शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

दुष्काळाबाबत केवळ बैठकावर बैठकाच..!

By admin | Updated: November 20, 2014 00:47 IST

जालना : जिल्ह्यात अल्पशा पावसामुळे खरिपापाठोपाठ रबीच्या हंगामालाही तडाखा बसला असून दुष्काळाजन्य स्थितीमुळे नागरिक हैराण झालेले आहेत.

जालना : जिल्ह्यात अल्पशा पावसामुळे खरिपापाठोपाठ रबीच्या हंगामालाही तडाखा बसला असून दुष्काळाजन्य स्थितीमुळे नागरिक हैराण झालेले आहेत. अशा काळात प्रशासनाकडून बैठकांवर बैठकाच सुरू असून प्रत्यक्षात कामे काहीच सुरू नसल्याने ग्रामीण भागात भयावह चित्र पाहावयास मिळत आहे.जिल्ह्याची आणेवारी फक्त ३९ पैसे आहे. सर्वच तालुक्यांची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. २०१२ मध्ये जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक दुष्काळ अनुभवला होता. त्यापाठोपाठ आता २०१४ मध्येही दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. विलंबाने व अल्पशा आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खरिपाच्या पेरणीचे नियोजन बिघडले होते. तेव्हा शंभर टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी अल्पशा पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. त्याचा परिणाम म्हणून उत्पन्नात घट झाली. खरिपातील मुख्य पीक कापूस व सोयाबीनवर शेतकऱ्यांनी केलेला खर्चही अद्याप निघाला नाही. रबीच्या पेरण्या ५० टक्क्यांपेक्षाही कमी असून जिल्ह्यात यावर्षी १५ नोव्हेंबरपर्यंत ३७८.१७ मि.मी. म्हणजे वार्षिक सरासरीच्या ५४ टक्के पाऊस झाला. २०१२ व २०१४ या दोन्ही वर्षात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. २०१३ हे वर्ष समाधानकारक पावसामुळे बऱ्यापैकी गेले असले तरी त्यातून आलेल्या उत्पन्नावर यावर्षी पुन्हा पाणी फेरले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे.आगामी काळात पाणीटंचाई, चाराटंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. त्यावेळी काय नियोजन करावयाचे, हे प्रशासनाकडून बैठकांच्या माध्यमातून ठरविले जात आहे. परंतु सद्यस्थितीत काहीच उपाययोजना होत नसल्याचा शेतकऱ्यांमधून सूर आहे. ग्रामीण भागात महावितरणकडून १२ तासांपेक्षा अधिक वेळेचे वीज भारनियमन सुरू आहे. अनेक गावांमध्ये रोहित्रे नादुरूस्त असल्याने शेतीला पाणी देण्यासाठी वीज नाही. रोहित्रांची मागणी केल्यानंतर विविध ठिकाणी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जाते. अशा वेगवेगळ्या समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने याही बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)४दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाकडून उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात कागदोपत्राशिवाय काहीच होत नाही. तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत अधिकाऱ्यांनी आतापासून प्रत्यक्षात ग्रामीण भागाचे दौरे केल्यास त्यांना खरी परिस्थिती लक्षात येईल, अशी प्रतिक्रिया काही जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केली.४जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी सर्वाधिक आणेवारी ४६ पैसे जाफराबाद तालुक्याची तर सर्वात कमी बदनापूर तालुक्याची ३४ आहे. त्या पाठोपाठ मंठा- ३८.१८, भोकरदन- ४०, घनसावंगी ४२.४८, जालना ४०.२५, अंबड ३८, परतूर ३६ पैसे अशी एकूण जिल्ह्याची आणेवारी ३९ पैसे आली आहे.