शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

मानवी कल्याणच बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू-के.संघरक्षित

By admin | Updated: January 6, 2015 13:05 IST

संपूर्ण मानवांचे कल्याण साधणे हा बुद्धांच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. मनुष्याच्या कल्याणासाठी भगवान बुद्धाने ३८ मंगल सांगितले.

नांदेड : संपूर्ण मानवांचे कल्याण साधणे हा बुद्धांच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. मनुष्याच्या कल्याणासाठी भगवान बुद्धाने ३८ मंगल सांगितले. त्या मंगल सूत्रांच्या उपदेशाप्रमाणे आचरण केल्यास मनुष्याचे हित साधले जाईल असे प्रतिपादन भदंत के. संघरक्षित महाथेरो यांनी केले.महाविहार बावरीनगर दाभड येथे लाखो उपासकांच्या उपस्थितीत रविवारी धम्म परिषदेस प्रारंभ झाला आहे. अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत भदंत के. संघरक्षित महाथेरो यांची उद््घाटनप्रसंगी धम्मदेसना झाली. ते म्हणाले, प्राचीन काळापासून भिक्खू संघाने धम्म जिवंत ठेवण्याचे कार्य केले आहे. तेच कार्य वर्तमानकाळातील भिक्खू संघही करीत असल्याचे ते म्हणाले.डॉ. व्ही. के. भालेराव यांच्या 'संबोधी' या स्मरणिकेचे तसेच 'बुद्धकालीन बावरी ब्राह्मण आणि बावरीनगरच्या ऐतिहासिक धम्मपरिषदा' या ग्रंथाचे प्रकाशन भदंत अंगुलीमाल शाक्यपुत्र महाथेरो, भिक्खूसंघ, डॉ. एस. पी. गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. तैवानच्या आर्याजी विशुद्धी, आर्याजी खेमा, भदंत अंगुलीमाल, शक्यपुत्र महाथेरो, भदंत प्रा. डॉ. एम. सत्यपाल, भंते प्रज्ञापाल, भंते बी धम्मसेन, भंते पय्याबोधी, सुभूती, भदंत धम्मसेवक महाथेरो यांचीही धम्मदेसना झाली. डॉ. भालेराव यांनी प्रास्ताविकात बावरीनगर धम्मपरिषदेचा इतिहास विशद केला.