शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

सहा लाख मे.टन ऊस उभा

By admin | Updated: June 28, 2014 01:14 IST

पाथरी : येथील रेणुका शुगर साखर कारखाना कार्यक्षेत्रात यावर्षी सहा लाख मे. टनापेक्षा अधिक उसाची उपलब्धता आहे. चालू वर्षीचा गळीत हंगाम सुरू होतो की नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

पाथरी : येथील रेणुका शुगर साखर कारखाना कार्यक्षेत्रात यावर्षी सहा लाख मे. टनापेक्षा अधिक उसाची उपलब्धता आहे. चालू वर्षीचा गळीत हंगाम सुरू होतो की नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आतापासूनच चिंता वाढली आहे. पाथरी तालुका हा ऊस क्षेत्राचे भांडार म्हणून ओळखला जातो. मागील पंचवीस वर्षापासून या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करतात. या भागातील सहकारी तत्वावरील कारखाना सुरुवातीच्या कालावधीत स. गो. नखाते यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थितरित्या चालला. परंतु नंतरच्या कालावधीत कारखान्याला राजकारणाची घरघर लागली आणि आज या कारखान्याची अत्यंत वाईट अवस्था झाली. २००८ साली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा कारखाना परभणीच्या रत्नप्रभा शुगरला चाालविण्यासाठी ताब्यात देण्यात आला. कालांतराने रत्नप्रभा ही संस्था कर्नाटकातील रेणुका शुगरकडे वर्ग झाल्याने रेणुका शुगरच्या माध्यमातूून हा कारखाना चालविण्यात येतो. चार गळीत हंगाम रेणुका शुगरने यशस्वीरित्या चालविले खरे. परंतु गतवर्षीचा गळीत हंगाम सुरू होऊ शकला नाही. कामगार आणि व्यवस्थापनातील वाद विकोपाला गेल्याने कारखान्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले. गतवर्षी या भागात चांगला पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी ०३१०२ या उसाच्या नवीन वाणाची ५ हजार रुपये प्रतिटन खर्च करून ऊस लागवड केला. या भागात चालू वर्षीच्या गळीत हंगामामध्ये ६ लाख मे.टनपेक्षा अधिक ऊस उपलब्ध आहे. यामुळे चालू वर्षीचा गळीत हंगाम सुरू करणे आवश्यक आहे. गळीत हंगाम सुरू झाला नाही तर या भागातील शेतकऱ्यांना ऊस गाळपासाठी अनेक यातना सहन कराव्या लागणार आहेत. (वार्ताहर)गतवर्षीच्या उसाचा वाढीव हप्ता नाही मराठवाड्यातील काही कारखान्यांनी गतवर्षी गाळप झालेल्या उसाला २०० रुपये वाढीव हप्ता दिला. परंतु या भागातील या कारखान्याने गतवर्षी गाळप झालेल्या उसाला वाढीव हप्ता दिला नाही. त्याच बरोबर या भागातून बाहेरील कारखान्यास गाळपास गेलेल्या उसालाही वाढीव हप्ता देण्यात आला नाही. तातडीने निर्णय होणे आवश्यककारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्याचा कालावधी कमी राहिला आहे. यावर्षी गळीत हंगाम सुरू करायचा असेल तर याबाबत तातडीने निर्णय होणे आवश्यक आहे. अन्यथा ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता वाढणार आहे. आंदोलनास गती गरजेचीरेणुका शुगर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी माजी आ. हरिभाऊ लहाने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याची भूमिका घेतली असली तरी कारखाना सुरू होईपर्यंत हे आंदोलन गतिमान होणे आवश्यक आहे. कारखान्यासाठी शेतकरी कधीही एकत्र येतात, असा पूर्वीचा अनुभव आहे.