शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

यात्रेकरूंचा शेवटचा जथा मंगळवारी रवाना

By admin | Updated: September 17, 2014 01:15 IST

औरंगाबाद : पवित्र हज यात्रेसाठी मराठवाड्यातील २३३० यात्रेकरू रवाना झाले. मंगळवारी सायंकाळी ६.४५ वाजता २३३ यात्रेकरूंना घेऊन शेवटचे विमान जेद्दाहकडे रवाना झाले.

औरंगाबाद : पवित्र हज यात्रेसाठी मराठवाड्यातील २३३० यात्रेकरू रवाना झाले. मंगळवारी सायंकाळी ६.४५ वाजता २३३ यात्रेकरूंना घेऊन शेवटचे विमान जेद्दाहकडे रवाना झाले. यात्रेकरूंच्या परतीचा प्रवास १९ आॅक्टोबरपासून सुरू होणारआहे.मराठवाड्यातील हज यात्रेकरूंचा प्रवास ७ सप्टेंबरपासून सुरू झाला. दररोज २३३ यात्रेकरू एका विमानाद्वारे जात होते. मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्यातील यात्रेकरू रवाना झाले. विभागातील सर्व यात्रेकरूंना थांबण्यासाठी ऐतिहासिक जामा मशीद येथे व्यवस्था करण्यात आली होती. यात्रेकरूंना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी स्वयंसेवक आणि मरकज- ए- हुजाज कमिटीकडून घेण्यात येत होती. यात्रेकरूंच्या सर्व कागदपत्रांची तपासणी, सामानाची तपासणी, चलन बदलणे, ‘अहराम’ (पांढरे कपडे) बांधणे आदी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलीहोती. आज शेवटचे विमान रवाना होणार असल्याने जामा मशीद येथे सकाळी यात्रेकरूंच्या नातेवाईकांनी अलोट गर्दी केली होती. नातेवाईकांची गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी जामा मशिदीजवळील रस्ते बॅरिकेड लावून बंद केले होते.यात्रेकरूंसह बसमध्ये बसताच अनेक नातेवाईकांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. पवित्र हज यात्रा ४० दिवसांची असते. यात्रेकरू सुखरूप यावेत हीच प्रार्थना नातेवाईकांसह आप्तस्वकीय करीत होते. दुपारी १ वाजेपर्यंत सर्व यात्रेकरू चिकलठाणा विमानतळात दाखल झाले. मराठवाडा आणि आसपासच्या जिल्ह्यातील हज यात्रेकरूंना पूर्वी मुंबई येथून विमानाने यात्रेला जावे लागत होते. यात्रेकरूंची ही गैरसोय लक्षात घेऊन २००५ मध्ये शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी थेट औरंगाबादहून विमानसेवा सुरू केली. तत्कालीन केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या सहकार्याने औरंगाबादहून विमानसेवा सुरू झाली.राजेंद्र दर्डा यांच्याकडून शुभेच्छा!राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सायंकाळी चिकलठाणा विमानतळावर सर्व यात्रेकरूंची भेट घेतली.यात्रेकरूंना हज यात्रा सुखरूप व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मरकज- ए- हुजाज कमिटीचे करीम पटेल उपस्थित होते.