शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
2
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
3
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेनशन संपेल
4
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
5
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
6
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
7
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
8
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
9
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
10
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
11
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
12
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
13
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
14
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
15
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
16
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
17
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
18
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
19
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
20
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या

‘किशोरी उत्कर्ष मंच’ उपक्रमाविनाच !

By admin | Updated: March 31, 2015 00:37 IST

बाळासाहेब जाधव , लातूर राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत किशोरी उत्कृष्ट युवती मंच स्थापन करण्यात आला आहे. मात्र या मंचमार्फत एकही उपक्रम राबविला गेला नसल्याने हा मंच उपक्रमाविनाच आहे.

बाळासाहेब जाधव , लातूरराष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत किशोरी उत्कृष्ट युवती मंच स्थापन करण्यात आला आहे. मात्र या मंचमार्फत एकही उपक्रम राबविला गेला नसल्याने हा मंच उपक्रमाविनाच आहे. जिल्ह्यातील ४४ शाळांचा सहभाग असलेल्या या मंचद्वारे गेल्या तीन वर्षांपासून एकही उपक्रम झाला नाही. त्यामुळे या मंचला आलेला निधी गेला कोठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्य शासनाने राज्यातील मुलींनी शिक्षणाच्या प्रवाहात यावे, त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच बाबीचे चौफेर ज्ञान व्हावे या दृष्टीकोनातून माध्यमिक शिक्षा अभियान विभागाच्या वतीने किशोरी उत्कर्ष युवा मंचच्या माध्यमातून पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला़ या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थिनींचे विविध प्रश्न मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचण्यासाठी तक्रारपेटी बसविणे, तसेच विद्यार्थिनींची वाटचाल यशस्वी व्हावी या दृष्टीकोनातून वैचारिक मेजवानी तसेच या विविध उपक्रमाच्या कालावधीत विद्यार्थिनींची नाष्टा व चहा-पाण्याची सोय व्हावी, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले़ राज्य शासनाने सुरू केलेला हा उपक्रम राबविण्यासाठी जिल्हाभरातील ४९ शाळापैकी ४४ शाळांची निवड करण्यात आली़ या शाळेत विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रत्येक शाळेला दहा हजार या प्रमाणे निधी आॅक्टोबर ते नोव्हेंबर २०१४ या कालावधीत लातूर जिल्ह्यातील ४९ शाळेपैकी ४४ शाळांना निधी वितरीतही करण्यात आला़ मात्र या शाळांनी युवती मंचचा उपक्रमच राबविला नाही. शिवाय, निधी कोठे खर्च झाला, याचा लेखाजोखाही नाही.