शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या दहा शतकांतील शहराच्या स्थित्यंतराची साक्षीदार खाम नदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:05 IST

प्रभुदास पाटोळे औरंगाबाद : शहराची धमणी म्हणून ओळखली जाणारी खाम नदी गेल्या १० शतकांत विविध शासकांच्या कारकिर्दीत शहरात झालेल्या ...

प्रभुदास पाटोळे

औरंगाबाद : शहराची धमणी म्हणून ओळखली जाणारी खाम नदी गेल्या १० शतकांत विविध शासकांच्या कारकिर्दीत शहरात झालेल्या स्थित्यंतराची आणि प्रगतीची साक्षीदार आहे.

मलिक अंबर यांनी १६१० साली खडकी गाव वसविल्याचे सांगितले जाते. मात्र तत्पूर्वी येथे राजतडाग (रॉयल लेक) नावाचे गाव होते. याचा उल्लेख कन्हेरी गुफेतील शिलालेखावर आहे. तसेच उज्जैन, महेश्वर, बुरहानपूर, अजिंठा, भोकरदन राजतडाग, प्रतिष्ठान (पैठण) मार्गे उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर गावापर्यंतचा व्यापारी मार्ग राजतडाग येथून जात असल्याच्या नोंदी १०व्या शतकापर्यंत आहेत.

१६१० साली मलिक अंबरने खडकी गाव वसविले होते. त्यानंतर १६३३ला मलिक अंबरचा मुलगा फतेहखान राजा झाला. त्याने खडकीचे नाव फतेहनगर केले. त्यानंतर औरंगजेब बादशहाने फतेहनगरचे नाव खुजिस्ता बुनियाद ठेवले. कालांतराने याचेही नामांतर होऊन औरंगाबाद झाले जे आजपर्यंत (२०व्या शतकापर्यंत) तसेच आहे.

बिकानेरचे राजा करणसिंग यांना औरंगजेब बादशहाने कर्णपुरा, पदमपुरा आणि केसर सिंगपुरा ही खेडी भेट दिली. करणसिंग यांनी १६५८ला कर्णपुऱ्यात खाम नदीच्या तीरावर राजाचा महाल आणि राणीचा महाल बांधून १६६९पर्यंत वास्तव्य केले. (हा महाल आजही भग्नावस्थेत आहे) तेेथेच त्यांचे निधन झाले. त्यावेळी ‘चुरू’चे ठाकूर कुशलसिंह यांनी खाम नदीच्या तीरावर त्यांचा अंत्यविधी केला होता.

१२ ऑक्टोबर १६८३ला औरंगजेब बादशहा कर्णपुऱ्यात कर्णसिंहांच्या भेटीस गेले होते. तेथे जवळपास एक महिना राहून, १३ नोव्हेंबर १६८३ला बादशहा अहमदनगरच्या किल्ल्यात पोहोचले होते.

रशिया देशातील गजबदान (बुखारा) येथून आलेले सुफी संत बाबाशाह हजरत मुसाफिर खाम नदीच्या तीरावर वास्तव्यास होते. तेथेच १६२४ साली पानचक्कीचे बांधकाम सुरू झाले. क्रमाक्रमाने १७४४ ला पूर्ण झाले. बाबाशाह यांचे अनुयायी आणि इतर लोक पानचक्की परिसरातील पाण्याच्या हौदाखालील खामनदीच्या तीरावर नैसर्गिक वातानुकूलित भव्य दालनात उन्हाळ्यात वास्तव्यास असत. भविष्यात खाम नदीच्या पूर्वेला शहराभोवती ५२ दरवाजे आणि ५२ खिडक्या असलेला भव्य कोट आणि राजा-महाराजांच्या वास्तव्यासाठीच्या वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या इमारती विविध शासनकर्त्यांनी बांधल्या. पश्चिमेला सोनेरी महल, बीबी का मकबरा आणि पानचक्की आदी पर्यटनस्थळे आणि खाम नदीवर मकाई गेट, महेमूद गेट, बारापुल्ला गेट आणि दीर्घकाळानंतर लोखंडी पूल तयार झाला.

१८१९ला हैदराबादचे निजाम यांनी उस्मानपुऱ्यात सैन्याचा तळ (कॅन्टेन्मेंट) स्थापन केले. १८३६ साली तो तळ हर्सूल आणि बीबी मकबरा दरम्यान खाम नदीच्या तीरावर स्थलांतरित केला. शेवटी १८९०ला सध्या आहे तेथे छावणी परिषद स्थापन झाली.

१९व्या शतकात औरंगाबाद मिल, घाटी रुग्णालय आणि पानचक्कीपासून बारा पुलापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध महाविद्यालये स्थापन केली. स्वातंत्र्यपूर्व काळात लोखंडी पुलापासून बनेवाडीपर्यंतचा परिसर बुलबाट म्हणून ओळखला जात असे. तेथे केवळ इंग्रज अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सकाळी आणि सायंकाळी फिरण्याची मुभा होती. भारतीय लोकांना तेथे जाता येत नसे. यावरून खाम नदीचे पाणी आणि वातावरण किती शुद्ध होते याची कल्पना येते.