शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

हरभरा पिकावर घाटेअळीचे आक्रमण !

By admin | Updated: January 9, 2017 23:42 IST

कळंब : तालुक्यात ६० हजार हेक्टर क्षेत्रावर रबी हंगामाचा पेरा झालेला असून या हंगामातील गहू, हरभरा व ज्वारी ही प्रमुख पिके वाढीच्या महत्वाच्या टप्यात आहेत.

कळंब : तालुक्यात ६० हजार हेक्टर क्षेत्रावर रबी हंगामाचा पेरा झालेला असून या हंगामातील गहू, हरभरा व ज्वारी ही प्रमुख पिके वाढीच्या महत्वाच्या टप्यात आहेत. नादुरूस्त रोहित्राचे वाढलेले प्रमाण या पिकासमोरील मोठी समस्या ठरत आहे. पाणी असूनही पिकांना देता येत नसल्याने गावोगावी या सुलतानी संकटामुळे असंख्य शेतकरी हैैराण झाल्याचे दिसून येते. हे थोडके म्हणून की काय, हरभऱ्याच्या पिकावर सध्या मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे.रबीतील गहु, ज्वारी, हरभरा यांचा वाढीचा टप्पा सुरू झाल्यानंतर कळंब तालुक्यातील ६० हजार हेक्टरवरील रबी हंगामातील पिकांना संरक्षित पाण्याच्या पाळ्या देण्यासाठी गेल्या दिड महिन्यापासून शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. याशिवाय ऊस, टरबूज, मिरची आदी नगदी पिकांची लागवडही जोमात आहे. खरीपातील तूर व रबीतील हरभऱ्यावर अळींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना महागड्या किटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. तालुक्यात हरभऱ्याचे क्षेत्र साडेतीन पट वाढले असून तब्बल ३२७२२ हेक्टरवर पेरा झालेल्या हरभऱ्याला घाटेअळीपासून वाचविताना शेतकऱ्यांची दमछाक होवूलागली आहे. तर वाढत्या थंडीमुळे १६ हजार ७०० हेक्टरवरील ज्वारीच्या पिकांवर हिव पडण्याचा धोका निर्मान झाला आहे.पांढऱ्या सोन्याकडून पुन्हा निराशातालुक्यातील कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात जवळपास साडेचार हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. परंतु, याही वर्षी तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची या पांढऱ्या सोन्याने निराशा केली आहे. सोयाबीनच्या एकरी घटत्या उत्पादनाच्या धक्यातून शेतकरी सावरतो न सावरतो तोच अता कापसाचा एकरी उतारा निचांकी मिळाला. पावसाचा खंड, परत अतिवृष्टी यामुळे खुंटलेली वाढ, पातेगळ झाल्याने यंदाही कापसाची मजल एकरी दिड ते दोन क्विंटलपर्यंतच गेली. नफा तर सोडा कापसात अनेक शेतकऱ्यांना पदरमोड करावी लागली. (वार्ताहर)