शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

बेकायदेशीर प्लॉट; नागरिकांना दिलासा

By admin | Updated: September 12, 2014 00:04 IST

हिंगोली : शहरात नगरविकास आराखड्यानुसार आरक्षित जागेवर बेकायदेशीररित्या प्लॉट पाडून त्याची विक्री करीत नागरिकांची फसवणूक झाल्याप्रकरणी दाखल जनहित याचिकेवर खंडपिठातसुनावणी झाली.

हिंगोली : शहरात नगरविकास आराखड्यानुसार आरक्षित जागेवर बेकायदेशीररित्या प्लॉट पाडून त्याची विक्री करीत नागरिकांची फसवणूक झाल्याप्रकरणी दाखल जनहित याचिकेवर औरंगाबाद खंडपिठात गुरूवारी अंतिम सुनावणी झाली. त्यात बहुतांश बेकायदा बांधकामे नियमित करून घेण्यासंदर्भात नगर परिषदेला निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.१९९४ साली हिंगोली शहराचा नगर विकास आराखडा मंजूर करण्यात आला होता. त्यात वेगवेगळ्या उपयोगासाठी विविध प्रकारचे आरक्षण ठेवण्यात आले होते. पुढील २० वर्षातील लोकसंख्या वाढ लक्षात घेवून हे आरक्षण केले होते. मात्र सदरील आरक्षित जागेवर बेकायदेशीरित्या ‘एनए लेआऊट’ न करता व जिल्हाधिकाऱ्यांची कुठलीही परवानगी न घेता प्लॉट पाडून त्याची विक्री करीत लोकांची फसवणूक करण्यात आली, या आशयाची जनहित याचिका तुकाराम झाडे यांनी १९९८ मध्ये न्यायालयात दाखल केली होती. त्यावर अनेक वेळा सुनावणी झाली. दरम्यान, गुरूवारी औरंगाबाद खंडपीठात झालेल्या अंतिम सुनावणीमध्ये बेकायदेशीर प्लॉट प्रकरणात न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. हिंगोली शहरातील आजम कॉलनी, शिवराज नगर, खुशाल नगर, इंदिरा नगर, साई नगर, खाजा कॉलनी, फ्रेन्डस् कॉलनी आदी भागातील प्लॉटच्या कायदेशीर बाबीसंदर्भात न्यायालयात प्रकरण चालू होते. त्यामुळे या भागातील नागरिक मुलभूत सोई-सुविधांपासून वंचित होते. आता खंडपिठाने नगर परिषदेला त्या अनुषंगाने काही निर्देश दिले आहेत. २००१ च्या गुंठेवारी अधिनियमाप्रमाणे ज्या-ज्या नागरिकांना रेग्युलराईज (नियमित) करता येते, त्यांना नियमित करण्यासंदर्भात न.प.ने निर्णय घ्यावा. ज्यांना नियमित करता येणार नाही त्यांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासंदर्भात एक वर्षाच्या आत कोणती कार्यवाही केली, त्याचा अहवाल न्यायालयास सादर करावा, असे निर्देशात म्हटले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आयुक्त, जिल्हाधिकारी, न.प.चे मुख्याधिकारी, नगर विकास सचिव यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. खटल्यात न. प. तर्फे अ‍ॅड. सचिन देशमुख, अ‍ॅड. एस. एस. चौधरी, नागरिकांतर्फे अ‍ॅड. हमजाखान, अ‍ॅड. सुनील दरगड, अ‍ॅड. पवन अग्रवाल, अ‍ॅड. अखील अहेमद, अ‍ॅड. एस. टी. शेळके यांनी काम पाहिले. तसेच माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, नगरसेवक शेख शकील, शेख निहाल, महमंद खालीद, शेख नईम यांनीही नागरिकांच्या बाजूने सदर प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. या संदर्भात नगरसेवक शेख निहाल यांना विचारले असता, औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निर्णय बहुतांश प्लॉटधारक नागरिकांच्या हिताचा आहे. बेकायदेशीर बांधकाम झालेल्या वसाहतीत खाजगी मालमत्ता असल्याने न्यायालयाने त्या संदर्भात न. प. ला अधिकार देवून कायदेशीर कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)