शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

वसतिगृहे कागदावरच!

By admin | Updated: November 23, 2014 00:26 IST

संजय तिपाले ,बीड ऊसतोड मजुरांची मुले शिक्षणप्रवाहातून बाहेर पडू नयेत, या उदात्त हेतूने सर्व शिक्षा अभियानांतर्गत हंगामी वसतिगृहे सुरु केली जातात.

संजय तिपाले ,बीड ऊसतोड मजुरांची मुले शिक्षणप्रवाहातून बाहेर पडू नयेत, या उदात्त हेतूने सर्व शिक्षा अभियानांतर्गत हंगामी वसतिगृहे सुरु केली जातात. जिल्ह्यात चालू वर्षी ४८० वसतिगृहांना ंमंजुरी मिळाली आहे; परंतु अनुदान लाटण्यासाठी केवळ कागदी घोडे नाचविण्यातच सारे मश्गूल आहेत. एक महिना उशिरा सुरु झालेल्या वसतिगृहांचा एकही अहवाल अद्याप शिक्षण विभागाकडे आलेला नाही. त्यामुळे मजुरांच्या पाल्यांच्या शिक्षणाची वाताहतच आहे. दुष्काळी झळांमुळे यंदा रोजगारासाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांची संख्या वाढली आहे. स्थलांतर करणाऱ्या मजुरांचा आकडा सहा लाखापेक्षा अधिक आहे. स्थलांतरामुळे मजुरांच्या मुला- मुलींच्या शिक्षणात खंड पडतो. त्यानंतर आई- वडिलांच्या हातातील कोयता परंपरेने मुला- मुलींच्या हाती येतो. दारिद्र्याच्या दुष्टचक्रात सापडलेल्या मजुरांच्या पाल्यांचे स्थलांतर रोखून त्यांच्यासाठी हंगामी वसतिगृहे सुरु केली जातात. तेथे मुलांचे पालन-पोषण केले जाते. त्याची जबाबदारी शिक्षण समिती व मुख्याध्यापकाकडे सोपविलेली आहे. जेवण, शैक्षणिक साहित्य व निवासी व्यवस्था आदी सुविधा पूर्णपणे मोफत दिल्या जातात. १ आॅक्टोबरपासून वसतिगृहे सुरु करण्याचे आदेश शासनाने दिले होते;परंतु स्थलांतर करणाऱ्या संभाव्य कुटुंबातील मुला-मुलींची संख्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयांकडून जि.प. च्या शिक्षण विभागाला प्राप्त न झाल्याने महिनाभर उशिराने वसतिगृहांना मंजुरी मिळाली. २८ आॅक्टोबर रोजी तत्कालिन सीईओ राजीव जवळेकर यांनी सर्वच्या सर्व ४८० प्रस्ताव मंजूर केले होते. त्यानंतर १ नोव्हेंबरपासून वसतिगृहे सुरु करावीत असे आदेश शिक्षणाधिकारी (प्रा.) व्ही. डी. कुलकर्णी यांनी दिले होते. मात्र, बहुतांश वसतिगृहे अद्याप सुरुच झालेले नाहीत. वसतिगृहे सुरु केल्यावर त्याचा अहवाल तत्काळ शिक्षण विभागाला पाठविण्याचे आदेश होते;परंतु तीन आठवडे उलटूनही अहवाल आलेलेच नाहीत. त्यामुळे साशंकता व्यक्त होत असून अनुदानावर डोळा ठेऊन वसतिगृहे सुरु असल्याचे दाखविणारे सक्रिय होण्याची शक्यता आहे.