शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

खामसवाडी गावातील ‘तो’ गोंधळ दारूच्या नशेत

By admin | Updated: October 17, 2014 00:27 IST

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास मतदान यंत्र पळविण्याचा प्रयत्न झाला नसून, एका तळीरामाने बससमोर गोंधळ घातला

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास मतदान यंत्र पळविण्याचा प्रयत्न झाला नसून, एका तळीरामाने बससमोर गोंधळ घातला होता़ गोंधळ घालणाऱ्या त्या इसमाविरूध्द शिराढोण पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कळंबचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत ढवळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे़उस्मानाबाद-कळंब तालुक्यातील खामसवाडी गावात बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर रात्रीच्या सुमारास मतदान यंत्र पेट्यांमध्ये घालून बसमधून उस्मानाबादकडे आणण्यात येत होत्या़ त्यावेळी बसमध्ये बिघाड झाल्याने ती गावात थांबली होती़ त्यावेळी बसमधील मतदान यंत्रणेच्या पेट्या पळविण्याचा प्रयत्न झाल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते़ या वृत्ताची दखल घेत पोलिस प्रशासनाने घडलेल्या प्रकरणाच्या चौकशीअंती प्रसिध्दीपत्रक काढले आहे़ त्यात नमूद केले की, मतदान प्रक्रिया झाल्यानंतर मतदान यंत्रणेसह पोलिस कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांना घेवून येणाऱ्या बसचे (क्ऱएम़एच़२०-बी़एल़०७८७) फोकस (हेडलाईट) बंद पडल्याने गावातील शाळेजवळ थांबविण्यात आली होती़ त्यावेळी तेथे दारू पिवून आलेल्या चंद्रकांत उर्फ पप्पू बाळासाहेब पाटील (वय-३२ राख़ामसवाडी) हा बससमोर आरडाओरड करीत गोंधळ घालत होता़ त्यावेळी क्षेत्रीय अधिकारी तथा कळंब येथील सामाजिक वनिकरण विभागातीलचे कर्मचारी अशोक दशरथराव घुले यांनी दुसरी बस मागवून घेतली़ दुसरी बस (क्ऱ एम़ एच़१४/बी़टी़२२६२) आल्यानंतर मतदान यंत्रे, कर्मचारी घेवून उस्मानाबादकडे गेली़ त्यानंतर शिराढोण पोलिस ठाण्याचे सपोनि पवार यांनी चंद्रकांत पाटील यास ताब्यात घेवून शिराढोण प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी केली़ त्यावेळी पाटील यानी मद्यार्क प्राषण केल्याचा अहवाल आला़ त्या अहवालानंतर पोना सुधीर तुगावकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाटील याच्याविरूध्द शिराढोण पोलिस ठाण्यात प्रोग़ु़ऱनं़ ६४/१४ कलम ८५ (१) महाराष्ट्र दारूबंदी कायदा सह कलम ११२/ ११७ महाराष्ट्र पोलिस कायद्याप्रमाणे बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे़ तसेच प्रभाकर शेळके यांनी जामीन दिल्याने चंद्रकांत पाटील याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे़ त्यामुळे ढोकी येथे मतदान यंत्रणाच्या पेट्या पळविण्याचा प्रयत्न झाला नसून, तेथे तळीरामाने गोंधळ घातला असल्याचेही ढवळे यांनी पत्रकात म्हटले आहे़ (प्रतिनिधी)