शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

भाजी मंडईतील अतिक्रमणांवर हातोडा

By admin | Updated: February 15, 2015 00:47 IST

जालना : जुना जालन्यातील भाजीमंडईतील (बाजार चौकी परिसर) ६२ अतिक्रमणे शनिवारी हटविण्यात आली. नगरपालिका व पोलिसांच्या संयुक्त पथकाने

जालना : जुना जालन्यातील भाजीमंडईतील (बाजार चौकी परिसर) ६२ अतिक्रमणे शनिवारी हटविण्यात आली. नगरपालिका व पोलिसांच्या संयुक्त पथकाने सकाळपासूनच या भागात दाखल होऊन नालीच्या बाहेर आलेल्या ओट्यांवर हातोडा मारला. दुपारी अतिक्रमण हटाव पथकातील कर्मचाऱ्यांसमवेत काही विक्रेत्यांचा किरकोळ वाद झाला. परंतु उपनगराध्यक्ष शाह आलम खान यांच्या मध्यस्थीनंतर तो निवळला.सकाळी ११ वाजेपासून नगरपालिकेचे २० व पोलिस पथकातील २५ जणांच्या संयुक्त पथकाने सर्वप्रथम लतीफशाह बाजार मार्गावर दुकानांसमोर दुतर्फा बसलेल्या किरकोळ विक्रेत्यांना तेथून उठवण्याची सूचना करण्यात आली. विक्रेत्यांनीही लगेच आपला माल घेऊन तेथून काढता पाय घेतला. दोन्ही बाजूने नालीबाहेर आलेले ओटे कुदळ, टिकास व सब्बलच्या मदतीने पाडण्यास सुरूवात झाली. काही विक्रेत्यांनी सुरुवातीला विरोध करण्याचा प्रयत्न केला. या भागात रहिवाशी म्हणून कुणाची घरे नाहीत, या रस्त्यावर पाणी साचत नाही, असे विक्रेत्यांचे म्हणणे होते. परंतु स्वच्छता निरीक्षक लोंढे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नाल्या मोकळ्या कराव्याच लागतील, अशी भूमिका घेतली. दुपारी याच मुद्यावरून काही विक्रेत्यांशी नगरपालिका कर्मचाऱ्यांचा किरकोळ वाद झाला. परंतु त्यावेळी उपनगराध्यक्ष शाह आलमखान यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला. बाजार चौकी ते जाफरखान चौकापर्यंत ४० तर बाजार चौकी ते मुजाहिद खान चौकापर्यंत २२ दुकानांचे ओटे या पथकाने पाडले. सायंकाळपर्यंत ही मोहीम सुरू होती. याबाबत स्वच्छता निरीक्षक लोंढे म्हणाले, बाजार चौकी परिसरात अतिक्रमणधारकांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या. परंतु त्यांनी स्वत:हून अतिक्रमणे हटविली नाहीत. विशेष म्हणजे यापूर्वी गतवर्षी येथील अतिक्रमणे हटविण्यात आली होती, परंतु काही विक्रेत्यांनी पुन्हा अतिक्रमणे केली. पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांवर दंडाची कारवाई करण्यात येणार असल्याचे लोंढे यांनी सांगितले. २०१४ मध्ये भाजीमंडई परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती. परंतु येथे पुन्हा अतिक्रमणे झाली. या अतिक्रमणांमुळे बाजारात खरेदीसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हा मार्ग बरवार गल्ली, टाऊन हॉलकडे जातो. त्यामुळे या रस्त्यावर सतत वर्दळ असते.