शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

कोट्यवधींची गुंतवणूक; लाखोंना मिळणार रोजगार

By admin | Updated: June 19, 2014 00:53 IST

मुजीब देवणीकर , औरंगाबाद केंद्र शासनाने औरंगाबादसाठी इलेक्ट्रॉनिक हबची घोषणा केल्याने औद्योगिक वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.

मुजीब देवणीकर , औरंगाबादकेंद्र शासनाने औरंगाबादसाठी इलेक्ट्रॉनिक हबची घोषणा केल्याने औद्योगिक वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. इलेक्ट्रॉनिक हब दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरचा (डीएमआयसी) एक भाग असणार आहे. हबमध्ये इलेक्ट्रॉनिक कंपन्या उभारणाऱ्या उद्योजकांना विविध सुविधा, सवलतीही देण्यात येणार आहेत. मोठ्या कंपन्या कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करतील, त्यांच्यासोबत काही व्हेंडरही येतील. बेरोजगारांना रोजगारांच्या संधीही प्राप्त होणार आहेत. ही सर्व प्रक्रिया औद्योगिक विकासाला गती देणारी ठरेल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.दोन हजार कोटींचा बिझनेसव्हिडिओकॉन ही सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक कंपनी शहरात आहे. या कंपनीला माल पुरवठा करणारे अनेक छोटे उद्योजक आहेत. याशिवाय औरंगाबाद इलेक्ट्रिक ग्रुप, सिमेन्स, क्रॉम्प्टन ग्रिव्हजसह अ‍ॅटोमेशन क्षेत्रातील १७-१८ कंपन्या शहरात आहेत. या क्षेत्रातील वार्षिक उलाढाल सुमारे दोन हजार कोटी आहे. इलेक्ट्रॉनिक हबमुळे हा आकडा कितीतरी पट वाढू शकतो.सीईडीटी सेंटर औरंगाबादेतसेंटर फॉर इलेक्ट्रॉनिक्स डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (सीईडीटी) ही संस्था इलेक्ट्रॉनिक्स जगताला मनुष्यबळ पुरवत असते. या संस्थेचे केंद्र विद्यापीठ परिसरातच आहे. भविष्यात इलेक्ट्रॉनिक्स हबला लागणारे कुशल मनुष्यबळ पुरविणारी संस्थाच शहरात असल्याने येणाऱ्या उद्योजकांना फारसा त्रास सहन करावा लागणार नाही.जबाबदारी वाढणार1औरंगाबादेत इलेक्ट्रॉनिक हब उभारणार ही आनंदाची बाब आहे. शहरात इलेक्ट्रॉनिक बेस खूपच मजबूत आहे. आॅटोमोटिव्हनंतर नवीन इलेक्ट्रॉनिक हब आल्यास जबाबदारी वाढणार आहे. कारण छोट्या उद्योजकांसाठी क्लस्टर तयार करून द्यावा लागेल. औद्योगिक संघटनांना यासाठी पाठपुरावा करावा लागेल. सीएमआयएचा एक स्वतंत्र सेल यासाठी काम करीत आहे. अ‍ॅटोमेशनमध्ये काम करणारे अनेक लोक शहरात आहेत. त्यांनाही हबचा फायदा होईल, असे सीएमआयचे माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले.2कच्च्या तेलाच्या आयातीवर केंद्र सरकारला जेवढा खर्च करावा लागतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त पैसा इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या आयातीवर करावा लागतो. भारतीय अर्थव्यवस्थेला मारक ठरणारी ही प्रक्रिया ब्रेक व्हावी या उद्देशाने केंद्र शासनाने देशभरातील आठ शहरांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स हब उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये औरंगाबादचाही समावेश असून, हबमुळे शहराच्या औद्योगिक विकासाला गती मिळेल, कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाखो बेरोजगारांना रोजगार मिळेल.राज्यात तीन हब1२०२० मध्ये भारताला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या आयातीवर वार्षिक ३०० अरब डॉलर खर्च करावे लागतील. कच्च्या तेलापेक्षाही ही परिस्थिती भयावह आहे. त्यामुळे केंद्राने भारतात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत.2 महाराष्ट्रात नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद या शहरांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स हब उभारण्यात येणार आहे.दीड वर्षापूर्वीच चाचपणी1देशात इलेक्ट्रॉनिक हब आणि क्लस्टर उभारण्याची योजना दीड वर्षापूर्वी यूपीए सरकारने सुरू केली होती. काही कारणांमुळे ही योजना पूर्ण झाली नव्हती. या योजनेला गती देण्याचे काम नरेंद्र मोदी सरकारने सुरू केले आहे. दीड वर्षापूर्वी प्रधान सचिवांच्या नेतृत्वाखाली एक पथक औरंगाबादेत आले होते.2या पथकाने इलेक्ट्रॉनिक हबसंदर्भात चाचपणी केली होती. पथकासमोर सीएमआयए या औद्योगिक संघटनेने एक सुंदर प्रेझेंटेशन सादर केले होते. इलेक्ट्रॉनिक हबसाठी औरंगाबादेत कशा पद्धतीने पोषक वातावरण आहे, याची माहिती देण्यात आली होती.