शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

शहरात धूलिकणांचे प्रमाण सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:11 IST

शहरात हवेतील धूलिकणांचे प्रमाण खूप वाढले असून, औरंगाबादकरांना शुद्ध हवा मिळत नसल्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला दिला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात हवेतील धूलिकणांचे प्रमाण खूप वाढले असून, औरंगाबादकरांना शुद्ध हवा मिळत नसल्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला दिला आहे. यासाठी महापालिकेने युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही मंडळाने केली आहे. लवकरच शहरात विविध उपाययोजना करण्याचे आश्वासन मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिले आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील १७ शहरांमध्ये हवेची तपासणी केली. औरंगाबाद शहरात स.भु. कॉलनी परिसर, जिल्हा सत्र न्यायलय, गजानन महाराज मंदिर परिसरात तपासणी करण्यात आली. या तपासणीत शहरातील हवेत बरेच प्रदूषण असल्याचे निदर्शनास आले. वाहनांमुळे होणारे अत्यंत धोकादायक असे प्रदूषणही तपासणीत निदर्शनास आले. हवेत धूलिकणांचे प्रमाणही गरजेपेक्षा अधिक असल्याचे लक्षात आले. औरंगाबादकरांना शुद्ध आणि ताजी हवा मिळावी यासाठी महापालिकेने ठोस कार्यक्रम हाती घ्यावा, अशी मागणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांनी आज एका बैठकीत मनपाकडे केली. या बैठकीत कोणत्या उपाययोजना कराव्यात यावर चर्चा करण्यात आली. शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाही. त्यामुळे खाजगी वाहनांचे प्रमाण वाढले आहे. मनपाने शहर वाहतूक बस सक्षम केल्यास यावर नियंत्रण मिळविता येईल, अशी अपेक्षा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांनी व्यक्त केली. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात यावीत. शहरात ग्रीन झोनचे प्रमाण वाढविण्यात यावे. जिथे जिथे ग्रीन झोन आहे, त्यांना विकसित करावे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या सूचनेनुसार शहरात विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिली. शहरात खड्डे खूप आहेत. त्यामुळे धूलिकणांचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. यावरही महापालिका गांभीर्याने विचार करीत असून, त्यावरही उपाययोजना करण्यात येतील.