शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

घरपोच पशुवैद्यकीय सेवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:05 IST

--- औरंगाबाद : पशुसंवर्धन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा, विमा कवच, लसीकरणात प्राधान्य दिल्या जात नसल्याने, बुधवारपासून पशुसंवर्धन ...

---

औरंगाबाद : पशुसंवर्धन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा, विमा कवच, लसीकरणात प्राधान्य दिल्या जात नसल्याने, बुधवारपासून पशुसंवर्धन विभागाच्या घरपोच वैद्यकीय सेवा बंद करून दवाखान्यात केवळ अत्यावश्यक उपचार आणि ५० टक्के क्षमतेने सुविधा देण्याचा निर्णय घेतला. जिथे एकच कर्मचारी आहे. तिथे एक दिवसाआड सेवा दिल्या जाईल, असा पवित्रा महाराष्ट्र राज्यपात्रिक पशुवैद्यक संघटनेने घेतला आहे.

पशुवैद्यकीय सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून गणल्या जाते. या विभागातील आतापर्यंत ७०० अधिकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली, तर ३० जणांना प्राण गमवावा लागला. मात्र, वारंवार मागणी करूनही अत्यावश्यक सेवेत असताना विमा कवच दिल्या जात नाही. म्हणजेच काम करताना अत्यावश्यक सेवा आणि लाभ देताना त्या सेवेत नाही, असा शासनाचा दुजाभाव सुरू आहे. आधीच रिक्तपदांमुळे अधिकारी कर्मचाऱ्यावर ताण आहे. राज्याच्या ढोबळ उत्पन्नात २.१७ टक्के म्हणजे ६४,२३१ कोटींचे पशुसंवर्धन विभागाचे योगदान आहे, तर विभागास केवळ १,६०९ म्हणजे ०.३३ टक्क्यांची तुटपुंजी तरतूद आहे. गेल्या वर्षभरापासून निवेदने देऊनही विनंती करूनही मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने, शेतकऱ्यांची माफी मागून घरपोच पशुवैद्यकीय सेवा बंद करत असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. यावर अध्यक्ष डाॅ.रामदास गाडे, सरचिटणीस डॉ.संतोष वाघचौरे, कार्यकारी अध्यक्ष डॉ.शशिकांत मांडेकर यांच्या सह्या आहे, असे डॉ.रत्नाकर पेडगांवकर यांनी कळविले आहे.