शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

खामसवाडी गावातील ‘तो’ गोंधळ दारूच्या नशेत

By admin | Updated: October 17, 2014 00:27 IST

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास मतदान यंत्र पळविण्याचा प्रयत्न झाला नसून, एका तळीरामाने बससमोर गोंधळ घातला

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास मतदान यंत्र पळविण्याचा प्रयत्न झाला नसून, एका तळीरामाने बससमोर गोंधळ घातला होता़ गोंधळ घालणाऱ्या त्या इसमाविरूध्द शिराढोण पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कळंबचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत ढवळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे़उस्मानाबाद-कळंब तालुक्यातील खामसवाडी गावात बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर रात्रीच्या सुमारास मतदान यंत्र पेट्यांमध्ये घालून बसमधून उस्मानाबादकडे आणण्यात येत होत्या़ त्यावेळी बसमध्ये बिघाड झाल्याने ती गावात थांबली होती़ त्यावेळी बसमधील मतदान यंत्रणेच्या पेट्या पळविण्याचा प्रयत्न झाल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते़ या वृत्ताची दखल घेत पोलिस प्रशासनाने घडलेल्या प्रकरणाच्या चौकशीअंती प्रसिध्दीपत्रक काढले आहे़ त्यात नमूद केले की, मतदान प्रक्रिया झाल्यानंतर मतदान यंत्रणेसह पोलिस कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांना घेवून येणाऱ्या बसचे (क्ऱएम़एच़२०-बी़एल़०७८७) फोकस (हेडलाईट) बंद पडल्याने गावातील शाळेजवळ थांबविण्यात आली होती़ त्यावेळी तेथे दारू पिवून आलेल्या चंद्रकांत उर्फ पप्पू बाळासाहेब पाटील (वय-३२ राख़ामसवाडी) हा बससमोर आरडाओरड करीत गोंधळ घालत होता़ त्यावेळी क्षेत्रीय अधिकारी तथा कळंब येथील सामाजिक वनिकरण विभागातीलचे कर्मचारी अशोक दशरथराव घुले यांनी दुसरी बस मागवून घेतली़ दुसरी बस (क्ऱ एम़ एच़१४/बी़टी़२२६२) आल्यानंतर मतदान यंत्रे, कर्मचारी घेवून उस्मानाबादकडे गेली़ त्यानंतर शिराढोण पोलिस ठाण्याचे सपोनि पवार यांनी चंद्रकांत पाटील यास ताब्यात घेवून शिराढोण प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी केली़ त्यावेळी पाटील यानी मद्यार्क प्राषण केल्याचा अहवाल आला़ त्या अहवालानंतर पोना सुधीर तुगावकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाटील याच्याविरूध्द शिराढोण पोलिस ठाण्यात प्रोग़ु़ऱनं़ ६४/१४ कलम ८५ (१) महाराष्ट्र दारूबंदी कायदा सह कलम ११२/ ११७ महाराष्ट्र पोलिस कायद्याप्रमाणे बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे़ तसेच प्रभाकर शेळके यांनी जामीन दिल्याने चंद्रकांत पाटील याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे़ त्यामुळे ढोकी येथे मतदान यंत्रणाच्या पेट्या पळविण्याचा प्रयत्न झाला नसून, तेथे तळीरामाने गोंधळ घातला असल्याचेही ढवळे यांनी पत्रकात म्हटले आहे़ (प्रतिनिधी)