शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान...

By admin | Updated: December 3, 2014 01:17 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे

व्यंकटेश वैष्णव , बीडआयुष्य छान आहे, थोडे लहान आहेरडतोस काय वेड्या लढण्यात शान आहेकाट्यात ही फुलांची ,झुलती कमान आहेउचलून घे हवे ते, दुनिया दुकान आहेजगणे निरर्थक म्हणतो, तो बेईमान आहे. या सुरेश भटांच्या कवितेच्या ओळीतील बळ अपंगाच्या भरारीत पहावयास मिळते. तेव्हा धडधाकट माणसांच्या कतृत्वाला लाजवेल, असे काम नसलेल्या हातून होत असल्याचा प्रत्यय मंगळवारी आला. स्वत: च्या वेदनांची कैफीयत इतरांना सांगून, कोणी तरी आपल्यावर कीव करावी. या मानसिकतेला छेद देऊन अपंग असताना देखील कुटुंबांचा आधार बनलेल्या लढवय्यांची जिद्द वाखण्यासारखी आहे. जागतिक अपंगदिनाच्या निमित्ताने अशा लढवय्यांच्या प्रवासाचा घेतलेला आढावा.अविनाश मुडेगावकर ल्ल अंबाजोगाईअपंगत्व असतानाही त्यावर मात करीत इतर सामान्य माणसांप्रमाणेच बँकेच्या दैनंदिन कामकाजात सहाय्यक व्यवस्थापक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका निष्ठेने सांभाळणाऱ्या अभिजित सुगावकर - देशपांडे, यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. दोन्ही हातांना बोट नसतांनाही मनगटाच्या साह्याने ते संगणकाची हाताळणी करून बँकेचा व्यवहार सांभाळतात. त्यांचे अक्षरही अत्यंत सुंदर आणि वळणदार आहे. दोन्ही हाताला बोटे नसतांनाही त्यांचे वळणदार अक्षर पाहून पाहणारा व्यक्ती अचंबित होतो. अंबाजोगाई येथील अभिजित सुगावंकर-देशपांडे हे येथील वैद्यनाथ सहकारी बँकेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून गेल्या १७ वर्षांपासून काम पाहतात. अंगी अपंगत्व असतानाही सामान्य माणसांप्रमाणे त्यांचा दिनक्रम कायम सुरू असतो. अभिजित यांच्या दोन्ही हातांना बोटे नाहीत. जन्मत:च अपंगत्व प्राप्त झाल्याने हात मनगटापर्यंत तर पायांचीही स्थिती तशीच आहे. पायांनाही बोटे नाहीत. परंतु अभिजित यांना आपल्या अपंगात्वाबद्दल बालवयापासून कधीही संकोच वाटला नाही. सामान्य माणसाप्रमाणे त्यांचे दैनंदिन जीवन नियमित सुरू आहे. वैद्यनाथ बँकेत १७ वर्षांपूर्वी लिपिकाच्या पदासाठी ते मुलाखतीस परळीला गेले. मुलाखतीच्या वेळेस अभिजित यांच्याकडे पाहून ही अपंग व्यक्ती काम कशी करेल? याची खात्री संचालक मंडळाला वाटेना. त्यांनी अभिजित यास लिहिण्यास सांगितले. त्यांचे अक्षर पाहून उपस्थित संचालक मंडळी भारावून गेली आणि अभिजित यांना बँकेत रुजू करून घेण्यात आले. वैद्यनाथ बँकेच्या बीड, परळी अशा विविध शाखांमध्ये काम केल्यानंतर ते आता अंबाजोगाईच्या शाखेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. इतर कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्या बरोबरीने त्यांच्या कामाचा झपाटा सुरू असतो. संगणक हाताळणी असो वा लिखाणाचे काम कोणत्याच बाबतीत त्यांची माघार नसते. बँकेत कामकाजासाठी आलेला ग्राहकही अभिजित यांच्याकडे पाहून आचंबित होतो. अंगी असलेल्या अपंगत्वावर मात करत सामान्य माणसांप्रमाणे जीवन जगण्याची त्यांची हातोटी अपंगांसाठी प्रेरणादायी ठरेल. राजेश खराडे ल्ल बीडधड मराठी बोलता न येणारा उत्तरप्रदेशातील अमरसिंह कुशवाह या अपंग पण उमद्या तरूणाने बीडमध्ये येऊन हातगाडा चालवायला सुरूवात केली. पोटाची खळगी भरण्यासाठी राज्य सोडून येताना रक्ताच्या नात्याला तो दुरावला.जन्मताच अपंग असलेल्या अमरसिंगने हिंमत सोडली नाही. एका पायाने पूर्णत: अपंग असतानाही तो महिन्याकाठी पाच ते सहा हजार रुपये कमावतो, असे त्याने मोठ्या अभिमानाने सांगितले. जगण्याचा आधार बनलेली फक्त काठीच सध्या अमरसिंग कुसवा यांचा आधार म्हणून जवळ राहिली आहे. आग्रा येथील अमरसिंग गेल्या दोन वर्षांपासून गाव सोडून शहरातील सुभाष रोड येथे गाड्यावर कपडे विकण्याचे काम रोजंदारीने करीत आहे. कुटुंबातील सर्व सदस्य हे रोडवरील दगडी कामकाज करण्यासाठी बाहेर पडत असत. पण अमरसिंगला जन्मताच अपंगत्व आल्याने जड वस्तू उचलण्यात त्रास होत होता. इतर ठिकाणीही काम मिळणे मुश्लिक असल्याने त्याने आपल्या मित्रांसमवेत थेट राज्य सोडले.दिवसाकाठी फक्त दोनशे रुपयांसाठी अमरसिंगला तब्बल बारा तास एका पायावर उभे रहावे लागत आहे. एका पायाने अपंगत्व असल्याने उभे राहिल्यावर काठीचा तर हातगाडा ढकलताना गाड्याचा आधार घ्यावा लागत आहे. या कामातून महिन्याला सहा हजार मिळकत असल्याने अमरसिंग गावाकडे जाणेही टाळत आहेत. मात्र अशा परिस्थितीवर हसतमुखाने मात करून आनंदी राहण्याचा प्रयत्न ते करीत आहेत.पुरुषोत्तम करवा ल्ल माजलगाववयाच्या पाचव्या वर्षीच अपघाताने अपंगत्व आले. अपघातात एक हात निकामी झाला. यामुळे कुठलेच जड काम करता येणे शक्य नाही. मात्र न खचता त्याने बुट, चप्पल विक्रीचा व्यवसाय सुरू केला. चक्क एका हातानेच त्यांना ओढावा लागतो कुटुंबाचा व चप्पल, बुटचा गाडा...माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील रहिवाशी अंकुश हिरामन कांबळे या पंचेवीस वर्षीय अपंग अंकुशच्या घरची परिस्थिती हालाकिचीच. अंकुश लहान असताना आई वडील कामाच्या शोधात मुंबईला गेले होते. मुंबईत आई-वडीेल काम करत असताना रस्त्यावर खेळत असलेल्या अंकुशला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. यात अंकुशचा उजवा हात निकामी झाला होता. त्या घटनेनंतर आई वडिलांनी आपले गाव गाठले. अंकुश मोठा झाल्यावर कुटुंबाची सर्व जबाबदारी अपंग अंकुशवर आली. मात्र तो डगमगला नाही. कसेबसे चार पैसे गोळा करून त्याने माजलगाव येथे चप्पल, बुटचा गाडा टाकला. यातून मिळणाऱ्या पैशावरच अंकुश आपल्या तीन मुलांचे शिक्षण करत आहे. त्याच्या या खडतर प्रवासात त्याची पत्नी मंगल ही त्याची मदत करते. असे अंकुश सांगतो. आपला व्यावसाय मोठा करण्यासाठी त्याने शासन दरबारी मदत मागितली मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याचे त्याचे म्हणणे आहे.