शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
5
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
6
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
7
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
8
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
9
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
10
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
11
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
12
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
13
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
14
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
15
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
16
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
17
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
18
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
19
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
20
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...

जालना जिल्हा परिषदेत आघाडीत पुन्हा बिघाडी

By admin | Updated: September 22, 2014 00:53 IST

संजय कुलकर्णी , जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रविवारी शिवसेना -भाजपाने युती कायम असल्याचे दाखविले

संजय कुलकर्णी , जालनाजिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रविवारी शिवसेना -भाजपाने युती कायम असल्याचे दाखविले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस, मनसे यांच्यातील बिघाडी यानिमित्ताने पहावयास मिळाली. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अध्यक्षपदाचा उमेदवार अखेरपर्यंत खुद्द उमेदवाराला सुद्धा कळू न देता धक्कातंत्राचा वापर केला. जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना व भाजपाचे प्रत्येकी १५ असे ३० सदस्य आहेत. चार अपक्षांचा त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे ३४ संख्येच्या जोरावर अध्यक्ष, उपाध्यक्ष युतीचा होणार, हे निश्चित होते. कारण विरोधी पक्षाकडून गटनेते सतीश टोपे यांनी ‘ आम्ही फोडाफोडीचे राजकारण करणार नाही, मात्र आमच्याकडे युतीतील कुणी नाराज सदस्य आले तर त्यास आम्ही सोबत घेऊ’ असे म्हटले होते. शुक्रवारी जालन्यात एका खाजगी कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी माजी मंत्री अर्जुनराव खोतकरांना अध्यक्ष सेनेचाच करू, असे तीन वेळा सांगितले. एवढेच नव्हे, तर तेथे उपस्थित असलेले अनिरुद्ध खोतकर, ए.जे. बोराडे यांना ‘तुम्हाला अध्यक्ष व्हायचे का’ असा सवाल करून संमतीही दर्शविली. पंडितराव भुतेकर यांच्या सुविद्य पत्नी आशा भुतेकर यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपद देऊ असे मिश्किलपणे सांगितले होते. स्वत:कडे लाल दिवा असताना दुसरा लाल दिवा दानवे घेणार नाहीत, असा काही सदस्यांचा समज होता. भाजपामध्ये अगोदरच सहा सदस्य अध्यक्षपदाचे बाशिंग लावून तयार असल्याने या सदस्यांमध्ये एकमत होणार नाही व अध्यक्षपद सेनेकडेच जाईल, असाही काहींचा समज होता. मात्र हे समज खोटे ठरवत दानवे यांनी आपल्या पक्षातील इच्छूक सहापैकी दोघांची समज काढली. उर्वरीत चार जणांना तुमच्यातून एक नाव निश्चित करा, असे सांगितले. परंतु हे नाव निश्चित न झाल्याने शेवटी दानवे यांनी अध्यक्षपदासाठी तुकाराम जाधव यांचे नाव सुचविले, त्यास सर्वसंमतीही मिळाली. जिल्हा परिषदेच्या सभागृहात काँग्रेसचे तीन, काँग्रेसप्रणित एक, मनसेचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याही एक महिला सदस्या गैरहजर होत्या. पक्षातील सदस्या आजारी असल्याने येऊ शकल्या नाहीत, असा दावा काही सदस्यांनी केला. मात्र काँग्रेसचे चारही सदस्य का आले नाहीत, याचे कारण राष्ट्रवादीचे सदस्य देऊ शकले नाहीत. मनसेच्या सदस्यानेही गैरहजेरी का दर्शविली, याचा खुलासा होऊ शकला नाही. संख्याबळ कमी असल्याने पराभव होणार, हे राष्ट्रवादीला माहिती होते. परंतु काँग्रेस व मनसे सदस्य त्यांच्यासमवेत न आल्याने आघाडीत बिघाडी झाली, असे चित्र जिल्हा परिषदेत पाहावयास मिळाले.