शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

‘किशोरी उत्कर्ष मंच’ उपक्रमाविनाच !

By admin | Updated: March 31, 2015 00:37 IST

बाळासाहेब जाधव , लातूर राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत किशोरी उत्कृष्ट युवती मंच स्थापन करण्यात आला आहे. मात्र या मंचमार्फत एकही उपक्रम राबविला गेला नसल्याने हा मंच उपक्रमाविनाच आहे.

बाळासाहेब जाधव , लातूरराष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत किशोरी उत्कृष्ट युवती मंच स्थापन करण्यात आला आहे. मात्र या मंचमार्फत एकही उपक्रम राबविला गेला नसल्याने हा मंच उपक्रमाविनाच आहे. जिल्ह्यातील ४४ शाळांचा सहभाग असलेल्या या मंचद्वारे गेल्या तीन वर्षांपासून एकही उपक्रम झाला नाही. त्यामुळे या मंचला आलेला निधी गेला कोठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्य शासनाने राज्यातील मुलींनी शिक्षणाच्या प्रवाहात यावे, त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच बाबीचे चौफेर ज्ञान व्हावे या दृष्टीकोनातून माध्यमिक शिक्षा अभियान विभागाच्या वतीने किशोरी उत्कर्ष युवा मंचच्या माध्यमातून पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला़ या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थिनींचे विविध प्रश्न मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचण्यासाठी तक्रारपेटी बसविणे, तसेच विद्यार्थिनींची वाटचाल यशस्वी व्हावी या दृष्टीकोनातून वैचारिक मेजवानी तसेच या विविध उपक्रमाच्या कालावधीत विद्यार्थिनींची नाष्टा व चहा-पाण्याची सोय व्हावी, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले़ राज्य शासनाने सुरू केलेला हा उपक्रम राबविण्यासाठी जिल्हाभरातील ४९ शाळापैकी ४४ शाळांची निवड करण्यात आली़ या शाळेत विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रत्येक शाळेला दहा हजार या प्रमाणे निधी आॅक्टोबर ते नोव्हेंबर २०१४ या कालावधीत लातूर जिल्ह्यातील ४९ शाळेपैकी ४४ शाळांना निधी वितरीतही करण्यात आला़ मात्र या शाळांनी युवती मंचचा उपक्रमच राबविला नाही. शिवाय, निधी कोठे खर्च झाला, याचा लेखाजोखाही नाही.