शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

अनुदान वाढीमुळे बांधकामास येणार गती

By admin | Updated: November 19, 2014 00:58 IST

संजय कुलकर्णी , जालना केंद्र सरकारने ग्रामीण भागात शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम १२ हजारांपर्यंत वाढविल्याने शौचालयांच्या बांधकामांना आता गती येणार आहे.

संजय कुलकर्णी , जालनाकेंद्र सरकारने ग्रामीण भागात शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम १२ हजारांपर्यंत वाढविल्याने शौचालयांच्या बांधकामांना आता गती येणार आहे. जिल्ह्यात जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने बुधवारी सहा हजार शौचालयांच्या बांधकामाचा प्रारंभ होत आहे.स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छतेची चळवळ ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून २०१४-१५ या वर्षासाठी ३६ हजार ३९९ शौचालयांच्या बांधकामाचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले आहे. जागतिक शौचालय दिन १९ नोव्हेंबर रोजी आहे. यानिमित्ताने १४ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत गावोगाव ग्रामसभा, शाळा, अंगणवाड्यांतर्फे प्रभातफेऱ्यांद्वारे वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. पूर्वी शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्यांना ४ हजार ६०० रुपयांचे अनुदान देण्यात येत होते. परंतु या पैशात शौचालय बांधकामाचे काम पूर्ण होण्यात अडचणी निर्माण होत होत्या. कारण ई-मस्टर वेळेवर तयार होत नसल्याने मग्रारोहयोअंतर्गत या कामांना खीळ बसली होती. परंतु आता अनुदान वाढल्याने शौचालय बांधकामांना गती येणार असा विश्वास जनतेतूनच व्यक्त करण्यात येत आहे.१२ हजार रुपयांच्या अनुदानामध्ये ९ हजार केंद्र सरकारचे तर ३ हजार रुपये राज्य शासनाचे असणार आहेत. अंबड, घनसावंगी, परतूर व मंठा या तालुक्यांमध्ये एक हजार शौचालयांच्या बांधकामास प्रारंभ होत आहे. उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील ग्रामसेवकांची बैठक सीईओ प्रेरणा देशभ्रतार यांच्या आदेशान्वये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कोल्हे व स्वच्छ भारत अभियानचे समन्वयक सूर्यकांत ताटे यांनी नुकतीच घेतली. कलापथक आणि फिल्म शो द्वारेही जनजागरण करण्यात आल्याचे अभियानाचे भगवान तायड आणि संजय डोंगरदिवे यांनी सांगितले.