शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

आरोग्य सेवा ‘कोमात’ !

By admin | Updated: September 23, 2014 01:35 IST

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेअंतर्गत सुमारे ४२ प्राथमिक आरोग्य केंंद्र चालविली जातात. ग्रामीण जनतेला तातडीने आरोग्य सेवा मिळावी, हा यामागचा मुख्य उद्देश.

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेअंतर्गत सुमारे ४२ प्राथमिक आरोग्य केंंद्र चालविली जातात. ग्रामीण जनतेला तातडीने आरोग्य सेवा मिळावी, हा यामागचा मुख्य उद्देश. परंतु, आजघडीला या आरोग्य केंद्रांवरच उपचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. मंजूर पदापैकी डॉक्टरांच्या ५० टक्के जागा रिक्त आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील चार आरोग्य केंद्रांना डॉक्टरच नाहीत. त्यामुळे आरोग्य सेवाच कोमात गेली की काय? असे चित्र निर्माण झाले आहे.ग्रामीण भागातील लोकांना वेळेवर आणि अत्यल्प शुल्कामध्ये आरोग्य सेवा मिळावी, यासाठी आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांचा जन्म झाला. सुरूवातील आरोग्य केंद्रांची संख्या ही बोटावर मोजण्याइतपतच होती. परंतु, आजा हा आकडा ४२ वर जावून ठेपला आहे. मागील दोन कोट्यवधी रूपये खर्च करून रूग्णालयासाठी टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या आहेत. मात्र, डॉक्टरांच्या रिक्त रूग्णांना नाविलाझ म्हणून खाजगी दवाखान्याची पायरी चढावी लागत आहे. त्यामुळे शासनाने ज्या उद्देशानी आरोग्य केंद्र सुरू केली, तो उद्देश साध्य होताना दिसत नसल्याची संतप्त प्रतिक्रीया ग्रामस्थांतून उमटत आहे.जिल्हाभरात ४२ प्राथमिक आरोग्य केंद्र चालविली जातात. प्रत्येक केंद्रावर दोन या प्रमाणे वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८४ पदे मंजूर आहेत. परंतु, प्रत्यक्षात ३८ डॉक्टरच कार्यरत आहेत. त्यामुळे आरोग्य सेवेचा पार बट्ट्याबोळ झाला आहे. २८ पदे रिक्त आहेत. तसेच १० पदवीधर शिक्षणासाठी गेले आहेत. ६ डॉक्टर विनापरवाना गैरहजर आहेत. तर उर्वरित दोन डॉक्टर रजेवर आहेत. त्यामुळेच आज आरोग्य केंद्र ही केवळ नावापुरतीच उरली आहेत. एखादा रूग्णाला दवाखान्यात दाखल केले तर तेथे डॉक्टर असतील याची शास्वती नसते. अन्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही काही वेगळे चित्र नाही. त्यांच्याही जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या सर्व गोंधळी वातावरणामुळे सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीकोनातून महत्वाची असलेली आरोग्य सेवा कोमात गेल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)