शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

हुश्श..! संपातून अखेर सुटका !!

By admin | Updated: January 16, 2015 01:06 IST

जालना : मंगळवारपासून बंद असलेल्या शहरातील सर्व रिक्षा गुरूवारी दुपारी तीननंतर धावू लागल्या आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

जालना : मंगळवारपासून बंद असलेल्या शहरातील सर्व रिक्षा गुरूवारी दुपारी तीननंतर धावू लागल्या आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन देतानाच ५६ थांब्यांच्या सुधारणांसाठी १० लाखांचा निधी देण्याची सूचना नगरपालिका प्रशासनाला केली. हा निर्णय होण्याआधी दुपारपर्यंत मात्र प्रवाशांची फरफट सुरूच होती.शहर पोलिसांकडून मारहाण होत असल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या रिक्षा युनियनने हा बंद पुकारला होता. अन्य रिक्षाचालकांनी पाठिंबा देत बंदमध्ये सहभाग नोंदविला होता. त्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल सुरू झाले होते. गुरुवारी सकाळपासूनच रेल्वेस्थानक, बसस्थानकाबाहेर पडणाऱ्या प्रवाशांची रिक्षाचा शोध घेताना दमछाक होत होती. बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरात वाहतूक शाखेच्या काही अधिकाऱ्यांनी तेथील रिक्षाचालकांशी चर्चा करून बंद मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र त्यावेळी रिक्षाचालक आपल्या निर्णयावर ठाम होते. परंतु दुपारी ३ वाजता रिपब्लिकन रिक्षा युनियनचे अध्यक्ष अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालकमंत्री बबनराव लोणीकर यांची सर्व्हे क्रमांक ४८८ मधील शासकीय विश्रामगृहासमोर भेट घेतली. पालकमंत्र्यांशी यावेळी विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. रिक्षाचालकांना पोलिसांनी अचानक मारहाण करू नये, नगरपालिका व पोलिसांनी ठरविलेल्या थांब्यांना मंजुरी द्यावी व त्वरीत अंमलबजावणी करावी इत्यादी मागण्यांचा त्यात समावेश होता. या मागण्यांवर शुक्रवारी प्रशासनासमवेत होणाऱ्या बैठकीत चर्चा करून त्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन पालकमंत्री लोणीकर यांनी दिल्यानंतर रिक्षाचालकांनी बंदचा निर्णय मागे घेतल्याचे जाहीर केले. यावेळी रिक्षा युनियनचे शहराध्यक्ष अनिल खिल्लारे, विजय खरात, संजय म्हस्के, सतीश वाहुळे आदी उपस्थित होते. हा संप मागे घेण्यात आल्याने जालनेकरांची कसरत अखेर थांबली.