणि वातानुकूलित यंत्रांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी वापर वाढला आहे. मात्र या वस्तूही उन्हात बंद पडत आहेत. पंखे व कुलरची हवा या उन्हाच्या धगीपुढे फिकी पडत आहे. मे हिटमुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून, त्यामुळे रस्ते व बाजारपेठ दुपारच्या सुमारास निर्मनुष्य होत आहे. सायंकाळी ६ वाजेनंतरच बाजारात गर्दी होते. उन्हापासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागात नागरिक वृक्षांचा आधार घेत आहेत, तर शहरातील नागरीक उद्यानांचा सहारा घेतात. परिणामी, ज्यूस सेंटर, आईस्क्रीम, रसवंतीगृहांत ग्राहकांची संख्या वाढली आहे. वाढत्या उन्हामुळे बालकांसह वृद्धांच्या शरीरातील पाणी कमी होत आहे. जास्त घाम आल्याने शरीरातील सोडीयम व पोटॅशियमचे प्रमाण कमी होत आहे. परिणामी, चक्कर येणे, अस्वस्थता जाणवणे, हाता-पायाला गोळे येणे, थकवा येणे, लहान मुलांच्या नाकातून रक्तस्त्राव होणे अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने ऊन लागलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड स्थापन केला असून, बाह्य रुग्णांची संख्याही वाढली आहे.त्वचाद्वारे घाम येऊन शरीरातील पाण्याचे उत्सर्जन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे थकवा जाणवतो. शिवाय, त्वचारोगही उद्भवू शकतात. याला रोखण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. त्यात लिंबाच्या रसाचा वापर करण्यास हरकत नाही, असे सर्वोपचार रुग्णालयातील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अजय ओव्हळ यांनी सांगितले.उन्हामुळे मानवी शरीरातील पाणी कमी होते. घाम येण्याचे प्रमाण वाढते. अंग खाजणे, घामोळ्या येणे, त्वचा जळणे, अंगावर पुरळ येणे, ओलसरपणा राहून जंतूसंसर्ग होणे, नाक कोरडे पडणे, नाकातील छोट्या रक्तवाहिन्या फुटून रक्तस्त्राव होणे आदी प्रकारच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे सर्वोपचार रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितले.