शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

भाजी मंडईतील अतिक्रमणांवर हातोडा

By admin | Updated: February 15, 2015 00:47 IST

जालना : जुना जालन्यातील भाजीमंडईतील (बाजार चौकी परिसर) ६२ अतिक्रमणे शनिवारी हटविण्यात आली. नगरपालिका व पोलिसांच्या संयुक्त पथकाने

जालना : जुना जालन्यातील भाजीमंडईतील (बाजार चौकी परिसर) ६२ अतिक्रमणे शनिवारी हटविण्यात आली. नगरपालिका व पोलिसांच्या संयुक्त पथकाने सकाळपासूनच या भागात दाखल होऊन नालीच्या बाहेर आलेल्या ओट्यांवर हातोडा मारला. दुपारी अतिक्रमण हटाव पथकातील कर्मचाऱ्यांसमवेत काही विक्रेत्यांचा किरकोळ वाद झाला. परंतु उपनगराध्यक्ष शाह आलम खान यांच्या मध्यस्थीनंतर तो निवळला.सकाळी ११ वाजेपासून नगरपालिकेचे २० व पोलिस पथकातील २५ जणांच्या संयुक्त पथकाने सर्वप्रथम लतीफशाह बाजार मार्गावर दुकानांसमोर दुतर्फा बसलेल्या किरकोळ विक्रेत्यांना तेथून उठवण्याची सूचना करण्यात आली. विक्रेत्यांनीही लगेच आपला माल घेऊन तेथून काढता पाय घेतला. दोन्ही बाजूने नालीबाहेर आलेले ओटे कुदळ, टिकास व सब्बलच्या मदतीने पाडण्यास सुरूवात झाली. काही विक्रेत्यांनी सुरुवातीला विरोध करण्याचा प्रयत्न केला. या भागात रहिवाशी म्हणून कुणाची घरे नाहीत, या रस्त्यावर पाणी साचत नाही, असे विक्रेत्यांचे म्हणणे होते. परंतु स्वच्छता निरीक्षक लोंढे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नाल्या मोकळ्या कराव्याच लागतील, अशी भूमिका घेतली. दुपारी याच मुद्यावरून काही विक्रेत्यांशी नगरपालिका कर्मचाऱ्यांचा किरकोळ वाद झाला. परंतु त्यावेळी उपनगराध्यक्ष शाह आलमखान यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला. बाजार चौकी ते जाफरखान चौकापर्यंत ४० तर बाजार चौकी ते मुजाहिद खान चौकापर्यंत २२ दुकानांचे ओटे या पथकाने पाडले. सायंकाळपर्यंत ही मोहीम सुरू होती. याबाबत स्वच्छता निरीक्षक लोंढे म्हणाले, बाजार चौकी परिसरात अतिक्रमणधारकांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या. परंतु त्यांनी स्वत:हून अतिक्रमणे हटविली नाहीत. विशेष म्हणजे यापूर्वी गतवर्षी येथील अतिक्रमणे हटविण्यात आली होती, परंतु काही विक्रेत्यांनी पुन्हा अतिक्रमणे केली. पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांवर दंडाची कारवाई करण्यात येणार असल्याचे लोंढे यांनी सांगितले. २०१४ मध्ये भाजीमंडई परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती. परंतु येथे पुन्हा अतिक्रमणे झाली. या अतिक्रमणांमुळे बाजारात खरेदीसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हा मार्ग बरवार गल्ली, टाऊन हॉलकडे जातो. त्यामुळे या रस्त्यावर सतत वर्दळ असते.