शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

वसतिगृहे कागदावरच!

By admin | Updated: November 23, 2014 00:26 IST

संजय तिपाले ,बीड ऊसतोड मजुरांची मुले शिक्षणप्रवाहातून बाहेर पडू नयेत, या उदात्त हेतूने सर्व शिक्षा अभियानांतर्गत हंगामी वसतिगृहे सुरु केली जातात.

संजय तिपाले ,बीड ऊसतोड मजुरांची मुले शिक्षणप्रवाहातून बाहेर पडू नयेत, या उदात्त हेतूने सर्व शिक्षा अभियानांतर्गत हंगामी वसतिगृहे सुरु केली जातात. जिल्ह्यात चालू वर्षी ४८० वसतिगृहांना ंमंजुरी मिळाली आहे; परंतु अनुदान लाटण्यासाठी केवळ कागदी घोडे नाचविण्यातच सारे मश्गूल आहेत. एक महिना उशिरा सुरु झालेल्या वसतिगृहांचा एकही अहवाल अद्याप शिक्षण विभागाकडे आलेला नाही. त्यामुळे मजुरांच्या पाल्यांच्या शिक्षणाची वाताहतच आहे. दुष्काळी झळांमुळे यंदा रोजगारासाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांची संख्या वाढली आहे. स्थलांतर करणाऱ्या मजुरांचा आकडा सहा लाखापेक्षा अधिक आहे. स्थलांतरामुळे मजुरांच्या मुला- मुलींच्या शिक्षणात खंड पडतो. त्यानंतर आई- वडिलांच्या हातातील कोयता परंपरेने मुला- मुलींच्या हाती येतो. दारिद्र्याच्या दुष्टचक्रात सापडलेल्या मजुरांच्या पाल्यांचे स्थलांतर रोखून त्यांच्यासाठी हंगामी वसतिगृहे सुरु केली जातात. तेथे मुलांचे पालन-पोषण केले जाते. त्याची जबाबदारी शिक्षण समिती व मुख्याध्यापकाकडे सोपविलेली आहे. जेवण, शैक्षणिक साहित्य व निवासी व्यवस्था आदी सुविधा पूर्णपणे मोफत दिल्या जातात. १ आॅक्टोबरपासून वसतिगृहे सुरु करण्याचे आदेश शासनाने दिले होते;परंतु स्थलांतर करणाऱ्या संभाव्य कुटुंबातील मुला-मुलींची संख्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयांकडून जि.प. च्या शिक्षण विभागाला प्राप्त न झाल्याने महिनाभर उशिराने वसतिगृहांना मंजुरी मिळाली. २८ आॅक्टोबर रोजी तत्कालिन सीईओ राजीव जवळेकर यांनी सर्वच्या सर्व ४८० प्रस्ताव मंजूर केले होते. त्यानंतर १ नोव्हेंबरपासून वसतिगृहे सुरु करावीत असे आदेश शिक्षणाधिकारी (प्रा.) व्ही. डी. कुलकर्णी यांनी दिले होते. मात्र, बहुतांश वसतिगृहे अद्याप सुरुच झालेले नाहीत. वसतिगृहे सुरु केल्यावर त्याचा अहवाल तत्काळ शिक्षण विभागाला पाठविण्याचे आदेश होते;परंतु तीन आठवडे उलटूनही अहवाल आलेलेच नाहीत. त्यामुळे साशंकता व्यक्त होत असून अनुदानावर डोळा ठेऊन वसतिगृहे सुरु असल्याचे दाखविणारे सक्रिय होण्याची शक्यता आहे.