शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

पशूसंवर्धनच्या जागेवरुन जिल्हा परिषदेत गदारोळ

By admin | Updated: August 26, 2014 23:55 IST

परभणी: जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार गदारोळ झाला.

परभणी: जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत जिंतूर येथील पशूसंवर्धन विभागाच्या जागेवर बीओटी तत्वावर पंचायत समितीची इमारत व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान उभारण्याच्या कारणावरुन जोरदार गदारोळ झाला. जिल्हा परिषदेची मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास अध्यक्षा मीनाताई बुधवंत यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा सुरु झाली. या सर्व साधारण सभेत सर्वाधिक चर्चा ही जिंतूर येथील पशूसंवर्धन विभागाच्या जागेवरुनच झाली. सदरील जागेवर जिल्हा परिषदेच्या वतीने पंचायत समितीची इमारत व कर्मचारी वसाहतीचे बांधकाम करण्यासाठी सर्व्हे नं.१४६ मध्ये बीओटी तत्वावर बांधकाम करण्यासाठी निविदा काढण्यास मंजुरी देण्यासंबंधी ठरावावर चर्चा झाली. सत्ताधाऱ्यांनी हा ठराव मंजूर करुन घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न चालविले. त्याला काँग्रेसच्या सदस्यांनी विरोध दर्शविला. या प्रकरणी राष्ट्रवादीकडून लक्ष्मण मुंडे, रामेश्वर जावळे, दादासाहेब टेंगसे, जगन्नाथ जाधव यांनी तर काँग्रेसकडून मेघना बोर्डीकर, आत्माराम पवार यांनी बाजू मांडली. याच विषयावरुन या सर्वसाधारण सभेत जोरदार गदारोळ झाला. याच दरम्यान, राज्याच्या कृषी, पशूसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विभागाचे अव्वर सचिव प्रा.प्र.वसईकर यांच्या स्वाक्षरीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे मुंबईहून पत्र पाठविण्यात आले. त्यामध्ये आ.रामप्रसाद बोर्डीकर यांनी २५ आॅगस्ट रोजी दिलेल्या पत्राचा संदर्भ देऊन सर्व्हे नं.१४६ मधील जागेच्या सात-बारा उताऱ्यावर सदर जागा जनावरांच्या दवाखान्यासाठी आहे. या प्रकरणी या प्रस्तावाची छाननी करण्यासंदर्भात तसेच कार्यवाहीस स्थगिती देण्याचे आदेश पशूसंवर्धन मंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही करुन याबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्यात यावा, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास सुरु झालेली सर्वसाधारण सभा सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास संपली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षामध्ये याच विषयावर प्रमुख सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या वादावादीत अधिकारीही चांगलेच संतापल्याचे दिसून आले. रात्री ८ वाजेपर्यंत या विषयावर चर्चा सुरुच होती. (प्रतिनिधी)जि.प.ची शेवटची सर्वसाधारण सभा ?सध्या अस्तित्वात असलेल्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कालावधी सप्टेंबरमध्ये संपत आहे. त्यानंतर पुढील अडीच वर्षासाठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. याच दरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने मंगळवारी झालेली सर्वसाधारण सभा ही विद्यमान पदाधिकाऱ्यांची शेवटची सर्वसाधारण सभा होती़ त्यामुळे विविध प्रस्ताव मंजूर करुन घेण्याची घाई या सर्वसाधारण सभेतून झाली असल्याचेही समजले.