शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने केली मोठी खेळी, ठाकरेंचे बहुसंख्य उमेदवार ठरले असते बाद; पण ऐनवेळी डाव उलटला अन्...
2
ठाण्यात शिंदेसेनेने जागा वाटपामध्ये भाजपचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’; 'त्या' नऊ जागा बांधल्या भाजपच्या गळ्यात 
3
"तर आम्ही कुठल्याही थराला जाऊ"; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या असीम मुनीरचा इशारा
4
मनसेच्या मुंबईतील उमेदवारांना राज ठाकरेंचा मोलाचा सल्ला, म्हणाले, ‘तुम्हाला ऑफर येतील, पण…’
5
'ऑपरेशन सिंदूर सुरूच...' लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानला करून दिली आठवण
6
"जितकी मिरची ठाकरे गटाला...", नितेश राणेंचा उद्धवसेनेवर हल्ला, 'उत्तर भारतीय महौपार' मुद्द्यावर काय बोलले?
7
Gold Silver Price Today: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चेक करा १८ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
8
टॅरिफमुळे US ची किती कमाई? "टीका करणारे मुर्ख" असं म्हणणारे ट्रम्प प्रत्येकाला $२००० देण्याचं वचन पूर्ण करणार का?
9
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
10
बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले...
11
२०२६ मध्ये या ५ राज्यात रंगणार सत्तेचा सारीपाट, बाजी कोण मारणार, NDA की ‘INDIA’?
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचे पडसाद! 'या' दोन देशांनी अमेरिकन नागरिकांच्या प्रवेशावर घातली बंदी
13
जळगावात भाजपाला धक्का, माजी महापौरांचा अर्ज बाद; AB फॉर्ममधील त्रुटीचा उद्धवसेनेलाही फटका
14
Healthy Diet: अन्न तेच पण पद्धत वेगळी! जपानी लोक लठ्ठ का होत नाहीत? त्यामागे आहेत ५ सिक्रेट 
15
कोकण गाजवल्यावर शिंदेचा फायर ब्रँड नेता मुंबईत; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दिली मोठी जबाबदारी
16
“आम्ही दोघं राजा-राणी…” विरुष्काचं प्रेम अन् MS धोनी–साक्षीची ‘राजकुमारी’सोबतची खास फ्रेम चर्चेत
17
भारताची चीनवर कडी...! 'या' उत्पादनातही मागे टाकलं; ड्रॅगनची चिंता वाढली
18
Nashik Municipal Corporation Election : डबल एबी फॉर्म अन् बडगुजरांचा ट्रिपल धमाका; आमदार सीमा हिरेंसह भाजपला धक्का
19
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
20
उड्डाणापूर्वी एअर इंडियाचा पायलट दारू प्यायला; अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात, DGCA कारवाई करणार
Daily Top 2Weekly Top 5

मिटरला छेडल तर पळतयं अधिक

By admin | Updated: September 22, 2014 00:55 IST

राजेश खराडे , बीड महावितरणच्या वतीने शहरात इन्फ्रारेड (आय.आर.) पद्धतीचे मीटर बसविण्यात आली आहेत. या आधुनिक पद्धतीच्या मीटरशी छेडछाड केल्यास ते दुप्पट गतीने पळत

राजेश खराडे , बीडमहावितरणच्या वतीने शहरात इन्फ्रारेड (आय.आर.) पद्धतीचे मीटर बसविण्यात आली आहेत. या आधुनिक पद्धतीच्या मीटरशी छेडछाड केल्यास ते दुप्पट गतीने पळत असल्याने वीज चोरीला ‘बे्रक’ लागण्यास मोठी मदत मिळत आहे. पुढीला काळात वीज चोरी पूर्णत: रोखली जाईल, असा आशावाद या निमित्ताने निर्माण आहे. वीज चोरी होत असल्याने महावितरणचा कोट्यावधीचा तोटा होत असल्याचे यावेळी अनेकवेळा समोर आले आहे. त्यामुळे महावितरणने जिल्ह्यात आयआर पद्धतीचे मीटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गेल्या सहा ते आठ महिन्यांच्या कालावधीत शहरातील ३६ हजार ग्राहकांपैंकी २८ हजार ग्राहकांना आय.आर मीटर बसिवण्यात आले आहे. पुर्वी इलेक्ट्रानिक पद्धतीचे मीटर बसविण्यात आली होती. त्याच्यासाठी रिमोटचा वापर होत असल्याचे अधिकाऱ्यांच्या समोर आल्याने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन इन्फ्रारेड पद्धतीचे मीटर तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे मीटरची रिडींग ही कागदावर न होता रिमोट कंट्रोल द्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना अचुक वीज बिल मिळत आहे. शहरात सर्वत्र मीटर बसिवण्याची मोहिम सुरू असून अद्यापर्यंत २८ हजार ग्राहकांना हे मीटर बसविण्यात आली आहेत. आयआर मीटर हे रिमोटद्वारे हताळले जात असून मीटरमधील रिडींग ही डायरेक्ट मशीनद्वारे घेतली जात असल्याने अचूक अंकाची नोंद होते. आय.आर मीटरचे वैंशिष्ट म्हणजे मीटरची स्पीड कमी करण्याचा प्रयत्न केल्यास मीटर अधिक गतीने पळते. परिणामी अतिरीक्त रिडींगची नोंद होत असल्याने याचा फटका हा ग्राहकांनाच होतो.आॅनलाईन तक्रारीचा ग्राहकांना लाभगेल्या एक ते दीड वर्षाखाली ग्राहक वीज बिल चुकीचे आले असल्याच्या तक्रारी लेखी स्वरुपात महावितरण कार्यालयात देत असत. तो अर्ज संबंधित अभियंत्याकडे गेल्यानंतर त्याची चौकशी व्हायची. या क्लिष्ट प्रक्रियेत बराच काळ जायचा. मात्र आता आॅनलाईन तक्रारीची सुविधा महावितरणने सुरू केली आहे. ग्राहक चुकीचे वीज बिल आल्यास किंवा इतर तक्रारी असल्यास आॅनलाईन पद्धतीने नोंदू शकत आहेत. त्यामुळे या तक्रारी निकाली काढण्याच्या सूचना संबंधितत अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. तक्रारीची दखल घेतली नाही तर तीच तक्रार वरिष्ठ अभियंते, उपअभियंते व अधीक्षक यांच्याकडे जात आहे. तसेच त्यांनीही दखल घेतली नाही तर थेट महावितरणच्या मुख्य कार्यालयाच्या वतीने दखल घेण्यात येत आहे. महावितरणच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांच्या तक्रारी निकाली निघत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार ग्राहकांची तक्रार संख्या पाच-सहा हजारावरुन अधिक झाली आहे.