शहरं
Join us  
Trending Stories
1
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
2
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
3
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
4
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
5
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
6
पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत
7
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
8
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
9
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
10
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
11
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
12
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
13
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
14
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
15
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
16
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
17
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!
18
बाजारात पुन्हा 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी 'धडाम', बाजाराच्या घसरणीमागे 'ही' आहेत ४ मोठी कारणे
19
Astro Tips: रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याबरोबरच ठेवा 'या' तीन गोष्टी; लक्ष्मी होईल कृपावंत!
20
Vastu Shastra: वास्तुसाठी फर्निचर निवडताना 'या' चुका टाळा, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष!

आरोग्य विभागास उशिरा आली जाग

By admin | Updated: September 7, 2014 00:28 IST

हिंगोली : मराठवाड्यात डेंग्यूने सर्वत्र थैमान घातल्यानंतरही हिंगोलीतील आरोग्य विभागाला जाग आली नाही.

हिंगोली : मराठवाड्यात डेंग्यूने सर्वत्र थैमान घातल्यानंतरही हिंगोलीतील आरोग्य विभागाला जाग आली नाही. पिंपळदरीत एकाचा बळी गेल्यानंतर आता येथे पथक तळ ठोकून आहे. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर मात्र कायम वास्तव्यावर नाहीत.औंढा तालुक्यातील पिंपळदरी आरोग्य केंद्रास रात्रीला कोणा वाली नसते. दिवसा उशिरा अधिकारी केंद्रात दाखल होतात. शहरातून ये-जा करीत असल्यामुळे आधीच ग्रामस्थांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. यापूर्वीच ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून हा प्रकार चव्हाट्यावर आणला होता. तरीही आरोग्य विभागाची झोप गेली नव्हती. जिल्ह्यात सर्वत्र हा प्रकार होत असताना आरोग्य विभागाला त्याचे देणे, घेणे नाही. पिंपळदरीत कित्येक दिवसांपासून आरोग्य सेवकाने गावात फेरफटकाही मारलेला नाही. परिणामी लवकर हा आजार समोर आला नाही. फैलाव वाढत गेल्यानंतर तीव्र रूप धारण केले. दरम्यान, याच गावातील विलास ज्ञानेश्वर डुकरे आणि प्रतिभा संजय घोंघडे हिस ताप आला. दोघांनाही परभणी येथील खाजगी रूग्णालयात उपचासाठी दाखल करण्यात आले. त्यांनाही डेंग्यूची लक्षणे आढळल्याचे समोर आले. मात्र आरोग्य विभाग हा खासगी रिपोर्ट खरा मानण्यास तयार नाही. दहा दिवसानंतर ५ सप्टेंबर रोजी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते आणि औंढा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड यांनी पिंपळदरीला भेट दिली. त्यानंतर आरोग्य विभाग गतिमान झाला. आजाराचे कारणएडिस इजिप्टाय नावाचा डास चावल्यास हा आजार होतो. विषाणूजन्य असलेला हा आजार कोणालाही होऊ शकतो. तो लहान मुलांना अधिक होते. प्रामुख्याने हा डास दिवसा चावतो. या आजाराचा काळ ५ ते ७ दिवस असतो. थांबलेल्या स्वच्छ पाण्यावर हे डास वाढतात. घरातील व परिसरातील भांडी, टाकी, टाकाऊ वस्तूत साठवलेल्या स्वच्छ पाण्यात डास होतात. (प्रतिनिधी)आजाराची लक्षणेअचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, डोळ्यामागे दुखणे, तीव्र आजारात भूक मंदावते, मळमळणे, पोटदुखी, जोराने डोके दुखने, थंडी वाजणे, उलटी होणे, गंभीर आजार जडल्यास तोंडातून रक्त येणे, त्वचेवर पुरळ येतात. घरात पाणी जमा होऊ देऊ नका, कूलर, पाण्याची टाकी, पक्ष्यांना पिण्याचे पाणी, फ्रीज, भांडे, टायर, फेकून दिलेले शहाळ्यातील पाणी नियमित अंतराने उपसा. कोरडा दिवस पाळा, डास प्रतिबंधक क्रीम किवा फवारणी करा. या रुग्णांनी पूर्ण विश्रांती घ्यावी, ताप ३९ डिग्रीच्या खाली राहण्यासाठी तापप्रतिबंधक औषधी घ्यावे, अंग ओल्या कपड्याने पुसून घ्यावे, शरीरातील पाणी कमी होण्यासाठी फळाचा रस, ओआरएसचे द्रावण घ्यावे.