शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

मिटरला छेडल तर पळतयं अधिक

By admin | Updated: September 22, 2014 00:55 IST

राजेश खराडे , बीड महावितरणच्या वतीने शहरात इन्फ्रारेड (आय.आर.) पद्धतीचे मीटर बसविण्यात आली आहेत. या आधुनिक पद्धतीच्या मीटरशी छेडछाड केल्यास ते दुप्पट गतीने पळत

राजेश खराडे , बीडमहावितरणच्या वतीने शहरात इन्फ्रारेड (आय.आर.) पद्धतीचे मीटर बसविण्यात आली आहेत. या आधुनिक पद्धतीच्या मीटरशी छेडछाड केल्यास ते दुप्पट गतीने पळत असल्याने वीज चोरीला ‘बे्रक’ लागण्यास मोठी मदत मिळत आहे. पुढीला काळात वीज चोरी पूर्णत: रोखली जाईल, असा आशावाद या निमित्ताने निर्माण आहे. वीज चोरी होत असल्याने महावितरणचा कोट्यावधीचा तोटा होत असल्याचे यावेळी अनेकवेळा समोर आले आहे. त्यामुळे महावितरणने जिल्ह्यात आयआर पद्धतीचे मीटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गेल्या सहा ते आठ महिन्यांच्या कालावधीत शहरातील ३६ हजार ग्राहकांपैंकी २८ हजार ग्राहकांना आय.आर मीटर बसिवण्यात आले आहे. पुर्वी इलेक्ट्रानिक पद्धतीचे मीटर बसविण्यात आली होती. त्याच्यासाठी रिमोटचा वापर होत असल्याचे अधिकाऱ्यांच्या समोर आल्याने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन इन्फ्रारेड पद्धतीचे मीटर तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे मीटरची रिडींग ही कागदावर न होता रिमोट कंट्रोल द्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना अचुक वीज बिल मिळत आहे. शहरात सर्वत्र मीटर बसिवण्याची मोहिम सुरू असून अद्यापर्यंत २८ हजार ग्राहकांना हे मीटर बसविण्यात आली आहेत. आयआर मीटर हे रिमोटद्वारे हताळले जात असून मीटरमधील रिडींग ही डायरेक्ट मशीनद्वारे घेतली जात असल्याने अचूक अंकाची नोंद होते. आय.आर मीटरचे वैंशिष्ट म्हणजे मीटरची स्पीड कमी करण्याचा प्रयत्न केल्यास मीटर अधिक गतीने पळते. परिणामी अतिरीक्त रिडींगची नोंद होत असल्याने याचा फटका हा ग्राहकांनाच होतो.आॅनलाईन तक्रारीचा ग्राहकांना लाभगेल्या एक ते दीड वर्षाखाली ग्राहक वीज बिल चुकीचे आले असल्याच्या तक्रारी लेखी स्वरुपात महावितरण कार्यालयात देत असत. तो अर्ज संबंधित अभियंत्याकडे गेल्यानंतर त्याची चौकशी व्हायची. या क्लिष्ट प्रक्रियेत बराच काळ जायचा. मात्र आता आॅनलाईन तक्रारीची सुविधा महावितरणने सुरू केली आहे. ग्राहक चुकीचे वीज बिल आल्यास किंवा इतर तक्रारी असल्यास आॅनलाईन पद्धतीने नोंदू शकत आहेत. त्यामुळे या तक्रारी निकाली काढण्याच्या सूचना संबंधितत अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. तक्रारीची दखल घेतली नाही तर तीच तक्रार वरिष्ठ अभियंते, उपअभियंते व अधीक्षक यांच्याकडे जात आहे. तसेच त्यांनीही दखल घेतली नाही तर थेट महावितरणच्या मुख्य कार्यालयाच्या वतीने दखल घेण्यात येत आहे. महावितरणच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांच्या तक्रारी निकाली निघत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार ग्राहकांची तक्रार संख्या पाच-सहा हजारावरुन अधिक झाली आहे.