शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

जिल्ह्यातील फळबाग उत्पादकांना विम्याची प्रतीक्षा

By admin | Updated: February 5, 2015 00:53 IST

गजेंद्र देशमुख , जालना जिल्ह्यात २०१२-१३ वर्षात दुष्काळी परिस्थितीमुळे शेकडो हेक्टरवरील मोसंबीसह इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या फळबागांना हवामानावर

गजेंद्र देशमुख , जालनाजिल्ह्यात २०१२-१३ वर्षात दुष्काळी परिस्थितीमुळे शेकडो हेक्टरवरील मोसंबीसह इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या फळबागांना हवामानावर आधारित विम्याचे कवच असले तरी अनेक शेतकऱ्यांना अद्यापही विम्याची रक्कम मिळाली नाही. विशेष म्हणजे केंद्रिय पथकाने पाहणी करुनही शेतकऱ्यांच्या पदरी अद्याप एक छदामही पडलेला नाहीजिल्ह्यातील १५९५८ शेतकऱ्यांनी १२ हजार ७२३ हेक्टरवरील फळ बागांकरीता ४८ लक्ष रुपयांचा विमा उतरविला होता. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे फळ बागांचे नुकसान झाले. दोन वर्षे उलटूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही. या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. गतवर्षी केंद्रिय समितीनेही जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी केली होती; तसा अभिप्रायही संबंधित विभागांना पाठविण्यात आला होता. मात्र असे असूनही शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. ज्या शेतकऱ्यांनी फळबागांचा विमा काढलेला आहे, अशांना तात्काळ तो वाटप करावा, असा उत्पादकांचा रेटा आहे.हा विमा हवामान अधारित असल्याने विविध मंडळांमध्ये हवामान मोजणी यंत्र लावले होते. मात्र काही यंत्रे योग्य कार्यान्वित झाली नाहीत. तसेच त्या दरम्यान काही दिवस ढगाळ असल्याने उष्णतामान ३९ अंशावर गेले नाही. हाच मुद्दा पकडून संबंधितांनी विमाचा प्रस्ताव लालफितीत ठेवला. यानंतर शेतकऱ्यांच्या मागणीनंतर तसेच दुष्काळाची दहाकता लक्षात घेऊन केंद्रिय पथकाने पाहणी केली. त्यानुसार मोसंबी बागांचे नुकसान झाल्याचे आढळून आले. मात्र प्रत्यक्षात दोन वर्षे उलटूनही शेतकऱ्यांना काहीच मिळालेले नाही.महाराष्ट्र राज्य मोसंबी उत्पादक संघाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव डोंगरे म्हणाले, दुष्काळामुळे मोसंबी बागांचे सरपण झाले. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कृषी केंद्रिय पथकानेही प्रकराची पाहणी केलेली आहे. शेतकऱ्यांना एक ते सव्वा कोटींचा विमाही भरलेला आहे. विमा देण्याचेही आदेश तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार यांनी दिले होते. असे असले तरी अद्यापही शेतकऱ्यांना काहीच मिळालेले नाही. आमचा पाठपुरावा सुरु आहे.जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे म्हणाले, हवानान अधारित पीक विमा आहे. यासाठी वेगवेगळ्या मंडळात हवामान यंत्रही लावण्यात आले होते. त्यानुसार केंद्रिय पथकाने सदर फळबागांची पाहणी केली. नुकसानीचा अंदाज घेतला. कृषी विभागनेही माहिती सादर केली. मात्र अद्याप पर्यंत विम्या संबंधी आमच्याकडेही काहीही आदेश आले नाही.