शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

अन् निम्मे रुग्ण परतले !

By admin | Updated: May 29, 2014 01:12 IST

सिल्लोड : येथील उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी घेण्यात आलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात फक्त दोनच नेत्रतज्ज्ञ आल्याने निम्म्या रुग्णांवरच शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

सिल्लोड : येथील उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी घेण्यात आलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात फक्त दोनच नेत्रतज्ज्ञ आल्याने निम्म्या रुग्णांवरच शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे अर्ध्या रुग्णांना शस्त्रक्रि या न करताच आल्या पावली परत जावे लागले. मंगळवारी तालुक्यातील ६० रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रि येसाठी रुग्णालयात दाखल झाले होते; परंतु बुधवारी शस्त्रक्रि येच्या दिवशी दोनच नेत्रतज्ज्ञ सर्जन आल्याने हा प्रकार घडला. गेल्या महिन्यातही नेत्रतज्ज्ञ सर्जन न आल्याने रुग्णांना शस्त्रक्रि या न करताच परत जावे लागले होते. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नियमितपणे मोतीबिंदू शस्त्रक्रि या शिबीर घेण्यात येते. या शिबिरामध्ये प्रत्येक महिन्याला ९० ते १०० रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रि या केली जाते. मोतीबिंदूची परिपूर्ण वाढ झाल्यानंतरच रुग्णाला शस्त्रक्रि येसाठी दाखल करून घेतले जाते. मोतीबिंदूच्या अशा रुग्णांवर वेळेवर शस्त्रक्रिया होणे गरजेचे आहे. वेळेवर शस्त्रक्रि या न झाल्यास रुग्णाला काचबिंदू होतो. ज्यामुळे नेत्र कायमस्वरूपी निकामी होऊन अंधत्व येते. मंगळवारी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रि येसाठी ६० रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले होते. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी औरंगाबाद येथून प्रत्येक महिन्यात घेण्यात येणार्‍या शिबिराला ४ नेत्रतज्ज्ञ सर्जन येतात. परंतु बुधवारी जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. सुनीता गोलाईत, डॉ.रूपा अंबेकर हे दोनच सर्जन आल्याने ६० रुग्णांपैकी ३४ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. २६ रुग्णांना शस्त्रक्रिया न करताच परतावे लागले. यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर) महाराष्टÑात अव्वल तरीही... सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात चांगल्या सोयीसुविधा असल्याने जिल्ह्यासह जळगाव, बुलढाणा, जालना या बाहेरील जिल्ह्यांतील रुग्ण मोतीबिंदूची शस्त्रक्रि या करण्यासाठी येतात. दर महिन्यात ९० ते १०० तर वर्षभरात १०००ते ११०० रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाते. राज्यात ५० बेड असलेल्या कुठल्याही रुग्णालयामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या जात नाही. मोतीबिंदू शस्त्रक्रियेत सिल्लोड उपजिल्हा रुग्णालय महाराष्ट्रात अव्वल आहे; पण गेल्या दोन महिन्यांपासून नेत्रतज्ज्ञ सर्जनअभावी रुग्णांना शस्त्रक्रिया न करताच परत जावे लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे. एक सर्जन रजेवर, तर दुसरा आजारी शिबिरासाठी ४ सर्जन येत असतात. परंतु दोन महिन्यांपासून दोन सर्जन येत आहे. दोनपैकी एक सर्जन रजेवर असून एकाची प्रकृती बरी नसल्यामुळे ते आले नाही. यामुळे रुग्णांना परत जावे लागले. यापुढे रुग्णांना शस्त्रक्रिया न करता आल्या पावली परत जाण्याचा प्रकार घडणार नाही. यासाठी मी स्वत: याकडे गांभीर्याने लक्ष देईल. - डॉ.भूषणकुमार रामटेके, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय