शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवीचं बाळ जवळ ठेवणाऱ्या निलेश चव्हाणचे कारनामे उघड; पत्नीच्या बेडरूममध्ये स्पाय कॅमेरे बसवले, अन्....
2
धक्कादायक! ज्योती व्हिडीओ पब्लिश करण्याआधी पाकिस्तानी अधिकाऱ्याला पाठवायची, काय होतं कारण?
3
कोणत्या मिसाईलची टेस्टिंग? अंदमान समुद्राचे आकाश विमानांसाठी बंद; एका दिवसासाठी NOTAM जारी
4
ITR भरताना घाई करताय? थांबा! 'या' २ गोष्टी पूर्ण नसतील तर मिळणार नाही रिफंड; अनेकजण करतात चूक
5
India Pakistan War : 'तुम्ही आमचे पाणी थांबवा, आम्ही तुमचा श्वास बंद करणार'; पाकिस्तानी सैन्याने हाफिज सईदची भाषा बोलायला सुरूवात केली
6
पगारवाढ मिळत नाहीये? नोकरी सोडण्याआधी 'हे' ४ उपाय करा, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप कराल!
7
Breaking: वैष्णवी हगवणे यांच्या फरार सासऱ्याला अटक; दीरही पोलिसांच्या जाळ्यात, पहाटे कारवाई
8
Test Retirement: विराट-रोहितनंतर आता 'या' दिग्गजावरही लवकरच येणार कसोटी निवृत्तीची वेळ
9
"भारत आत येऊन ठोकून गेला आणि तुम्ही...", भर संसदेत पाकिस्तानी नेत्याने स्वतःच्याच सरकारची पोलखोल केली!
10
ऑपरेशन सिंदूर: ज्या डमी विमानांना पाकिस्तान भुलला, ते विमान कोणते? एअर डिफेंस सिस्टीम राफेल समजून बसली...
11
एक-दोन नव्हे, तब्बल ६०० पाकिस्तानी नंबर्सशी संपर्कात मोहम्मद तुफैल! काय माहिती पुरवत होता?
12
Video: आलिया भट 'कान्स'मध्ये पदार्पण करणार; एअरपोर्ट लूकमध्येच दिसली इतकी स्टायलिश
13
कान्समध्ये ऐश्वर्याच्या नवीन लूकची चर्चा! गाउनवर लिहिला भगवद्गीतेचा खास श्लोक, पुन्हा एकदा दाखवली भारतीय संस्कृती
14
बांगलादेशी सैन्याने डोळे वटारले; मोहम्मद युनूस यांच्या गोटात पळापळ, राजीनामा देण्यास तयार
15
हार्वर्ड विद्यापीठात दुसऱ्या देशांतील विद्यार्थ्यांना नो एन्ट्री! ट्रम्प प्रशासनाने घेतला मोठा निर्णय
16
अभिनेत्री निकिता दत्ताला कोरोनाची लागण, आईचीही टेस्ट पॉझिटिव्ह; म्हणाली, "आशा आहे की..."
17
Vaishnavi Hagawane Death Case : निर्लज्जपणाचा कळस! फरार असताना मटणावर ताव मारताना दिसले हगवणे पिता-पुत्र; सीसीटीव्ही फुटेजच आलं!
18
पहलगाम हल्ल्याआधी दिल्ली होते टार्गेटवर, ISI एजंट अन्सारुल मियाँने चौकशीदरम्यान केले उघड
19
आजचे राशीभविष्य २३ मे २०२५ : अचानक धनलाभ संभवतो, कसा असेल आजचा दिवस...
20
नसांत रक्त नव्हे तर गरम सिंदूर वाहतोय! दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत पाकला मोजावी लागेल: PM

लातूरचा पारा ४३ अंशांवर

By admin | Updated: May 20, 2015 00:19 IST

लातूर : मागील तीन आठवड्यांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून, ४३ अंशांवर पारा गेला आहे. सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता आहे

लातूर : मागील तीन आठवड्यांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून, ४३ अंशांवर पारा गेला आहे. सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता आहे. उन्हाचे चटके इतके असह्य आहेत की, दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे मुश्किलीचेच आहे. त्यामुळे शहरातील रस्ते दुपारच्या सुमारास निर्मनुष्य होत आहेत. दरम्यान, डॉक्टरांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. रस्त्यांवरील डांबर दुपारच्या सुमारास पगळत आहे.गेल्या दोन आठवड्यांपासून कधी ४१ तर कधी ४२ अंशांपर्यंत तापमानाचा पारा जात आहे. औरादच्या हवामान केंद्रांवर मंगळवारी तापमानाची नोंद ४३ अंशांवर गेली होती. सूर्य आगच ओकतो आहे. डांबरी रस्ते दुपारच्या सुमारास पगळत आहेत. पंखे, कुलर आणि वातानुकूलित यंत्रांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी वापर वाढला आहे. मात्र या वस्तूही उन्हात बंद पडत आहेत. पंखे व कुलरची हवा या उन्हाच्या धगीपुढे फिकी पडत आहे. मे हिटमुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून, त्यामुळे रस्ते व बाजारपेठ दुपारच्या सुमारास निर्मनुष्य होत आहे. सायंकाळी ६ वाजेनंतरच बाजारात गर्दी होते. उन्हापासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागात नागरिक वृक्षांचा आधार घेत आहेत, तर शहरातील नागरीक उद्यानांचा सहारा घेतात. परिणामी, ज्यूस सेंटर, आईस्क्रीम, रसवंतीगृहांत ग्राहकांची संख्या वाढली आहे. वाढत्या उन्हामुळे बालकांसह वृद्धांच्या शरीरातील पाणी कमी होत आहे. जास्त घाम आल्याने शरीरातील सोडीयम व पोटॅशियमचे प्रमाण कमी होत आहे. परिणामी, चक्कर येणे, अस्वस्थता जाणवणे, हाता-पायाला गोळे येणे, थकवा येणे, लहान मुलांच्या नाकातून रक्तस्त्राव होणे अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने ऊन लागलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड स्थापन केला असून, बाह्य रुग्णांची संख्याही वाढली आहे.त्वचाद्वारे घाम येऊन शरीरातील पाण्याचे उत्सर्जन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे थकवा जाणवतो. शिवाय, त्वचारोगही उद्भवू शकतात. याला रोखण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. त्यात लिंबाच्या रसाचा वापर करण्यास हरकत नाही, असे सर्वोपचार रुग्णालयातील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अजय ओव्हळ यांनी सांगितले.उन्हामुळे मानवी शरीरातील पाणी कमी होते. घाम येण्याचे प्रमाण वाढते. अंग खाजणे, घामोळ्या येणे, त्वचा जळणे, अंगावर पुरळ येणे, ओलसरपणा राहून जंतूसंसर्ग होणे, नाक कोरडे पडणे, नाकातील छोट्या रक्तवाहिन्या फुटून रक्तस्त्राव होणे आदी प्रकारच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे सर्वोपचार रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितले.