शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

हरभरा पिकावर घाटेअळीचे आक्रमण !

By admin | Updated: January 9, 2017 23:42 IST

कळंब : तालुक्यात ६० हजार हेक्टर क्षेत्रावर रबी हंगामाचा पेरा झालेला असून या हंगामातील गहू, हरभरा व ज्वारी ही प्रमुख पिके वाढीच्या महत्वाच्या टप्यात आहेत.

कळंब : तालुक्यात ६० हजार हेक्टर क्षेत्रावर रबी हंगामाचा पेरा झालेला असून या हंगामातील गहू, हरभरा व ज्वारी ही प्रमुख पिके वाढीच्या महत्वाच्या टप्यात आहेत. नादुरूस्त रोहित्राचे वाढलेले प्रमाण या पिकासमोरील मोठी समस्या ठरत आहे. पाणी असूनही पिकांना देता येत नसल्याने गावोगावी या सुलतानी संकटामुळे असंख्य शेतकरी हैैराण झाल्याचे दिसून येते. हे थोडके म्हणून की काय, हरभऱ्याच्या पिकावर सध्या मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे.रबीतील गहु, ज्वारी, हरभरा यांचा वाढीचा टप्पा सुरू झाल्यानंतर कळंब तालुक्यातील ६० हजार हेक्टरवरील रबी हंगामातील पिकांना संरक्षित पाण्याच्या पाळ्या देण्यासाठी गेल्या दिड महिन्यापासून शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. याशिवाय ऊस, टरबूज, मिरची आदी नगदी पिकांची लागवडही जोमात आहे. खरीपातील तूर व रबीतील हरभऱ्यावर अळींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना महागड्या किटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. तालुक्यात हरभऱ्याचे क्षेत्र साडेतीन पट वाढले असून तब्बल ३२७२२ हेक्टरवर पेरा झालेल्या हरभऱ्याला घाटेअळीपासून वाचविताना शेतकऱ्यांची दमछाक होवूलागली आहे. तर वाढत्या थंडीमुळे १६ हजार ७०० हेक्टरवरील ज्वारीच्या पिकांवर हिव पडण्याचा धोका निर्मान झाला आहे.पांढऱ्या सोन्याकडून पुन्हा निराशातालुक्यातील कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात जवळपास साडेचार हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. परंतु, याही वर्षी तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची या पांढऱ्या सोन्याने निराशा केली आहे. सोयाबीनच्या एकरी घटत्या उत्पादनाच्या धक्यातून शेतकरी सावरतो न सावरतो तोच अता कापसाचा एकरी उतारा निचांकी मिळाला. पावसाचा खंड, परत अतिवृष्टी यामुळे खुंटलेली वाढ, पातेगळ झाल्याने यंदाही कापसाची मजल एकरी दिड ते दोन क्विंटलपर्यंतच गेली. नफा तर सोडा कापसात अनेक शेतकऱ्यांना पदरमोड करावी लागली. (वार्ताहर)