शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
5
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
6
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
7
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
8
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
9
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
10
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
11
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
12
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
13
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
14
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
15
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
16
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
17
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
18
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
19
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
20
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण

गेल्या दहा शतकांतील शहराच्या स्थित्यंतराची साक्षीदार खाम नदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:05 IST

प्रभुदास पाटोळे औरंगाबाद : शहराची धमणी म्हणून ओळखली जाणारी खाम नदी गेल्या १० शतकांत विविध शासकांच्या कारकिर्दीत शहरात झालेल्या ...

प्रभुदास पाटोळे

औरंगाबाद : शहराची धमणी म्हणून ओळखली जाणारी खाम नदी गेल्या १० शतकांत विविध शासकांच्या कारकिर्दीत शहरात झालेल्या स्थित्यंतराची आणि प्रगतीची साक्षीदार आहे.

मलिक अंबर यांनी १६१० साली खडकी गाव वसविल्याचे सांगितले जाते. मात्र तत्पूर्वी येथे राजतडाग (रॉयल लेक) नावाचे गाव होते. याचा उल्लेख कन्हेरी गुफेतील शिलालेखावर आहे. तसेच उज्जैन, महेश्वर, बुरहानपूर, अजिंठा, भोकरदन राजतडाग, प्रतिष्ठान (पैठण) मार्गे उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर गावापर्यंतचा व्यापारी मार्ग राजतडाग येथून जात असल्याच्या नोंदी १०व्या शतकापर्यंत आहेत.

१६१० साली मलिक अंबरने खडकी गाव वसविले होते. त्यानंतर १६३३ला मलिक अंबरचा मुलगा फतेहखान राजा झाला. त्याने खडकीचे नाव फतेहनगर केले. त्यानंतर औरंगजेब बादशहाने फतेहनगरचे नाव खुजिस्ता बुनियाद ठेवले. कालांतराने याचेही नामांतर होऊन औरंगाबाद झाले जे आजपर्यंत (२०व्या शतकापर्यंत) तसेच आहे.

बिकानेरचे राजा करणसिंग यांना औरंगजेब बादशहाने कर्णपुरा, पदमपुरा आणि केसर सिंगपुरा ही खेडी भेट दिली. करणसिंग यांनी १६५८ला कर्णपुऱ्यात खाम नदीच्या तीरावर राजाचा महाल आणि राणीचा महाल बांधून १६६९पर्यंत वास्तव्य केले. (हा महाल आजही भग्नावस्थेत आहे) तेेथेच त्यांचे निधन झाले. त्यावेळी ‘चुरू’चे ठाकूर कुशलसिंह यांनी खाम नदीच्या तीरावर त्यांचा अंत्यविधी केला होता.

१२ ऑक्टोबर १६८३ला औरंगजेब बादशहा कर्णपुऱ्यात कर्णसिंहांच्या भेटीस गेले होते. तेथे जवळपास एक महिना राहून, १३ नोव्हेंबर १६८३ला बादशहा अहमदनगरच्या किल्ल्यात पोहोचले होते.

रशिया देशातील गजबदान (बुखारा) येथून आलेले सुफी संत बाबाशाह हजरत मुसाफिर खाम नदीच्या तीरावर वास्तव्यास होते. तेथेच १६२४ साली पानचक्कीचे बांधकाम सुरू झाले. क्रमाक्रमाने १७४४ ला पूर्ण झाले. बाबाशाह यांचे अनुयायी आणि इतर लोक पानचक्की परिसरातील पाण्याच्या हौदाखालील खामनदीच्या तीरावर नैसर्गिक वातानुकूलित भव्य दालनात उन्हाळ्यात वास्तव्यास असत. भविष्यात खाम नदीच्या पूर्वेला शहराभोवती ५२ दरवाजे आणि ५२ खिडक्या असलेला भव्य कोट आणि राजा-महाराजांच्या वास्तव्यासाठीच्या वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या इमारती विविध शासनकर्त्यांनी बांधल्या. पश्चिमेला सोनेरी महल, बीबी का मकबरा आणि पानचक्की आदी पर्यटनस्थळे आणि खाम नदीवर मकाई गेट, महेमूद गेट, बारापुल्ला गेट आणि दीर्घकाळानंतर लोखंडी पूल तयार झाला.

१८१९ला हैदराबादचे निजाम यांनी उस्मानपुऱ्यात सैन्याचा तळ (कॅन्टेन्मेंट) स्थापन केले. १८३६ साली तो तळ हर्सूल आणि बीबी मकबरा दरम्यान खाम नदीच्या तीरावर स्थलांतरित केला. शेवटी १८९०ला सध्या आहे तेथे छावणी परिषद स्थापन झाली.

१९व्या शतकात औरंगाबाद मिल, घाटी रुग्णालय आणि पानचक्कीपासून बारा पुलापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध महाविद्यालये स्थापन केली. स्वातंत्र्यपूर्व काळात लोखंडी पुलापासून बनेवाडीपर्यंतचा परिसर बुलबाट म्हणून ओळखला जात असे. तेथे केवळ इंग्रज अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सकाळी आणि सायंकाळी फिरण्याची मुभा होती. भारतीय लोकांना तेथे जाता येत नसे. यावरून खाम नदीचे पाणी आणि वातावरण किती शुद्ध होते याची कल्पना येते.