शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
Operation Sindoor Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार
3
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
4
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
5
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
6
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
7
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
8
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
9
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
10
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
11
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
12
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
13
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
14
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
15
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
16
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
17
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
18
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
19
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
20
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा

जड वाहनांनी केला पुन्हा शहरात शिरकाव!

By admin | Updated: September 15, 2014 00:57 IST

औरंगाबाद : रस्ते अपघातात एखाद्या सर्वसामान्य निष्पाप नागरिकाला जीव गमवावा लागल्यानंतर वाहतूक पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका साधी दखलही घेत नाहीत.

 

औरंगाबाद : रस्ते अपघातात एखाद्या सर्वसामान्य निष्पाप नागरिकाला जीव गमवावा लागल्यानंतर वाहतूक पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका साधी दखलही घेत नाहीत. यापुढे तरी अशा पद्धतीने अपघात घडू नयेत म्हणून कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत. उलट पोलिसांकडून वर्दळीच्या वेळेत जड वाहतुकीला शहरातून ये-जा करण्याची मुभा देण्यात येते. अवजड वाहनांमुळे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस अतिशय गंभीर बनत चालली आहे. जड वाहनांना विशिष्ट वेळ व मार्गांचे बंधन घालून दिलेले आहे. सकाळी व सायंकाळी या वाहनांना शहरात येण्यास मज्जाव करण्यात आला असला तरी हर्सूल, शिवाजीनगर, शहानूरमियाँ दर्गा या मार्गांबरोबरच जालना रोडनेही धोकादायक वाहने शहरात राजरोसपणे प्रवेश करीत आहेत. अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांना आळा बसावा व वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून अशा वाहनांना सकाळ व सायंकाळच्या वेळेच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले होते. शिवाय त्यांचे मार्ग कोणते असावेत यासंबंधीचे नियमही घालून देण्यात आले होते. या नियमांनुसार सकाळी ६ ते १ वाजेदरम्यान व सायंकाळी ४ ते ९ वाजेदरम्यान अवजड वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. या नियमांचे काही दिवस पालन करण्यात आले. महानगरपालिकेच्या हद्दीबाहेरच त्यांना अडविण्यात आले होते. मात्र, थोड्याच दिवसांत कारवाई थंडावली व ही वाहने पुन्हा अवेळी शहरात येऊ लागली. शहरातील वाढती वाहनांची संख्या, बेशिस्त वाहतूकव्यवस्था हा गहण प्रश्न बनला आहे. शहरातील अरुंद रस्ते, बंद सिग्नल यामुळे नेहमीच ट्रॅफिक जाम असते. अशा परिस्थितीत अवजड वाहने अवैधपणे शहरात प्रवेश करून वाहतूक कोंडी तर करतातच शिवाय अपघातांनाही निमंत्रण देतात. ही वाहने दुचाकींना धडकल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. शहरात ये-जा करण्यासाठी रेल्वेस्टेशन ते हर्सूल, बाबा पेट्रोलपंप ते चिकलठाणा, सिडको ते जळगाव टी-पॉइंट, असे काही प्रमुख रस्ते असून या रस्त्यावरून बस, कार, दुचाकी वाहनांची सतत वर्दळ असते; परंतु शहरातील सध्याचे चित्र बघितल्यास या रस्त्यांवरून सकाळ, संध्याकाळ अवजड वाहने भरधाव वेगाने धावताना दिसतात. शिवाय रस्त्याच्या कडेला ट्रक, कंटेनरसारखी वाहने सर्रासपणे उभी केली जात असल्याने वाहतुकीचा खेळखंडोबा होत आहे. वाहतूक नियंत्रक शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या निर्दशनास हे चित्र येत असतानासुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी, जड वाहनचालक आणि मालक बिनधास्त झाले आहेत.