शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

केबीसीच्या एजंटानी कमविले लाखो रुपये

By admin | Updated: July 19, 2014 00:39 IST

विजय चोरडिया, जिंतूर पैसे दामदुप्पट करण्याच्या आमिषाला बळी पडून कोट्यवधी रुपयाला गंडा घालण्यासाठी जिंतुरात साखळी कार्यरत होती.

विजय चोरडिया, जिंतूरपैसे दामदुप्पट करण्याच्या आमिषाला बळी पडून कोट्यवधी रुपयाला गंडा घालण्यासाठी जिंतुरात साखळी कार्यरत होती. या एजंटांनी सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व नातेवाईकांना योजनेत सहभागी करुन लाखो रुपयांची माया जमविली. तालुक्यामध्ये मागील एक वर्षापासून केबीसीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले. ग्रामीण भागात सुशिक्षित बेरोजगार, शिक्षक, डॉक्टर, प्राध्यापक यांनी शेतकरी व त्या त्या भागातील सदन लोकांना या योजनेत ओढले. विशेष म्हणजे, या एजंटांना पाच हजार रुपयांपासून १ कोटी रुपयाच्या बंगल्यापर्यंत कंपनीने आमिष दाखविले होते. सदस्यांच्या साखळीवर ही बक्षिसे ठेवण्यात आली होती. त्यामुळे या लालसेपोटी एजंटांनी स्वत:चे नातेवाईक, मित्रमंडळी यांना या योजनेत ओढले. योजना बंद पडणार आहे, याबाबतची माहिती एजंटांनाही होती. परंतु, आपला लाभ होत असल्याने इतरांना फसविण्यात गैर काय, या उक्तीप्रमाणे एजंटांनी दिसेल त्याला कंपनीत ओढण्याचा प्रयत्न केला. साधारणत: या योजनेत तालुक्यातील १० हजार लाभार्थी गंडविल्या गेले आहेत. लाभार्थ्याची ही रक्कम १० कोटीच्या घरात आहे. तालुक्यामध्ये ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही एजंटाची मोठी साखळी आहे. विशेषत: शिक्षक, डॉक्टर, कर्मचारी यांच्या माध्यमातून ही योजना शहरातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली. जिंतूर शहरातही एक ते दीड कोटी रुपयांची रक्कम योजनेत गुंतविली आहे. गुंतवणूक करीत असताना लाभार्थ्यांनी अवघ्या काही दिवसात रक्कम पाचपट मिळत आहे, या आमिषाला बळी पडून या योजनेची साखळी वाढत गेली. योजनेमध्ये महिला एजंटांची संख्याही मोठी आहे. काही महिलांनी तर घरातील कर्त्या व्यक्तींना अंधारात ठेवून योजनेमध्ये पैसे गुंतविले. ही योजना बंद पडल्याने या महिलांसमोर मोठा प्रश्न पडला आहे. एजंटाच्या मालमत्तेवर टाच लाभार्थ्यांना योजनेत सहभागी व्हावे, यासाठी एजंटांनी वेगवेगळे आमिष दाखविले. काही एजंटांनी १०० रुपयांच्या बॉन्डवर स्वत:ची मालमत्ता लिहून दिली. काहींनी स्वत:चे धनादेश लिहून दिले. या सर्व प्रकारामुळे लाभार्थी पैशासाठी एजंटाकडे तगादा लावत आहेत. परिणामी तालुक्यातून अनेक एजंट सध्या फरार झाल्याचे समजते. एजंटांनी कमविलेली मालमत्ता ही जप्त करुन लाभार्थ्यांचे पैसे देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.सुशिक्षितही गोवल्या गेलेयोजनेमध्ये पैसा गुंतविणारे सुशिक्षित व्यक्ती आहेत. या व्यक्तींना भविष्यात कंपनी बुडणार आहे, याची जाणीव होती. परंतु, किमान आपण गुंतविलेले पैसे मिळतील, या आशेवर त्यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली. यात प्राध्यापक, डॉक्टर, शिक्षक, वकील व कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. आज या लोकांवर पश्चाताच करण्याची वेळ आली आहे.