शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या दहा शतकांतील शहराच्या स्थित्यंतराची साक्षीदार खाम नदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:05 IST

प्रभुदास पाटोळे औरंगाबाद : शहराची धमणी म्हणून ओळखली जाणारी खाम नदी गेल्या १० शतकांत विविध शासकांच्या कारकिर्दीत शहरात झालेल्या ...

प्रभुदास पाटोळे

औरंगाबाद : शहराची धमणी म्हणून ओळखली जाणारी खाम नदी गेल्या १० शतकांत विविध शासकांच्या कारकिर्दीत शहरात झालेल्या स्थित्यंतराची आणि प्रगतीची साक्षीदार आहे.

मलिक अंबर यांनी १६१० साली खडकी गाव वसविल्याचे सांगितले जाते. मात्र तत्पूर्वी येथे राजतडाग (रॉयल लेक) नावाचे गाव होते. याचा उल्लेख कन्हेरी गुफेतील शिलालेखावर आहे. तसेच उज्जैन, महेश्वर, बुरहानपूर, अजिंठा, भोकरदन राजतडाग, प्रतिष्ठान (पैठण) मार्गे उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर गावापर्यंतचा व्यापारी मार्ग राजतडाग येथून जात असल्याच्या नोंदी १०व्या शतकापर्यंत आहेत.

१६१० साली मलिक अंबरने खडकी गाव वसविले होते. त्यानंतर १६३३ला मलिक अंबरचा मुलगा फतेहखान राजा झाला. त्याने खडकीचे नाव फतेहनगर केले. त्यानंतर औरंगजेब बादशहाने फतेहनगरचे नाव खुजिस्ता बुनियाद ठेवले. कालांतराने याचेही नामांतर होऊन औरंगाबाद झाले जे आजपर्यंत (२०व्या शतकापर्यंत) तसेच आहे.

बिकानेरचे राजा करणसिंग यांना औरंगजेब बादशहाने कर्णपुरा, पदमपुरा आणि केसर सिंगपुरा ही खेडी भेट दिली. करणसिंग यांनी १६५८ला कर्णपुऱ्यात खाम नदीच्या तीरावर राजाचा महाल आणि राणीचा महाल बांधून १६६९पर्यंत वास्तव्य केले. (हा महाल आजही भग्नावस्थेत आहे) तेेथेच त्यांचे निधन झाले. त्यावेळी ‘चुरू’चे ठाकूर कुशलसिंह यांनी खाम नदीच्या तीरावर त्यांचा अंत्यविधी केला होता.

१२ ऑक्टोबर १६८३ला औरंगजेब बादशहा कर्णपुऱ्यात कर्णसिंहांच्या भेटीस गेले होते. तेथे जवळपास एक महिना राहून, १३ नोव्हेंबर १६८३ला बादशहा अहमदनगरच्या किल्ल्यात पोहोचले होते.

रशिया देशातील गजबदान (बुखारा) येथून आलेले सुफी संत बाबाशाह हजरत मुसाफिर खाम नदीच्या तीरावर वास्तव्यास होते. तेथेच १६२४ साली पानचक्कीचे बांधकाम सुरू झाले. क्रमाक्रमाने १७४४ ला पूर्ण झाले. बाबाशाह यांचे अनुयायी आणि इतर लोक पानचक्की परिसरातील पाण्याच्या हौदाखालील खामनदीच्या तीरावर नैसर्गिक वातानुकूलित भव्य दालनात उन्हाळ्यात वास्तव्यास असत. भविष्यात खाम नदीच्या पूर्वेला शहराभोवती ५२ दरवाजे आणि ५२ खिडक्या असलेला भव्य कोट आणि राजा-महाराजांच्या वास्तव्यासाठीच्या वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या इमारती विविध शासनकर्त्यांनी बांधल्या. पश्चिमेला सोनेरी महल, बीबी का मकबरा आणि पानचक्की आदी पर्यटनस्थळे आणि खाम नदीवर मकाई गेट, महेमूद गेट, बारापुल्ला गेट आणि दीर्घकाळानंतर लोखंडी पूल तयार झाला.

१८१९ला हैदराबादचे निजाम यांनी उस्मानपुऱ्यात सैन्याचा तळ (कॅन्टेन्मेंट) स्थापन केले. १८३६ साली तो तळ हर्सूल आणि बीबी मकबरा दरम्यान खाम नदीच्या तीरावर स्थलांतरित केला. शेवटी १८९०ला सध्या आहे तेथे छावणी परिषद स्थापन झाली.

१९व्या शतकात औरंगाबाद मिल, घाटी रुग्णालय आणि पानचक्कीपासून बारा पुलापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध महाविद्यालये स्थापन केली. स्वातंत्र्यपूर्व काळात लोखंडी पुलापासून बनेवाडीपर्यंतचा परिसर बुलबाट म्हणून ओळखला जात असे. तेथे केवळ इंग्रज अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सकाळी आणि सायंकाळी फिरण्याची मुभा होती. भारतीय लोकांना तेथे जाता येत नसे. यावरून खाम नदीचे पाणी आणि वातावरण किती शुद्ध होते याची कल्पना येते.