शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव

By admin | Updated: September 14, 2014 23:38 IST

येलदरी : शेतकऱ्यांनी जून-जुलैमध्ये सोयाबीनची पेरणी केली होती़ परंतु, त्यानंतर आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये पडलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकातील पाण्याचा निचरा न झाल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे़

येलदरी : शेतकऱ्यांनी जून-जुलैमध्ये सोयाबीनची पेरणी केली होती़ परंतु, त्यानंतर आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये पडलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकातील पाण्याचा निचरा न झाल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे़ त्यातच आता अळीनेही डोके वर काढल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे़ येलदरी, सावंगी म्हाळसा, मुरूमखेडा या भागातील शेतकऱ्यांनी जून, जुलैमध्ये अल्पश: पावसावर खरिपाची पेरणी केली होती़ जिल्ह्यात कधी नव्हे, एवढे पीक येलदरी, सावंगी म्हाळसा या परिसरात जोमात आले होते़ आॅगस्ट या महिन्यात पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांनी पाणी देऊन सोयाबीनचे पीक जगविण्याचा प्रयत्न केला़ यामुळे सोयाबीन पीक जोमात आले होते़ परंतु, २४ आॅगस्ट रोजी या परिसरात १२३ मिमी एवढा पाऊस पडला़ त्यामुळे या परिसरातील शेतामध्ये पाणीच पाणी झाले़ पावसाच्या पाण्याचा शेतातून निचरा होत नसल्याने सोयाबीनचे पीक जागेवरच जळून गेले़ त्याचबरोबर सोयाबीन पिकावर खोडा अळी, ऊंट अळी, चक्रीभुंगा आदी अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने झाडाला शेंगाच राहिल्या नाहीत़ काही झाडांना १० ते १५ एवढ्याच शेंगा लागल्या आहेत़ त्यामुळे सोयाबीनच्या उताऱ्यामध्ये लक्षणीय घट होणार आहे़ केलेला खर्च निघतो की नाही, असा प्रश्नही शेतकऱ्यांना पडला आहे़त्यामुळे शेतकऱ्यांना पीक नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे़ (वार्ताहर)