शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
2
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
3
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
4
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
5
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
6
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
7
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
8
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
9
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
10
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!
11
Pune Rape: तोंडावर स्प्रे फवारून तरुणीवर बलात्कार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्यानं पुणे हादरलं
12
Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं?
13
Bank of Baroda मध्ये जमा करा २,००,००० रुपये; मिळेल, ₹४७,०१५ चं फिक्स व्याज आणि हमीही, जाणून घ्या
14
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
15
आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं
16
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
17
कार खरेदीवर ४ लाखांपर्यंत डिस्काउंट; कंपन्या करत आहेत ‘स्टॉक’ क्लीअर
18
सिबिल स्कोअर खराब होता, स्टेट बँकेनं नोकरीच दिली नाही; कोर्टानंही म्हटलं, "पैशांच्या बाबतीत..."
19
भारताचा पाकिस्तानी सेलिब्रिटींना दणका, २४ तासांत पुन्हा एकदा सोशल मीडिया अकाउंट केले ब्लॉक!
20
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज

हुश्श..! संपातून अखेर सुटका !!

By admin | Updated: January 16, 2015 01:06 IST

जालना : मंगळवारपासून बंद असलेल्या शहरातील सर्व रिक्षा गुरूवारी दुपारी तीननंतर धावू लागल्या आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

जालना : मंगळवारपासून बंद असलेल्या शहरातील सर्व रिक्षा गुरूवारी दुपारी तीननंतर धावू लागल्या आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन देतानाच ५६ थांब्यांच्या सुधारणांसाठी १० लाखांचा निधी देण्याची सूचना नगरपालिका प्रशासनाला केली. हा निर्णय होण्याआधी दुपारपर्यंत मात्र प्रवाशांची फरफट सुरूच होती.शहर पोलिसांकडून मारहाण होत असल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या रिक्षा युनियनने हा बंद पुकारला होता. अन्य रिक्षाचालकांनी पाठिंबा देत बंदमध्ये सहभाग नोंदविला होता. त्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल सुरू झाले होते. गुरुवारी सकाळपासूनच रेल्वेस्थानक, बसस्थानकाबाहेर पडणाऱ्या प्रवाशांची रिक्षाचा शोध घेताना दमछाक होत होती. बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरात वाहतूक शाखेच्या काही अधिकाऱ्यांनी तेथील रिक्षाचालकांशी चर्चा करून बंद मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र त्यावेळी रिक्षाचालक आपल्या निर्णयावर ठाम होते. परंतु दुपारी ३ वाजता रिपब्लिकन रिक्षा युनियनचे अध्यक्ष अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालकमंत्री बबनराव लोणीकर यांची सर्व्हे क्रमांक ४८८ मधील शासकीय विश्रामगृहासमोर भेट घेतली. पालकमंत्र्यांशी यावेळी विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. रिक्षाचालकांना पोलिसांनी अचानक मारहाण करू नये, नगरपालिका व पोलिसांनी ठरविलेल्या थांब्यांना मंजुरी द्यावी व त्वरीत अंमलबजावणी करावी इत्यादी मागण्यांचा त्यात समावेश होता. या मागण्यांवर शुक्रवारी प्रशासनासमवेत होणाऱ्या बैठकीत चर्चा करून त्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन पालकमंत्री लोणीकर यांनी दिल्यानंतर रिक्षाचालकांनी बंदचा निर्णय मागे घेतल्याचे जाहीर केले. यावेळी रिक्षा युनियनचे शहराध्यक्ष अनिल खिल्लारे, विजय खरात, संजय म्हस्के, सतीश वाहुळे आदी उपस्थित होते. हा संप मागे घेण्यात आल्याने जालनेकरांची कसरत अखेर थांबली.